आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, ३१ ऑगस्ट, २०२६

ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद

गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला भेट देत अनोख्या पद्धतीने ईदचा सण साजरा केला.
      या उपक्रमाच्या माध्यमातून आश्रमातील मुलांना ‘सर्व धर्म समभाव’ ही शिकवण देण्यात आली. तसेच ईद हा सण का साजरा केला जातो आणि या दिवशी कोणत्या परंपरा व प्रथा पाळल्या जातात, याबाबत मुलांना माहिती देण्यात आली.
      यावेळी मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला वैशाली गुरव, हसनैन झटाम, महेक झटाम तसेच अंकुर आश्रमाचे कार्यकारी अधिकारी अलेक्झांडर उपस्थित होते. अलेक्झांडर यांनीही मुलांना मार्गदर्शन केले.
    आश्रमातील मुलांच्या विविध कलागुणांना व कौशल्यांना वाव मिळावा यासाठी मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही अध्यक्ष मुस्कान झटाम यांनी यावेळी दिली.
      दरम्यान, आश्रमातील मुला-मुलींनी विविध कौशल्ये व कलागुण शिकण्याची इच्छा व्यक्त करत त्याबाबत मुस्कान झटाम यांच्याकडे मागणी केली. या उपक्रमामुळे मुलांमध्ये एकात्मता, बंधुभाव आणि सर्वधर्मसमभावाची भावना रुजण्यास मदत झाली.

रविवार, ३० ऑगस्ट, २०२६

सलीम भाईंना दिल्या ईद च्या शुभेच्छा !

सन्मा सलीम भाई आणि माझी ओळख होऊन जवळपास २५ वर्षा पूर्वी झाली.मी त्यावेळी बॅचलर होतो.जोगेश्वरी वेस्ट येथे माल्कम बाग या पारशी कॉलनीत आमच्या सेवानिवृत्त शिक्षका फ्रेनी मदन यांच्या मोठ्या घरात ग्रुप ट्युशन घेत असे.त्यावेळी पैसे देखील चांगले मिळायचे.आठवड्यातून तीन दिवस साधारण दोन तास दहा मुलांना मराठी हिंदी शिकवायचो. पारशी मुलांना मराठी हिंदी प्रॉपर येत नसे.त्यामुळे त्यांना मराठी हिंदी शिकविणारे शिक्षक लागतच असायचे.महिन्याला साधारण १५ ते २० हजार मिळायचे..कालांतराने माझा विवाह झाला आणि नंतर आमच्या गार्गी जन्मानंतर ग्रुप ट्युशन घेणे बंद केलं.
   सलीम यांचे धड्याळ दुरुस्तीचे दुकान माझ्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर होते आणि आजही आहे.काही कामानिमित त्यावेळी झालेली मैत्री आजही कायम असून अधूनमधून कामानिमित्त तर कधीतरी खास भेटण्यासाठी गप्पागोष्टी करण्यासाठी त्यांच्याकडे जाणे होते. आज जोगेश्वरी स्टेशन येथे काही कामानिमित्त गेलो होतो तर सलीम भाई यांच्याकडे खास त्यांना ईद च्या शुभेच्छा देण्यासाठी गेलो होतो.मला पाहून त्यांना आनंद झाला.साधारण अर्धा तास तिकडे होतो..अनेक विषयांवर चर्चा झाली.सलीम भाई यांना देखील अन्यायाविरुद्ध चीड येते.अनेकदा ते मला फोन करून काही घटनांबद्दल बोलतात.व्हिडिओ पाठवतात.निघताना त्यांनी मला ऊसाचा रस पाजला आणि गणेश सर मिलते रहेंगे असे सांगायला देखील ते विसरले नाहीत. एकत्र फोटो काढला आणि त्यांची रजा घेऊन निघालो. दैनंदिन जगताना दररोज एखाद्या चांगल्या व्यक्तीशी सल्ला मसलत होणे गरजेचे आहे.

-गणेश हिरवे
जोगेश्वरी पूर्व

ईदच्या निमित्ताने अनोखा उपक्रम; अंकुर आश्रमात साजरी केली ईद

गडब( अवंतिका म्हात्रे)- मन्नत मल्टिपर्पज असोसिएशनच्या माध्यमातून अध्यक्ष मुस्कान रफिक झटाम व त्यांच्या परिवाराने अंकुर आश्रमाला ...