मुंबईत रविवारी चेंबूर,विक्रोळी व ठाणे येथील दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत एकूण ३२ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर मुंबई व ठाणे परिसरातील डोंगरावर राहणारे नागरिक व अतिधोकादायक इमारतीमध्ये राहणारी कुटुंब यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून पावसाळा सुरू होण्यापूर्वी महानगरपालिका धोकादायक इमारतींची यादी जाहीर करते व रहिवाशांना इमारत खाली करण्याची नोटीस बजविते.काही कुटुंबांचे संक्रमण शिबिरात स्थलांतर करते,पण असे असले तरी अनेक कुटुंब आपली मूळची घरे सोडण्यास तयार नसतात व त्याच ठिकाणी धोकादायक स्थितीत वास्तव्य करतात व अनेकवेळा मुसळधार पावसात या इमारती कोसळतात व जीवितहानी होते.तेव्हा अशा इमारतीमधील लोकांना स्थलांतरित करणे मोठे जिकरीचे काम महानगरपालिकेसमोर असते. त्याचप्रमाणे डोंगरावर राहणाऱ्यांची घरे देखील दिवसेंदिवस वाढत असतात,पण याकडे पालिकेचे लक्ष नाही व चिरीमिरी घेऊन अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात,तेव्हा हे जर असच सुरू राहील तर दरवर्षी अशा दुर्घटना होतच राहणार व शासन मदत जाहीर करून मोकळे होते.तेव्हा या सर्व परिस्थितीला स्थनिक प्रशासन व नागरिकही तितकेच जबाबदार आहेत.तेव्हा हे सर्व वेळीच थांबायला हवं,नाहीतर जीव जातच राहतील.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा