गुरुवार, २९ जुलै, २०२१
वरळीकडे जाणा-या बसचा मार्ग बदलावा : करिरोड चिंचपोळी ब्रिज ऐवजी करीरोड ब्रिज वरून बसेस नेण्याची नागरिकांची मागणी
ऑनलाईन भजन/अभंग गायन स्पर्धेत आबीटगांवची ईश्वरी भागडे प्रथम !
राज्याचे मुंखमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून डोंबिवलीत दिव्यांगाची नोंदणी आणि घरेलू कामगार महिलांची नोंदणी सुरू
जि प शाळा वायरलेसफाटा येथे घरोघरी शाळा उपक्रम सुरू ; घरातच तयार झाल्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र शाळा
बुधवार, २८ जुलै, २०२१
‘शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव १५ ऑगस्टपर्यंत एमपीएससी’कडे पाठविण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश : ‘एमपीएसएसी’च्या भरती प्रक्रियेचा मार्ग मोकळा
जिल्ह्यातील पूरबाधित सार्वजनिक क्षेत्रातील कचरा व ढिगारे उचलण्यासाठी व मदत छावण्यांकरिता एकूण 2 कोटी रुपयांच्या निधीस शासनाची मंजूरी
अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ ;5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूरडाळ शासन देणार मोफत
महाड शहरात जिल्हा प्रशासनाकडून रोग निदान शिबिर, औषधोपचार ; तसेच कोविड-19 अँटिजेन टेस्टची मोफत सुविधा
रायगड जिल्ह्यात आदिम जमातीचे बहुउद्देशीय संकुल उभारणीची प्रक्रिया प्रगतीपथावर ;मौजे जांभूळपाडा येथील बहुउद्देशीय संकुलाच्या प्राथमिक प्रारुप आराखड्यास शासनाची मान्यता-पालकमंत्री कु. आदिती तटकरे
रायगड जिल्ह्यातील महाड येथे एनडीआरएफ बेसकॅम्पसाठी : शासकीय जागा देण्यास दुग्धव्यवसाय विभागाची मान्यता - पालकमंत्री कु.आदिती सुनील तटकरे
उमेदच्या महिलांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात : "उमेद" च्या महिलांनी जागविली पूरग्रस्तांची जगण्याची अन् लढण्याची "उमेद"
बदलापूरमध्ये दादाज् फाऊंडेशनची स्थापना
कोकण पुरग्रस्तांसाठी वैद्यकीय मदतीसाठी औषध साठ्यासाह डॉक्टरांचे पथक रवाना
परोपकारीवृत्ती जोपासणारं खंबीर कोकण..!
राष्ट्रीय बहुजन बहुभाषी ड्रामा अँड फिल्म युनियन तर्फे मोफत नाट्य-अभिनय ऑनलाईन शिबिराला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद !
मुर्तवडे येथील "एका लग्नाची अभिमानास्पद गोष्ट" !रूढी परंपरांचे बंधन तोडत विधवा वहिनीशी दिराने बांधली लग्न गाठ !
महिला उत्कर्ष समितीच्या पुणे जिल्हा अध्यक्ष पदी मा. ज्योती गायकवाड यांची निवड
रविवार, २५ जुलै, २०२१
स्थलांतराचे आव्हान
मुंबईत रविवारी चेंबूर,विक्रोळी व ठाणे येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ३२ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई व ठाणे परिसरातील डोंगरावर राहणारे नागरिक व अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणारी कुटुंब यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते व रहिवाशांना इमारत खाली करण्याची नोटीस बजविते.काही कुटुंबांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करते,पण असे असले तरी अनेक कुटुंब आपली मूळची घरे सोडण्यास तयार नसतात व त्याच ठिकाणी धोकादायक स्थितीत वास्तव्य करतात व अनेकवेळा मुसळधार पावसात या इमारती कोसळतात व जीवितहानी होते.तेव्हा अशा इमारतीमधील लोकांना स्थलांतरित करणे मोठे जिकरीचे काम महानगरपालिकेसमोर असते. त्याचप्रमाणे डोंगरावर राहणाऱ्यांची घरे देखील दिवसेंदिवस वाढत असतात,पण याकडे पालिकेचे लक्ष नाही व चिरीमिरी घेऊन अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात,तेव्हा हे जर असच सुरू राहील तर दरवर्षी अशा दुर्घटना होतच राहणार व शासन मदत जाहीर करून मोकळे होते.तेव्हा या सर्व परिस्थितीला स्थनिक प्रशासन व नागरिकही तितकेच जबाबदार आहेत.तेव्हा हे सर्व वेळीच थांबायला हवं,नाहीतर जीव जातच राहतील.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी
जोगेश्वरी येथे आषाढी एकादशी साजरी
स्थानिक नागरिकांनी केली सिद्धिविनायक मार्गाची स्वच्छता
आषाढी एकादशी निमित्तानं वृक्षपुजन व वृक्षारोपण
गेली 33 वर्षे संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी न चुकना आषाढी एकादशीस वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. पण दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना या साथरोगाच्या महासंकटामुळे मागच्या वर्षापासून सदर कार्यक्रम मर्यादित स्वरुपात वृक्षपुजन व वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही झालेल्या या कार्यक्रमात तुळशीचे पुजन व लागवड करण्यात आली. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळात प्राणवायुचे महत्व जनसामान्यांस चांगले उमगले आहे. आणि तुळस ही प्राणवायु देणारी व हवेचे शुध्दीकरण करणारी वनस्पती आहे. याच विचाराचा धागा पकडुन संस्थेने तुळस लागवड व संवर्धन अधिक मोठ्या प्रमाणात होण्यासाठी माझे घर माझे तुळशी वृंदावन या अभिनव स्पर्धेचे या कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले. त्यास उत्स्फुर्तपणे लोकांचा चांगला प्रतिसाद अनेक ठिकाणांहून मिळाला व लोकांनी विशेष अभिनंदन केले. अजून ही लोक स्पर्धेत सहभागी होत आहेत.या प्रसंगी बोलताना यूथकौन्सिल नेरुळ या संस्थेच्या कार्याचा गौरव करून पंडित जितेंद्र कुलकर्णी म्हणाले की, माझे घर माझे तुळशी वृंदावन हा आयोजित केलेला स्पर्धात्मक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे तुळशीचे महात्म्य अधिक प्रमाणात समाजामध्ये अधोरेखीत होण्यास मदत होणार आहे. हायकोर्ट वकील सुरेश निलाटकर म्हणाले की, डॉक्टर गिरीश कुलकर्णींचा मानपत्र देवून झालेला गौरव हा योग्यच आहे. त्यांनी कोरोना महासंकट काळातील रुग्णांप्रती दिलेली वैद्यकीय सेवा खरोखरच अभिमानास्पद आहे. मी त्याचा स्वत: साक्षीदार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. तर शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे यथोचित आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रमेश सुर्वे, भालचंद्र माने, जी. आर. पाटील, विक्रम राम, सुजीतसिंह उभी, यशवंत गोनेवाड, दत्ताराम आंम्ब्रे, नरेश विचारे, निशांत बनकर, एस. बी. सिंग आदिंनी खूप मेहनत घेतली.
पोलिसांचे आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन यासाठी आयोजित वेबिनारचा यशस्वीरीत्या समारोप ;योग्य प्रतिबंधात्मक आरोग्य माहिती देऊन जनजागृती
येणाऱ्या काळात आरोग्य आणि तंबाखू मुक्त पोलीस स्टेशन बाबत जनजागृतीपर ऑनलाईनच्या माध्यमातून मध्य प्रादेशिक पोलीस विभागातील २० पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस कर्मचाऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येईल. जेणेकरून आपले पोलीस अधिकारी तंबाखू सारख्या व्यसनामुळे होणाऱ्या दुर्धर आजारावर नियंत्रण मिळेल आणि त्यांचे आरोग्य सुदृढ, निरोगी राहिल्यामुळे आपला समाज हा सुदृढ बनेल.
ऑलम्पिकमध्ये भारताची चांगली सुरवात...
Well begin is half done अशी इंग्रजीमध्ये जी म्हण आहे,म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात ही चांगली झाली तर अर्धी लढाई जिंकल्यासखिच असते व पुढील काम सोपे होते व याचा प्रत्यय आज पाहिल्याच दिवशी भारतीय खेळाडू मीराबाई चानू हिने आणून दिला.जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून सुरू झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची वेटलिफ्टर चानू हिने आज झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८७ किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात ११५ असे एकूण २०२ किलो वजन उचलून भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली.चीनच्या खेळाडूने २१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.यापुढेही भारताचे अनेक खेळाडू विविध स्पर्धेत विविध गटात अनेक सुवर्ण पदक जिंकून देतील असा विश्वास भारतीयांनी व्यक्त केला असून आपले खेळाडू नक्कीच अनेक पदक जिंकून तो विश्वास सार्थ ठरवितील अशी आशा आहे.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
आदर्श वार्ताहर - काव्यांगण
कोकणवासी मानणार नाही हार
हिरव्यागार महाराष्टावरती प्रलयाने केले अत्याचार
अशा परिस्थितीत मानणार नाही
कोकणवासी कधीच हार
दिले भरभरून तपस्वी या कोकणानी
भारतभुला
अन्याय सहून ही विझला नाही
कोकणातला चुला
गीतारहस्य रुपी ग्रंथाने दाखविले विश्वरूप
चिखलीच्या त्या बाळाने दाविले स्व स्वरूप
धोंडो केशव कर्वे यांनी स्थपून कन्याशाळा
सोडवल्या अबलांच्या बंदिशाळा
या सर्वांचा असता आशीर्वाद
कसा घाबरेल कोकणवासी आहे कुणाची बिषाद ?
-रविंद्र आत्माराम बागुल,बोरिवली,मुंबई
राज्यावरील पुराचे संकट, कोरोना पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री वाढदिवस साजरा करणार नाहीत
आ. वा. वृत्तसेवा , मुंबई : कोकण, पश्चिम महाराष्ट्रावर निसर्ग कोपला असून पूरामुळे मृत्यू झाले आहेत, अनेकांच्या कुटुंबीयांवर आघात झाला आहे. या आपत्तीत महाराष्ट्र शोकाकुल असून कुणीही माझा वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
२७ जुलै रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा वाढदिवस असला तरी या आपत्तींमुळे तो साजरा न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.वाढदिवसानिमित्त कुणीही अभीष्टचिंतन करण्यासाठी प्रत्यक्ष भेटू नये तसेच फलक, पोस्टर्स लावू नये. सोशल मिडीया व ईमेलच्या माध्यमातून आपण शुभेच्छा स्वीकारू असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
राज्यात अद्याप कोरोनाचे संकट कायम आहे,संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली आहे, त्यामुळे आरोग्याचे नियम कटाक्षाने पाळत राहणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसाचे कुठलेही जाहीर कार्यक्रम करू नयेत अशी विनंतीही मुख्यमंत्र्यांनी केली आहे.पूर आणि कोरोना परिस्थितीत एकमेकांना मदत करणे गरजेचे आहे, त्यामुळे वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपले योगदान देऊन सामाजिक जबाबदारीचे कर्तव्य पार पडावे असेही मुख्यमंत्री म्हणतात.
पाले गावातील तरुण रुपेश म्हात्रे या दिव्यांग बांधवाचा प्रामाणिकपणा.
[ खरचं मित्रांनो ती पर्स ठेऊन जे काय त्याच्यात पैसे होते त्या पैशाने जास्तीत जास्त एक महिना मौज मजा केली असती परंतू मी माझ्या मनात कोणताही स्वार्थ न ठेवता मी ती पर्स सदर तरुणाच्या स्वाधीन केली आणि त्यानंतर सोशल मिडीया द्वारे आणि प्रत्यक्षपणे जो मला अभिनंदानाचा वर्षाव होत आहे त्या अभिनंदनाने माझे मनोबल उंचावले आणि मला एक नवी स्फुर्ती निर्माण झाली ते मला त्या पैशाने नक्कीच मिळाले नसते हे नक्की मी मानतो ] -रुपेश म्हात्रे
[ मी रुपेश म्हात्रे यांचे आभार मानतो. मी हरविलेले पैसे, पाकीट भेटेल की नाही या काळजीत होतो. पण रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मला माझे पैसे पाकीट, ATM मला परत मिळाले. आजही समाजात माणुसकी जिवंत आहे.हे रुपेश म्हात्रे यांच्या माध्यमातून मी अनुभवलो. ] - विशाल गावंड
साप दिसल्यास सर्पमित्रांना संपर्क करा
आ. वा. वृत्तसेवा ,रायगड - रायगड जिल्ह्यात काही दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. उरण तालुक्यातही अधून मधून मुसळधार पाऊस पडत आहे. मुसळधार पावसामुळे नद्या नाले भरून वाहू लागले आहेत. पाण्याच्या प्रवाहात वाहून आलेली विषारी -बिनविषारी साप मनुष्य वस्तीत आश्रय घेत आहेत. त्यामुळे विषारी -बिन विषारी सापांचे वन्य जीवांचे संरक्षण करणाऱ्या उरण तालुक्यातील फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेने जनजागृती विषयक मोहीम हाती घेतली असून आपल्या परिसरात साप आढळल्यास सर्प मित्रांना फोन करून कळविण्याचे आवाहन केले आहे. सदर संस्थेचे सदस्य, कार्यकर्ते त्या सापांना पकडून त्यांना कोणत्याही प्रकारे इजा होऊ न देता जंगलात नेऊन सोडतात.साप दिसल्यास खालील सदस्यांशी संपर्क करावे.
फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन )या संस्थेचे व्हाट्सअप नंबर -9594969747, 9029513575
राजेश (चिरनेर -भोम )-7738628562,गोरखनाथ (पालेगाव )-9769705295,राकेश (सारडे )8600557387,अविनाश (आवरे )-7738121971,ऋषिकेश (कडापे )-9082935400,विजय (मोठी जुई )-8108848058, मिलिंद (पेण )-93212 34137, प्रणव (आवरे )-9082670519, रघु (उरण )-9321287772, किशोर (उरण )-9137752021, चरण (रावेगाव )-9503147576, प्रथमेश (गळसुंदे )-8600587495, तुषार (पोसरी )-8378021811, बाळा कोळी (उरण )-8424932686, अनिरुद्ध (अलिबाग )-9960662329
पनवेल येथे पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम)प्रवेश सुरू
आ. वा. वृत्तसेवा ,पनवेल - 2021-2022 या शैक्षणिक वर्षापासून पत्रकारितेचे शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या, मराठी भाषेची गोडी असणाऱ्या बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पत्रकारिता पदविका अभ्यासक्रम( डिप्लोमा इन जर्नालिझम) प्रवेश करण्यात आला आहे. हा अर्धवेळ अभ्यासक्रम असून शनिवार, रविवार या सुट्टीच्या दिवसांत चालविला जाणार आहे. माध्यम क्षेत्रातील तज्ज्ञ पत्रकार या वर्गात मार्गदर्शन करणार आहेत. बारावीनंतर पदवी शिक्षण घेणारे विद्यार्थी, अन्य ठिकाणी नोकरी करत शिकू इच्छिणारे विद्यार्थी किंवा पत्रकारितेमध्ये करिअर करू इच्छिणारे कोणत्याही शाखेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्यास पात्र असतील. या अभ्यासक्रमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक विद्यार्थ्यांनी कॉलेजच्या वेबसाईटला भेट देऊन प्रवेश अर्ज भरावा, असे आवाहन कॉलेजच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश परीक्षा घेतली जाणार असून त्या परीक्षेचे स्वरूप बहुपर्यायी प्रश्न स्वरूपाचे असेल.त्या परीक्षेनंतर विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात येतील. या प्रवेश परीक्षेसाठी कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही. अर्ज करण्यासाठी संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध अर्ज भरून देणे आवश्यक आहे. इच्छुकांनी माध्यम क्षेत्रातील उपलब्ध अनेक व्यावसायिक संधी मिळविण्याच्या दृष्टीने या पत्रकारिता वर्गाला जरूर प्रवेश घ्यावा.चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालय, न्यू पनवेल (स्वायत्त) या अग्रगण्य शिक्षण संस्थेत त्वरित प्रवेश घ्यावा.
अधिक माहितीसाठी संपर्क -नम्रता कडू,वर्ग समन्वयक,
डिप्लोमा इन जर्नालिझम,7977489076,ईमेल पत्ता- djnlckt1@gmail.com
उरणमधील पुरस्थितीला जवाबदार कोण ?
काय आहेत कारणे:-उरणच्या विकासासाठी सिडकोने येथील शेती,मिठागरे यांच्या वर मातीचा भराव केला.त्यावेळी या भागातील भरती ओहटीचे त्याच प्रमाणे पावसाचे पाणी याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले(पवळी)बुजविण्यात आल्या. त्यामुळे येथील नैसर्गिक मार्गच बंद केले. त्याचप्रमाणे ते आकुंचित केले.त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्याने आपली वाट बदलली ते थेट गावात शिरू लागले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर येऊ लागलं आहे. जे सिडकोने केले तेच जेएनपीटीने ही केले.
उरण मध्ये विकासाची कामे करीत असताना सिडकोने अगदी जागतिक पातळीवर येथील भरती ओहटी च्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. उरण मध्ये डच या देशाच्या धर्तीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी होल्डींग पौंड (धारणतलाव) तयार केले आहेत. आशा प्रकारचे सहा होल्डिंग पौंड आहेत असे सिडको कडून सांगितलं जातं.पण आजच्या स्थितीत यातील एकाही तलावात पाणी साचत नाही याचे कारण या तलावात मातीचा गाळ साचला आहे.या गाळावर सध्या खारफुटी उगवली आहे.ती हटविल्या शिवाय या तलावातील गाळ काढता येऊ शकत नाही. त्यासाठी मागील 15 वर्षा पासून मुंबई उच्च न्यायालयात सिडकोची याचिका असल्याचे उत्तर सिडको कडून दिल जात आहे.
जेएनपीटीचे ढिसाळ नियोजन :-जसखार,सोनारी,करळ व सावरखार या चार गावात पाणी शिरल्यावर त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु प्रश्न मात्र कायम आहे.पाणी साचून येथील घरांची नुकसानी सुरूच आहे.
पूरग्रस्त होण्याचा धोका:-उरणचा विकास चालू असताना सिडको तसेच JNPT प्रशासन कडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन केले जात नसल्याने उरणला नेहमी पुराचा धोका बसत आहे.उरणच्या विकासा संदर्भात नेहमी चुकीच्या पद्धतीने नियोजन केले जात असल्याने त्याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांना, ग्रामस्थांना भोगावे लागत आहे. पाऊस सतत, मुसळधार पडला की उरण मध्ये पूर येतो व शेतीचे, फळ बागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान होते. नुकसान ग्रस्त पीडिताला योग्य ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही.
[[जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त झालोच आहोत पण यापुढे दक्ष नागरिक म्हणून जागे होऊन आपल्या गाव आणि परिसरात गटारे नागरी सुविधा या करीता सिडको व जेएनपीटी कडून खर्च करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी हा योग्य प्रकारे खर्च होऊन काम होत का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते न झाल्यास उरणला पूरग्रस्त होण्या पासून कोणीही वाचवू शकणार नाही.]]
- नरेश कोळी , हनुमान कोळीवाडा येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते.
आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची नासाच्या 'मंगळ मिशन' मध्ये नाव नोंदणी ; नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संस्थाच्या मोहिमेसाठी जनजागृती
ह्या मध्ये कुणाही आपला अर्ज करुन त्यातील माहिती भरून नोंद करु शकतात आणि मग आपले नाव डिजीटल स्वरुरपात यानात चिप द्वारे पाठविण्यात येणार असून नासा थेट त्याचे आपल्याला प्रमाणपत्र वजा तिकीटही देते. अंतराळ प्रेमींना ह्याचा लाभ घेण्याची ही अतिशय उत्तम संधी आहे. जगभरातून अनेकांनी ह्या मोहिमेत आपला सहभाग दाखवला असून भारतातून तब्बल ३ लाख ७६ हजार ७७९ जणांनी ह्या मोहिमेचा लाभ डिजिटल स्वरूपातुन घेतला आहे. देशात अनेकांना ह्या मोहिमेची माहिती नसल्या अभावी अनेक ह्या गोष्टींपासून अज्ञात आहेत आणि म्हणूनच नासाच्या ह्या मोहिमेबाबत जनजागृती व्हावी ह्या करिता सर्वेश तरे यांनी स्वतःदेखील ह्या मोहिमेत सहभाग दाखविला आहे. समाजातील अनेकांना नासा म्हटले की लगेच भुलायला होतं परंतु अशा देखील अनेक प्रमाणपत्राच्या मजेशीर मोहिम नासा राबविते आणि ते समाजातील घटकांनाही माहित होणे गरजेचे आहे.
नासा तसेच इस्त्रोतही अनेक प्रश्नावली असतात त्याचे उत्तर दिल्यावर आपल्याला प्रमाण पत्र मिळते व असे गंमतीदार उपक्रम देखील असतात याची सत्यता ही सामान्य जनतेलाही माहिती व्हायला. किंबहूना हेच विद्यार्थ्यांना सांगीतले तर यातून अनेक विद्यार्थ्यांना गोडी वा कुतूहल निर्माण होईल अन नक्की उद्या आपली मुलंही शिक्षणाच्या जोरावर नासा आणि इस्त्रोसारख्या अंतराळ संस्थामध्ये आपल्याला बघायला मिळतील.म्हणुन सर्वेश तरेंनी जागृतीखातर आपले नावही नासाच्या या ‘मंगल मिशन’ साठी नोंदविले असल्याचे सांगितले आहे.
अनमोल खजिना पुस्तकाचे प्रकाशन संपन्न
असून या प्रकाशन सोहळ्यासाठी विविध मान्यवर उपस्थित हॊते.श्री. सरस्वती विद्यामंदिर भांडुप शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुरकुटे मॅडम यांनी याप्रसंगी उदघाटनपर भाषणात हे पुस्तक मुलांसाठी खूप उपयोगी ठरेल असा विश्वास व्यक्त करून पुस्तकाला खूप खूप शुभेच्छा दिल्या. "माणसाजवळ धन नसेल तरी चालेल पण प्रेमाने काठोकाठ भरलेलं मन नक्कीच असावं"अशाप्रकारे एकूण ३२पानात महाजन सर यांनी विविध विषयावरील सुविचार संग्रहीत केले आहेत. निबंधलेखन, भाषण, लेख,सूत्रसंचालन तसेच व्यक्तीमत्व्व विकास यासाठी हे पुस्तक लहानापासून ते थोरापर्यंत सर्वांना उपयोगी पडणारे आहे. शाळेत परिपाठासाठी विदयार्थ्यांना या सुविचार संग्रहाचा चांगला उपयोग होऊ शकतो.या पुस्तक प्रकाशना बद्दल लिलाधर महाजन सर यांचे बहिणाबाई साहित्य संस्था, कल्याण, साहित्य जागर मंच मुंबई, मुंबई ठाणे कवी कट्टा या संस्थेच्या वतीने खूप खूप अभिनंदन करण्यात येत आहे.
शुक्रवार, २३ जुलै, २०२१
महाराष्ट्र राज्य खाजगी शिक्षक संघटना मुंबई प्रदेश महिला अध्यक्षा पदी मिताली तांबे यांची निवड
कामराज नगर भुयारी मार्गाच्या नुतनीकरणसाठी जनतेची मागणी ; सामाजिक कार्यकर्ते संतोष पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली धरणे आंदोलन
महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महाड व पोलादपूर तालुक्यातील 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
आ.वा वृत्तसेवा , मुंबई- रायगड जिल्ह्यात आलेल्या अतिवृष्टीमुळे काल दि.22 जुलै 2021 ला महापारेषणच्या कांदलगाव ते महाड दरम्यान 220 के. व्ही. अति उच्चदाब वीज वाहिनीचे दोन टॉवर कोसळल्यामुळे महावितरणच्या गोरेगाव विभागातील महाड व पोलादपूर उपविभाग पूर्णपणे अंधारात गेले आहे. दोन्ही तालुक्यात 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा बाधित असून अति उच्चदाब टॉवरच्या दुरुस्तीचे काम प्रगतीपथावर आहे. टॉवर लाईनचे काम पूर्ण होईपर्यंत वीजपुरवठा पूर्ववत करण्यात वेळ लागू शकते.
महापारेषणच्या महाड अति उच्चदाब उपकेंद्र बंद असल्यामुळे महावितरणच्या पेण मंडळातील चांभारखिंड, जी. बी. एल, कोलोसे व तुर्भे हे चार स्विचिंग उपकेंद्र बंद पडले आहेत. परिणामी, महाड व पोलादपूर येथील महाड शहर, बिरवाडी, विन्हेरे, वहूर, नाते, नांगळवाडी, नागाव, कुंबळे व महाड एम. आय. डी. सी तसेच पोलादपूर शहर, तुर्भे, पितळवाडी, वरंध असे एकूण 260 गावांचा वीजपुरवठा बाधित झाला असून यामध्ये ४४ उच्चदाब २२ के.व्ही फीडर व 80,000 ग्राहकांचा वीजपुरवठा टॉवर कोसळल्यामुळे खंडित झाला आहे.
राज्यातील आपत्कालिन स्थितीबाबत उपमुख्यमंत्र्यांची संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी चर्चा ; राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागात बचाव व मदतकार्यासाठी सरंक्षण मंत्र्यांचे आश्वासन
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्य सचिवांकडून सातत्याने आपत्कालिन स्थितीचा आढावा ;
बचाव व मदतकार्याला गती देण्यासाठी राज्य व जिल्हा प्रशासनाकडून प्रयत्न
आ.वा वृत्तसेवा , मुंबई :- रायगड, रत्नागिरी, सातारा, सांगली, कोल्हापूरसह राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी, महापूर, दरड कोसळून निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा करुन त्यांना सद्यस्थितीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टी व दरड कोसळलेल्या भागात सैन्यदलांची मदत तात्काळ उपलब्ध करण्यात आली असून सैन्यदलांची अधिकची मदतही उपलब्ध करण्याचे आश्वासन संरक्षणमंत्र्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले आहे. अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपवली आहे. राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने अतिवृष्टीग्रस्त भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून आवश्यक निर्देश तातडीने दिले जात असल्याची माहीती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
राज्यात सर्वदूर होत असलेल्या अतिवृष्टी व त्यामुळे निर्माण झालेल्या आपत्कालिन परिस्थितीवर उपमुख्यमंत्री अजित पवार जातीने लक्ष ठेवून आहेत. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री अदितीताई तटकरे, रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब, सिंधुदुर्गचे पालकमंत्री, उदय सामंत, साताऱ्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, राज्यमंत्री शंभूराज देसाई, आमदार अनिकेत तटकरे, भरत गोगावले, भास्कर जाधव, शेखर निकम आदी लोकप्रतिनिधी अतिवृष्टीग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यात सहभागी झाले असून उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून तसेच खासदार सुनील तटकरे आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून पुरस्थितीचा आढावा घेतला. आपत्तीग्रस्त नागरिकांना आवश्यक मदत तातडीने उपलब्ध करण्याचे तसेच स्थिती पूर्ववत होईपर्यंत जिल्हा न सोडण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी मंत्रीमहोदयांना तसेच लोकप्रतिनिधींना दिल्या आहेत.
कोयना धरण परिसरातील अतिवृष्टीमुळे धरणाची पाणीपातळी वाढत असून सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात येत आहे. कोयना धरणाच्या पाणीपातळीवर जलसंपदामंत्री जयंत पाटील स्वत: जातीने लक्ष ठेवून असून अलमट्टी धरण व्यवस्थापनाशीही संपर्कात आहेत. सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थितीत नियंत्रणात ठेवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महाड, पोलादपूर, खेड, चिपळूण, गुहागर, पाटण, शिराळा, कोल्हापूर अशा अनेक शहरांमध्ये पूरस्थिती गंभीर असून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यासाठी जिल्हा प्रशासन, एनडीआरएफ व सैन्यदलांची मदत घेण्यात येत आहे. लष्कर व नौदलही बचाव व मदतकार्यात सहभागी झालं असून गरजेनुसार सैन्यदलाची अधिकची मदत तयार ठेवण्यात आली आहे, अशी माहितीही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.
अतिवृष्टीग्रस्त भागात रस्ते वाहून गेल्याने व दरड कोसळल्याने ज्या गावांचा संपर्क तुटला आहे तिथल्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याचे व खाद्यपदार्थांची पाकिटे पुरवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. स्थानिक नागरिक व स्वयंसेवी संस्थांनीही आपत्कालिन परिस्थितीत आपापल्या भागातल्या आपत्तीग्रस्त नागरिकांच्या बचाव व मदतकार्यात सहकार्य करावे. अतिवृष्टीग्रस्त भागातील नागरिकांनीही सुरक्षितस्थळी आसरा घेऊन परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत बाहेर पडू नये, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. आपत्तीग्रस्त नागरिकांनी कुठल्याही प्रकारच्या मदतीसाठी पोलिस किंवा स्थानिक प्रशासनाशी, लोकप्रतिनिधींशी संपर्क साधावा, असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
महाडमधील पूरग्रस्तांना तातडीने मदत करण्याचे पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांचे प्रशासनाला निर्देश
आ.वा वृत्तसेवा , रायगड : जिल्ह्यातील महाड या तालुक्यातील अतिवृष्टी झाल्याने उद्भवलेल्या पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा व जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना आज पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी जिल्ह्यातील महाड येथील पूरपरिस्थितीची पहाणी करुन पूरबाधितांना मदतकार्य पोहोचण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना केल्या. यावेळी खासदार सुनिल तटकरे, विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आमदार गिरीश महाजन, आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे, अतिरिक्त जिल्हाधिकारी अमोल यादव, स्थानिक प्रशासनातील इतर अधिकारी आदिंची उपस्थिती होती.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी या भागातील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. जिल्ह्यातील पूरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहोचवावी व स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा या सारख्या आवश्यक सर्व बाबी उपलब्ध करुन द्याव्यात तसेच जनावरांनाही आवश्यक पशुखाद्य आणि पाणी पुरवावे, अतिवृष्टीमुळे खंडित झालेली दूरध्वनी सेवा आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा, अशा सूचना दिल्या. तसेच या आपत्कालीन परिस्थितीवर मात करुन मुख्यमंत्री श्री.उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री श्री.अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मंत्रीमंडळातील इतर सहकारी मंत्र्यांच्या सहकार्याने पूरबाधितांना योग्य ती मदत केली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
राज्यात अतिवृष्टीमुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनांतील मृतांच्या वारसांना पाच लाख रुपयांची मदत – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
जखमींवर शासकीय खर्चाने उपचार
मुंबई: - राज्यातील अतिवृष्टीमुळे दऱड कोसळून दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. ही आपत्ती कोसळलेल्या कुटुंबियांच्या दुःखात आपण सहभागी आहोत, अशा शोकसंवेदानाही मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी प्रकट केल्या आहेत.
रायगड जिल्ह्यात तळीये मधलीवाडी (ता. महाड), गोवेले साखरसुतारवाडी, केवनाळे ( दोन्ही ता. पोलादपूर) येथे त्याचप्रमाणे, रत्नागिरी जिल्हयात खेड, सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यातील मिरगांव, आंबेघर, हुंबराळी, ढोकवळे तसेच वाई तालुक्यातील कोंडवळी आणि मोजेझोर अशा एकूण दहा ठिकाणी दरडी कोसळून मृत्यू झाले. या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. तसेच या दुर्घटनांमधील जखमींच्या उपचाराचा खर्च शासनातर्फे करण्यात येईल.
महाड येथील पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात ; जिल्हा प्रशासनातर्फे मदतकार्य वेगाने सुरु
संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन
महाड - महाड तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून विविध पातळ्यांवर प्रयत्न सुरु असून मदतकार्य वेगाने सुरु आहे. या ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती निवारणची 2 पथके, राज्य आपत्ती निवारणची 2 पथके, नौदलाची 2 पथके, सागरी सीमा सुरक्षा दलाची 2 पथके तसेच 12 स्थानिक रेस्क्यू टीममार्फत मदतकार्य सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे.
पाणी ओसरण्यास सुरुवात झाली आहे परंतु पाणी ओसरले तरी महाबळेश्वरला पडत असलेला पाऊस, संभाव्य अतिवृष्टीचा इशारा यामुळे महाड शहरात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सखल भागात व पूरप्रवण भागात राहणाऱ्या नागरिकांनी पुढील काही दिवस प्रशासनाने निश्चित केलेल्या सुरक्षित निवारास्थळांमध्ये स्थलांतरीत व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. या भागातील नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही सुरु असून त्याठिकाणी प्रशासनामार्फत पूरबाधितांसाठी कपडे, पिण्याचे पाणी, बिस्कीट, अन्नधान्य, वैद्यकीय उपचार अशा विविध आवश्यक बाबींचीही व्यवस्था करण्यात आली आहे. वैद्यकीय पथके लोणरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ या ठिकाणी तैनात करण्यात आली आहेत.
नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, रायगड अलिबाग 02141-222097 / 227452, व्हॉट्सअप क्रमांक 8275152363 येथे संपर्क साधावा, तसेच महाड व पोलादपूर तालुक्यातील पूरग्रस्त नागरिकांसाठी खाद्यपदार्थ, पाणी बॉटल्स, बिस्कीट, दूध पॉकेट, कपडे, चादर-बेड शीट, सतरंजी व इतर जीवन उपयोगी साहित्य स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती, व्यापारी, उद्योगपती व शासकीय अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून पाठवावयाचे असल्यास 1) मधुकर बोडके, जिल्हा पुरवठा अधिकारी, रायगड - 9965100800. 2) प्रशाली दिघावकर, उपविभागीय अधिकारी, माणगाव - 7588816292, 3) प्रियांका आयरे-कांबळे, तहसिलदार, माणगाव - 8805160570, 4) परमेश्वर खरोडे, अव्वल कारकून, माणगाव तहसील - 9028585985, 9804546546, या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पूरग्रस्त भागातील बचाव व मदतकार्यासंदर्भात संरक्षण मंत्रालयाशी समन्वय ठेवण्यासाठी राज्य सरकारने मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्यावर नोडल ऑफिसर म्हणून जबाबदारी सोपविली आहे. तर राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे स्वत: बचाव व मदकार्यावर लक्ष ठेवून आहेत.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री कु.आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे,आमदार भरत गोगावले, आमदार अनिकेत तटकरे व इतर लोकप्रतिनिधी सातत्याने या भागातील मदत व बचावकार्याचा आढावा घेत असून जिल्हाधिकारी निधी चौधरी व प्रशासनातील जिल्हा परिषद, महसूल, आरोग्य, पोलीस, सार्वजनिक बांधकाम, महावितरण, तसेच इतर विभागातील अधिकारी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करीत आहेत.
महाड-पोलादपूर येथील पूरबाधितांच्या उपचारासाठी जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा तत्पर
अलिबाग - सतत चालू असलेल्या पावसामुळे गेल्या दोन दिवसात महाड येथे पूरस्थिती/ अतिवृष्टी झालेली आहे. गुरुवार, दि. 22 जुलै, 2021 रोजी संध्याकाळी 6.00 वाजता तळीये गाव (वरची वाडी) ता.महाड येथे अचानक दरड कोसळल्याने जवळपास 30 घरे ढिगाऱ्याखाली गेली असून आज दि.23 जुलै रोजी दुपारी 1.00 वाजेपर्यंत 32 मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. तसेच पोलादपूर तालुक्यातील केवनाळे -सुतारवाडी,ता.पोलादपूर गावातील 5 मृतदेह बाहेर काढण्यात आलेले आहेत. अशा एकूण 37 मृतदेहांचे शवविच्छेदन जागेवरच (Spot Post Mortem) करण्यात येणार आहेत. यानंतरही अजूनही काही व्यक्ती ढिगाऱ्याखाली अडकलेल्या असून शोधकार्य युध्दपातळीवर सुरु आहे. तसेच महाडमध्ये 7 ते 8 फूटावर खूप उंचीवर पाणी साचलेले असून अद्यापही जखमी रुग्ण सापडलेले नाहीत व उंच ठिकाणी ज्या व्यक्ती आहेत, त्यांना हेलिकॉप्टरने स्थलांतरित करण्याचे काम सुरु आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी दिली आहे.
एमआयडीसी बिरवाडी, महाड येथे दोन कंपन्यांमध्ये स्फोट होवून आग लागल्याची घटना घडली होती परंतु कोणतीही जीवितहानी झालेली नाही, असे आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून कळविण्यात आलेले आहे.
तसेच मागील 2 दिवसापासून विद्युत पुरवठा बंद असल्याने महाड येथील खाजगी व शासकीय डॉक्टर्स यांच्याशी संपर्क होण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. त्याचप्रमाणे महाड येथील कोविड सेंटर (सीसीसी / डिसीएचसी) सेंटरमधील रुग्ण सुरक्षित असून जिल्हा स्तरावरुन व उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथून औषधांचा व ऑक्सिजन पुरवठा सुरळीत सुरु आहे. त्याचप्रमाणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्फत प्रतिबंधात्मक औषधोपचारही सुरु आहेत. उपजिल्हा रुग्णालय माणगाव येथे 37 रक्तपिशव्या उपलब्ध असून 50 रक्तपिशव्यांची अलिबाग जिल्हा रुग्णालय येथून मागणी करण्यात आली आहे.
गंभीर जखमी रुग्णांना (Poly Trama) एम.जी.एम. कामोठे, जिल्हा रुग्णालय अलिबाग व गरज भासल्यास जे.जे. रुग्णालय मुंबई येथे पाठविण्यात येणार आहे. स्थिर व किरकोळ जखमी रुग्णांना उपजिल्हा रुग्णालय माणगांव व जिल्हा रुग्णालय अलिबाग येथे दाखल करण्यात येत आहे. विविध स्वयंसेवी संस्थेमार्फत गरजूंना पाणी, जेवणाची पाकीटे व औषधांचा पुरवठा करण्यात येत असून शवविच्छेदन करण्यासाठी 1) उपजिल्हा रुग्णालय पनवेल येथील तज्ञपथक (न्यायवैद्यक तज्ञ) डॉक्टरांसह 2) उपजिल्हा रुग्णालय, म्हसळा, 3) उपजिल्हा रुग्णालय, श्रीवर्धन, 4) उपजिल्हा रुग्णालय, माणगाव येथे चार वैद्यकीय पथके कार्यरत आहेत.
पालकमंत्री कु.आदिती तटकरे व खासदार सुनिल तटकरे यांनी महाड येथे पाहणी करून जखमींची विचारपूस करून सर्व संबंधीत विभागांना योग्य त्या सूचना दिलेल्या आहेत, असेही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी कळविले आहे.तसेच वैद्यकीय सोयी-सुविधांबाबत संपर्कासाठी आरोग्य यंत्रणेमार्फत आरोग्य हेल्पलाईन नं. 02140-263006/263003, डॉ. प्रदीप इंगोले, वैद्यकीय अधीक्षक (नोडल ऑफिसर) मो.नं.9130733202/8369424489, सनियंत्रण अधिकारी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने, अलिबाग रायगड मो.नं. 9404001000 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसानीची माहिती द्यावी
अलिबाग-प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप हंगाम 2021 मध्ये भात व नागली पिकासाठी रायगड जिल्ह्यामध्ये एचडीएफसी अर्गो या कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या क्षेत्राची माहिती विमा कंपनीस 72 तासाच्या आत कळवणे आवश्यक आहे. त्यामुळे विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचे अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झाले असल्यास त्याची विमा कंपनीस माहिती देण्यासाठी पी एम एफ बी वाय ऑनलाइन पोर्टल/मोबाईल अँपचा वापर करावा अथवा विमा कंपनीच्या तालुका व जिल्हा प्रतिनिधी यांच्याशी संपर्क करावा.
तसेच शेतकऱ्यांना नुकसानीच्या माहितीचे लेखी अर्ज देखील तालुका कृषी अधिकारी कार्यालयात करता येतील. अधिक माहितीसाठी संबंधित कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक व मंडळ कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक श्रीमती उज्वला बाणखेले यांनी केले आहे.
विमा प्रतिनिधींचा संपर्क क्रमांक पुढीलप्रमाणे - रायगड जिल्हा प्रतिनिधी - राजेश गायकवाड (मो. क्र. 9850237334 7208956097), तालुका प्रतिनिधी अलिबाग - वैभव घरत (9764284186, 8668295249), कर्जत - महेश साळवी (मो.क्र. 9373625010 8888562765), खालापूर - अंकुश शेलार (मो. क्र 9765076478, 7798676518), महाड - जय धारिया (मो. क्र. 8793463619), माणगाव - सनी साळवी (मो. क्र 8830153429, 9403132916), म्हसळा - प्रमोद जाधव (मो 7588347376), मुरुड - राहुल लांडगे (मो. क्र. 8308006600), पनवेल - अजित रिंगे (मो. क्र 9702029142, 8169427080),पेण - आशीर्वाद जाधव (मो. क्र. 9767887765, 9422027765), पोलादपूर - आदित्य कसुरडे (मो. क्र. 8793463619), रोहा - जितेंद्र पाभरेकर (मो. क्र. 8378806936), श्रीवर्धन - सुरेश गोरे (मो. क्र. 8698984684, 9420480389), सुधागड - आशीर्वाद जाधव (मो. क्र. 9767887765, 9422027765), तळा - जितेंद्र पिंपळे (मो. क्र. 8308195611, 8668295249), उरण - अतिश गायकवाड (मो. क्र. 7066152766).
गुरुवार, २२ जुलै, २०२१
राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन
आ. वा. वृत्तसेवा , मुंबई - लयभारी आदिवासी विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री प्रशांत लाड (दादा) यांच्या वाढदिवसानिमित्त ईगल न्यूज चँनलच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे तसेच महान महाराष्ट्राचा पैलू वक्तृत्वाचा या विशेष उपक्रमांतर्गत सर्व सहभागी स्पर्धकांना तज्ञ मंडळींचे मोफत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेचे गट एक (इयत्ता १ ली ते ५ वी) विषय-१)मोबाईल माझा दोस्त २) माझी शाळा ३)माझी आई, गट दोन (इयत्ता ६ वी ते १० वी)~विषय-१) ऑनलाइन शिक्षण २) वाचाल तर वाचाल ३) माझा आवडता नेता, खुला गट~ विषय १) कोरोना आणि सामाजिक बांधिलकी २ )कोरोना कालावधीतील पत्रकारांचे योगदान ३ )कोरोना योद्धे
सदर स्पर्धेसाठी सर्व गटासाठी प्रवेश फी दहा रुपये राहील. स्पर्धकांनी व्हिडीओ एडीट न करता ,मोबाईल आडवा धरुन रेकॉर्ड करुन दिलेल्या नोंदणी क्रमांकावर पाठवावा.परिक्षकांचे ७५ ℅ व व्हिडीओच्या व्हयुजसाठी २५℅ गुण असतील.आयोजकांचा स्पर्धेसंदर्भातील कोणताही निर्णय अंतिम राहील. स्पर्धेचा निकाल ९ सप्टेंबर २०२१ रोजी जाहिर करण्यात येईल. स्पर्धेतील व्हीडीओ स्विकारण्याची अंतीम तारीख ५ ऑगस्ट २०२१ राहील.
एका स्पर्धकाने एकाच विषयाचा व्हीडीओ पाठवावा.व्हीडीओ सोबत स्पर्धकाचे नाव,शाळेचे नाव, संपुर्ण पत्ता,गट क्रमांक, संपर्क (व्हाटसाप) क्रमांक,स्पर्धकाचा एक आयडेंटिटी साईज फोटो इत्यादी माहिती पाठवायची आहे .नाव नोंदणी व व्हीडीओ पाठवण्याचा व्हॉटसाप व कॉलींग क्रमांक 7066731503 (फोन सायंकाळी सहा ते सात याच वेळी घेतला जाईल.)प्रवेश फी 7447330608 या क्रमांकावर पाठवून .लगेच प्रवेश फी पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवावा व नाव पाठवावे
या स्पर्धेत महाराष्ट्रासह अन्य राज्यातील मराठी भाषिक स्पर्धक सहभागी होवू शकतात.या स्पर्धेतील सर्व गटातील विजेत्यांना अनुक्रमे २५०१रु, १५०१रु,१००१ रु व प्रमाणपत्र तसेच सर्वाधिक व्हयुजसाठी ५०१ रुपयांचे स्वतंत्र पारितोषिके व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या मुख्य संयोजन समितीमध्ये डॉ.संजय संजय सोनावणे (पनवेल),श्री शिरीष कुलकर्णी (पुणे),डॉ.महेश थोरवे-पाटील,श्री बाबासाहेब राशिनकर (गुहागर), सौ.शालन विलासराव कोळेकर (खंडाळा),श्री सागर पाटील (रत्नागिरी),श्री शेखर सुर्यवंशी (सांगली), श्री भगवान देवकर (कुरळप),अनील भालेकर(जालना),श्री बाळ तोरसकर (गोवा),श्री राजेंद्रकुमार ढगे (वसई ),प्रा.रावसाहेब राशिनकर (अहमदनगर),प्रा.महेश मोटे व डॉ.एस.एस.कनाडे (उस्मानाबाद),श्री माधव अंकलगे व श्री प्रकाश वंजोळे (खंडाळा) यांचा समावेश करण्यात आला आहे.
नवीन करंजा मत्स्य बंदरांची सहा फुटाने उंची वाढवा; खासदार श्रीरंग बारणे यांची मत्स्यव्यवसाय मंत्र्यांकडे मागणी
नवीन बंदरामुळे मच्छिमारांना येत असलेल्या अडचणी, समस्या खासदार बारणे यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री पुरुषोत्तम रुपाला यांची दिल्लीत प्रत्यक्ष भेट घेतली. मच्छिमारांना येणाऱ्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
खासदार बारणे म्हणाले, नवीन करंजा मत्स्य बंदराचे काम अंतिम टप्प्यात आहे. 'ग्लोबल वॉर्मिंग'मुळे बंदराची उंची कमी केली जात आहे. ते धोकादायक आहे. जोरदार हवामानामुळे समुद्रातील लाटांचे पाणी आतमध्ये शिरुन मासेमारी नौकांचे नुकसान होऊ शकते. बंदराचे काम पूर्ण झाल्यानंतर उंची वाढविल्यास काम एकजीव होणार नाही. मासेमारी नौकांची ठोकर लागून काम पडून जाईल. त्यासाठी आत्ताच कंरजा बंदराची 5 ते 6 फुटाने उंची वाढवावी. सध्या तयार केलेला नौकानयन मार्गाची ( अॅप्रोच चॅनेल) फक्त 50 मीटर रुंद आहे. याचा अर्थ ऑपरेशन्ससाठी फक्त 40 मीटर वापरली जाईल. यामुळे चॅनेलमध्ये मासेमारी करणाऱ्या बोटींसाठी वाहतुकीची कोंडी होईल. फिशिंग बोटींच्या सुरक्षिततेसाठी आणि सुलभतेसाठी या वाहिनीचा आकार 20 मीटर पर्यंत वाढविणे आवश्यक आहे. याची लांबी 70 मीटर असावी. ब्रेकवॉटरच्या भिंतीची लांबी खूपच लहान आहे. खराब हवामान आणि जोरदार वारा आल्यास मासेमारीसाठी बोटींना अडचणी येतील. त्यामुळे त्याची लांबी सध्याच्या लांबीपेक्षा कमीतकमी 150 मीटरने वाढवावी.
प्रकल्पाच्या दक्षिणेकडील भागात (करंजा फिशिंग हार्बर) फक्त दगडी भिंत बांधली जाणार आहे. ही संसाधने व जागेचा अपव्यय ठरेल. त्यासाठी काँक्रीटीकरणाची भिंत बांधावी. जेणेकरुन त्यात मासेमारी होडीची क्षमता वाढेल. इंजिन दुरुस्त करण्यासाठी तसेच मासेमारी करणाऱ्या बोटींच्या इतर दुरुस्तीसाठीही याचा उपयोग होईल. बंदराच्या बांधकामुळे करंजा नवपाडा येथील नैसर्गिक ड्राय डॉग प्रकल्प विस्थापित झाला आहे. या पर्यायी बंदराच्या संरक्षणासाठी वादळी वारा सुरक्षिततेची काळजी घ्यावी. एक बोट दुसऱ्या बोटीवर आपटू नये यासाठी बांधलेल्या ब्रेक वॉटरची आत्ताची लांबी 200 मीटर आहे. त्यात 150 मीटरने वाढ केली पाहिजे. जेणेकरुन काम करत असलेल्या बोटींचे नुकसान होणार नाही.
करंजा मत्स्य बंदर बहुउद्देशीय वापरासाठी 20 एकर जमीन पुरवतो. यामुळे भविष्यात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा विकसित होतील. स्थानिक तरुणांना अधिक रोजगार उपलब्ध होईल. फिशिंगवर आधारित उपक्रमांना संधी मिळेल. महिला सक्षमीकरण होऊन स्थानिक महिला मासेमारीच्या कामांमध्ये तसेच विक्रीपासून ते प्रक्रियेपर्यंत सहभाग घेतील, असेही खासदार बारणे यांनी निवेदनात म्हटले आहे.यामुळे आता उंची वाढविण्याचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
मोरा पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दारुड्यांचा हैदोस ; महिलांची सुरक्षितता धोक्यात
उरण - उरण शहरातील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयासमोर मोरा पोलीस स्टेशनच्या इमारतीचे बांधकाम अर्धवट स्थितीत आहे. तिथे वीज सुद्धा नाही. सदर परिसरात पोलिस स्टेशनचे इमारतीचे बांधकाम सुरू आहे. मात्र या ठिकाणी कोणीही नसल्याचे पाहून दारुडे,गर्दुले यांनी आपले ठाण मांडले आहे. आपला बसतानच येथे मांडला आहे.दररोज येथे काही व्यक्ती दारू पिण्यासाठी येत आहेत. येथून जवळच असलेल्या रस्त्यावरून येणार्या जाणार्या महिलांना, मुलींना याचा नाहक त्रास होत आहे.त्यामुळे महिलांची सुरक्षितता यामुळे धोक्यात आली आहे. सदर या परिसरात दारू पिणारे,टाइमपास करणाऱ्यांवर कडक कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उरण तालुका संघटक सतीश पाटील, विभाग प्रमुख विभाग अध्यक्ष अनिकेत पाटील यांनी उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रवींद्र बुधवंत यांच्याकडे केली आहे.
उरण पोलीस ठाण्याचे बांधकाम सुरू आहे. या ठिकाणी कोणी अवैध आणि बेकायदेशीर कामे करत असतील, महिलांना त्रास देत असेल तर त्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे रवींद्र बुधवंत यांनी सांगितले. या समस्या बाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र बुधवंत यांनी तपास करण्याचे व संबंधितांवर कायदेशीर करण्याचे आदेश उरण पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांना दिले आहेत.
शिवसपंर्क अभियानाच्या माध्यमातून नगरपरिषदेवर भगवा फडकविण्याचा संकल्प
मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे यांचा 27 जुलै रोजी वाढदिवस असल्याकारणाने तसेच शिवसंपर्क अभियानाचे औचित्य साधून शिवसेना शहर शाखेतर्फे नागरिकांना मास्कचे वाटप तसेच गरजू विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी आमदार तथा शिवसेना रायगड जिल्हाप्रमुख मनोहरशेठ भोईर, उपजिल्हा प्रमुख नरेश रहाळकर,जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT )चे विश्वस्त -दिनेश पाटील, उपजिल्हा संघटक -ममता पाटील, कोकण कार्याध्यक्ष शिक्षक सेना -कौशिक ठाकूर, उपजिल्हा अध्यक्ष -अन्वर कुरेशी,कक्ष जिल्हा प्रमुख -गणेश म्हात्रे,उरण तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संघटक -बी एन डाकी, तालुका संपर्क प्रमुख -जे पी म्हात्रे,तालुकाध्यक्ष अवजड वाहतूक सेना -चेतन म्हात्रे,तालुका संघटिका -सुजाता गायकवाड,विधानसभा अध्यक्ष एजाज मुकादम, युवा सेना पदाधिकारी -निलेश पाटील, शहर संपर्क प्रमुख -गणेश म्हात्रे,कामगार नेते महादेव घरत,उरण नगर परिषदेचे गटनेते गणेश शिंदे,नगरसेवक अतुल ठाकूर,नगरसेवक -समीर मुकरी,नगरसेविका वर्षा पाठारे, नगरसेविका विद्या म्हात्रे,माजी नगरसेवक निलेश भोईर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
शिवसंपर्क अभियानंतर्गत शहर शाखेतर्फे भरविलेल्या सभेत उपस्थितांना माजी आमदार मनोहरशेठ भोईर, दिनेश पाटील, नरेश रहाळकर, संतोष ठाकूर, गणेश शिंदे आदि मान्यवरांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना आवाहन करताना म्हणाले की शिवसेना हा एकमेव पक्ष आहे ज्याने कोरोना काळात उरण तालुक्यातच नाही तर संपूर्ण राज्यात उत्तम काम केले आहे. म्हणूनच एका संस्थेच्या सर्वे नुसार भारतात श्री उद्धव ठाकरे हे एक नंबरचे मुख्यमंत्री ठरले आहेत. शिवसंपर्क अभियानाच्या माध्यमातून शिवसेना प्रत्येकाच्या घराघरात पोहोचली पाहिजे. शिवसेनेच्या माध्यमातून उरण शहरात, उरण तालुक्यात शिवसेनेने अनेक कामे केली आहेत. अनेक गोरगरिबांना मदतीचा हात दिला आहे. कोरोनामध्ये अनेकांचे प्राण वाचविले आहेत.उरणचे विद्यमान आमदार महेश बालदी यांनी रांगोळी प्रदर्शन, कंदील प्रदर्शन, चित्रकला प्रदर्शन भरविले. याच्यापलीकडे त्यांनी काहीही केलेले नाही.मात्र शिवसेनेने नेहमी 80 % समाजकारण तर 20 % राजकारण केले आहे.उरण मध्ये जनतेचे सर्वाधिक काम शिवसेनेने केले आहे. नागरिकांच्या मदतीला धावून येणारा कोणता पक्ष असेल तर तो शिवसेना पक्ष आहे. जनतेचा सर्वाधिक विश्वास शिवसेनेवर असल्याने उरण तालुक्यात, रायगड जिल्ह्यात संबंध महाराष्ट्रात विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच मुस्लिम बांधवही मोठया प्रमाणात शिवसेनेत पक्ष प्रवेश करत आहेत. येत्या काही महिन्यात उरण नगर परिषदेचे निवडणुका असून या नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उरण नगर परिषदेत जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील, नगर परिषदेवर शिवसेनेचा भगवा कसा फडकेल याकडे लक्ष द्यावे. नगर परिषदेवर भगवा फडकविण्यासाठी सर्वांनी मेहनत घ्यावी. असे आवाहन मनोहरशेठ भोईर यांनी केला . उरण नगर परिषदेवर यावेळी शिवसेनेचा भगवा फडकविणारच असा निर्धार शिवसेनेच्या विविध पदाधिकारी कार्यकर्त्यांनी केला. या शिवसंपर्क अभियानात शिवसेनेने भाजप पक्षावर जोरदार हल्ला चढवीला. गणेश शिंदे, संतोष ठाकूर यांनी भाजपचा खरपूस समाचार घेतला.
उरण शहर प्रमुख विनोद म्हात्रे, शहर संघटक -भूषण घरत, दिलीप रहाळकर, उपशहर प्रमुख -कैलास पाटील, अरविंद पाटील, गणेश पाटील, शहर प्रमुख युवा सेना नयन भोईर, शहर संघटिका -विना तलरेजा, मेघा मेस्त्री, शहर संपर्क संघटिका -श्रद्धा सावंत, श्रीमती वंदना पवार, उपशहर संघटिका रजिया शेख या शहर शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी सदर शिवसंपर्क अभियान सभा यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन आदर्श शिक्षक महेश गावंड यांनी केले.
प्रसिद्ध अभिनेते, साहित्यिक, कवी आणि पत्रकार यांच्या उपस्थितीत आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार सोहळा संपन्न..!
मुंबई-दादर (प्रतिनिधी गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सो...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...