आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २ मे, २०२६

मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन

वृत्तपत्र लेखकांचे काम समाजासाठी जागल्यांचे - पद्मश्री उदय देशपांडे 
 मुंबई (रवींद्र मालुसरे ) : समाजातली एखादी गोष्ट चांगली असो वा वाईट हे दृष्टीस पडल्यानंतर वृत्तपत्रलेखक अधिक अस्वस्थ होतो. हातात लेखणी घेऊन ती घटना किंवा लोकांना भेडसावणारी समस्या तो लिहितो आणि एखाद्या दैनिकाकडे पाठवत नाही तोपर्यंत त्याला झोप येणार नाही. भले ती छापून येईल कि नाही याची पर्वा त्याला नसते परंतु समाजातल्या जागल्याची भूमिका घेत आपण व्यक्त होऊ शकलो याचे त्याला समाधान असते.मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबई ही संस्था महाराष्ट्रातील अशा हजारो जागल्याना एकत्र करून सातत्याने अनेक कार्यक्रम - उपक्रमांच्या माध्यमातून गेली ७५ वर्षेतून अधिक काळ चळवळीच्या रूपात कार्यरत आहे. समाजाच्यादृष्टीने हे काम फार महत्वाचे आहे असे उदगार पदमश्री उदय देशपांडे यांनी काढले.

मराठी वृत्तपत्र लेखक संघ मुंबईचे माजी अध्यक्ष मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच दादर येथे नवशक्तीचे संपादक प्रकाश सावंत आणि माजी संपादक प्रकाश कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडले त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.
     वृत्तपत्र लेखक आणि नवशक्तीचा जमका सदर याचे ऋणानुबंध प्रभाकर पाध्ये यांच्याकाळापासून गेली ७५ वर्षे आहेत. दररोज सर्वाधिक पत्रे नवशक्तीकडे येतात हे नाते जपण्यासाठीच त्यांना आमच्याकडून पूर्ण पानभर प्रसिद्धी दिली जाते. यापुढच्या काळात वृत्तपत्रलेखकांकडून अभ्यासपूर्ण परंतु परखडपणे लिहावे अशीही आमची इच्छा आहे असे आवाहन नवशक्तीचे संपादक प्रकाश कुलकर्णी याप्रसंगी काढले. मधू शिरोडकर यांचे पत्रलेखक आणि वृत्तपत्रलेखक संघासाठी किती महत्वाचे आहे याचे विवेचन नवशक्तीचे माजी संपादक प्रकाश कुलकर्णी केले. वाचकांची मते किती महत्वाची आहे हे स्पष्ट करताना जगभरातील वर्तमानपत्रांमध्ये संपादकीय पानावर अनेक सुप्रसिद्ध लोकांनी केले आहे, चर्चिल आणि ब्रिटिश साहित्यिकांचे दाखले त्यांनी यावेळी दिले. ज्येष्ठ साहित्त्यिक अशोक बेंडखळे यांनी संस्थेचा पत्रवृत्तान्त लिहिताना संस्थेची वाटचाल आणि इतिहास कसा प्रगल्भ आहे हे सांगितले.मधू शिरोडकर यांनी ५० वर्षांपूर्वीची संघाची वाटचाल आणि जुन्या कार्यकर्त्यांच्या आठवणी सांगितल्या. यावेळी माजी उपमहापौर अरुण देव, संघांचे माजी अध्यक्ष विजय कदम, माजी प्रमुख कार्यवाह विश्वनाथ पंडित, नंदकुमार रोपळेकर आणि दत्ताराम घुगे यांचीही भाषणे झाली.
    संघाचे अध्यक्ष रवींद्र मालुसरे यांनी प्रस्थाविक केले तर कार्यक्रम प्रमुख दिगंबर चव्हाण यांनी सूत्रसंचालन आणि माजी अध्यक्ष मनोहर साळवी यांनी आभार प्रदर्शन केले. 
     महाराष्ट्र राज्य आणि मराठी माणसांचे मूलभूत प्रश्न सातत्याने सेवाभावीवृत्तीने व निर्भीडपणे आपल्या लेखणीतून सातत्याने पदरमोड करून जनजागृतीचे काम हे करीत आहेत अशा सर्वश्री विश्वनाथ पंडित, अरुण खटावकर, लीना वालावलकर श्रीनिवास डोंगरे, राजन देसाई, भाऊ सावंत, दीपक गुंडये, गुरुनाथ तिरपणकर, संजय साळगावकर, सूर्यकांत भोसले, अनंत दाभोळकर, नितीन कदम, दत्ता खंदारे,शिरीष बने, कमलाकर जाधव, पंकज पाटील, रामचंद्र जयस्वाल या पत्रलेखकांचा संघाच्या वतीने "निर्भीड जागल्या " पुरस्कार प्रदान करून यावेळी सन्मानित करण्यात आले. तर पत्रस्पर्धेतील यशस्वी ठरलेल्या विजय ना कदम, मधुकर कुबल, नीता शेरे, रामचंद्र मेस्त्री,प्रा. जयवंत पाटील यांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.


डोंबिवली येथील आगरी समाज प्रबोधन संस्था आयोजित सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात साजरा ; सोहळयाचे यंदा ६ वे वर्षे

मुंबई : (सतिश पाटील ) पिंपळेश्वर महादेव मंदिर मैदान,मानपाडा रोड,सागांव डोंबिवली पूर्व येथे सामुदायिक विवाह सोहळा आयोजित केला जातो.
आतापर्यत सामुदायिक विवाह सोहळयात ३९ शुभलग्न धुमधक्यात संपन्न झाले आहेत. यंदा ७ शुभविवाह धुमधडाक्यात पार पडली. याचे श्रेय आगरी समाज प्रबोधन संस्था सर्व कार्यकर्ते तसेच मा. आमदार राजूदादा पाटील यांना जाते. कारण प्रत्येक जोडप्यास एक लाख रूपये मानधन दिले जाते. आणि पुढेही देणार भले कितीही लग्न जुळूदे असे मा.आमदार राजूदादा पाटील यांनी व्यासपीठावर जाहीर केले. त्यांनी संस्थेचे ही कौतुक केले.ज्याच्या कडे भरपूर पैसा आहे अशा लोकांनी जरूर आपल्या कुवती प्रमाणे लग्न कार्यात खर्च करावा. पण कर्ज काढून आयुष्यभर हप्ते भरत बसू नये. त्याला पर्याय म्हणून आगरी समाज प्रबोधन संस्थेत नाव नोंदणी करून सामुदायिक विवाह सोहळा उत्तम पर्याय आहे. 
        येथे आपल्या घराच्या सारखा लग्नसोहळा आयोजित केला जातो. वधुवर व आपले वराडी उपस्थित राहायचे आहे. भटजी,हारतुरे, पोळापापडी, सर्व धार्मिक विधी होम हवन, स्टेज,डेकोरेशन, बुफे
जेवणापासून,आईसक्रीम, वेलकम ड्रीक, बँड बाजा, वरात उपलब्ध करून दिले जाते, कशाचीही कमी नसते. त्यासाठी आगरी समाज प्रबोधन संस्थेचे कार्यकर्ते नोव्हेंबर पासून वधुवर फोटो व बायोडाटा सह नोंद करून मेळावे भरवते. इच्छुक वधुवर व नातेवाईकांना समोरासमोर बोलून पंसती केली जाते अविरत व दिवसरात्र निमंत्रण पासुन ते मदतीचा निधी गोळा करण्याचे काम आपल्या घरचेच लग्न समजून आवडीने करत असतात.प्रत्येक जण कामे वाटून घेतात. संस्थेत काही रिटायर्ड तर काही आपला कामधंदा सांभाळून वेळ देतो."ऐकमेका साह्य करू अवघे धरू सुपंथ" संस्थेचे उद्दिष्ट कोणी आर्थिक अनावश्यक खर्च व कर्ज करू नका. फक्त आपली वधुवर नोंदणी करा आपल्या प्रथा व परंपरा जपा वायफळ अनावश्यक खर्च टाळा. काहीचा गैरसमज अमुक लोक सामुदायिक विवाह सोहळ्यात सहभाग घेतात.पण यावर्षी वकीली केलेले वधुवरही सहभागी झाले होते. या सोहळ्यात सर्व पक्षीय नेते, समाज बांधव, प्रतिष्ठित मंडळी सहभागी होवून वधूवरांना शुभ आशीर्वाद व शुभेच्छा देतात. या महान समाजकार्याला वस्तूरुपी आणि पैसे रुपात सढळ हस्ते मदत करणाऱ्यांचे मनापासून धन्यवाद! दिल्याने धन कमी होत नाही आणि सत्कार्य केल्याचा आनंद व अभिमान वाटतो मी काहीतरी मदत केली जीवन सार्थकी लागले "मानव जन्म एकदाच नाही पुनर्जन्म"!

मधू शिरोडकर यांच्या कालप्रवाह पुस्तकाचे प्रकाशन

वृत्तपत्र लेखकांचे काम समाजासाठी जागल्यांचे - पद्मश्री उदय देशपांडे    मुंबई (रवींद्र मालुसरे ) : समाजातली एखादी गोष्ट चांगली अस...