आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, १९ जून, २०२६

बालसंस्कार व युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या ममता मसुरकर यांचा गौरव

ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्वोत्तम व्यक्तिमत्त्व सन्मान सोहळा २०२६’ मध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव करण्यात आला. यामध्ये शैक्षणिक, सामाजिक व युवक विकास क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल हॅप्पी हार्ट स्कूलच्या संचालिका सौ. ममता मसुरकर यांना सर्वोत्तम शैक्षणिक सेवा पुरस्कार २0२६ याने सन्मानित करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ अभिनेते दिलीप केदार यांनी आपल्या मनोगतात शिक्षण आणि संस्कार यांचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की, "बालकांमध्ये चांगले संस्कार, सामाजिक जाणीव आणि नैतिक मूल्ये रुजविण्यासाठी कार्य करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा गौरव होणे ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. आजची संस्कारित पिढी उद्याच्या सक्षम राष्ट्राची पायाभरणी करीत असते. अशा कार्यकर्त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी ठरते."
सौ. ममता मसुरकर या गेली अनेक वर्षे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून बालवयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत. त्यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये सुसंस्कृतपणा, शिस्त, आत्मविश्वास, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी यांचे संस्कार रुजविण्याचे कार्य सुरू ठेवले आहे. शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या मानसिक, बौद्धिक आणि सांस्कृतिक विकासाला प्राधान्य देणारी त्यांची कार्यपद्धती विशेष उल्लेखनीय मानली जाते.
       सौ. मसुरकर या हॅपी हार्ट फाउंडेशन, ठाणे या संस्थेच्या संस्थापक-अध्यक्षा असून संस्थेच्या माध्यमातून युवक, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. व्यक्तिमत्त्व विकास शिबिरे, सामाजिक जनजागृती मोहिमा, शैक्षणिक मार्गदर्शन, सांस्कृतिक कार्यक्रम आणि युवकांना सकारात्मक दिशा देणारे अनेक उपक्रम त्यांनी यशस्वीपणे राबविले आहेत.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पारनेर पंचायत समितीचे माजी सभापती खंडोजी भुकन होते. त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात समाजात संस्कारक्षम आणि जबाबदार पिढी घडविण्यासाठी कार्य करणाऱ्या शिक्षक व सामाजिक कार्यकर्त्यांच्या योगदानाचे कौतुक केले. तसेच युवकांना योग्य दिशा देण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमास व्यासपीठावर ‘जावई जोरात’ फेम दिगंबर गरुड, जयश्री ॲग्रोचे संचालक गणपतराव शिंदे, कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष व आयोजक प्रा. डॉ. बी. एन. खरात (युनिव्हर्सल युनिटी फाउंडेशन) तसेच निमंत्रक निर्णय राऊत (अध्यक्ष, आंबोली टुरिझम) यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती.
महाराष्ट्रासह विविध राज्यांतील कलाकार, समाजसेवक, शिक्षणतज्ज्ञ, साहित्यिक, पर्यावरणप्रेमी आणि विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने या कार्यक्रमास उपस्थित होते. सौ. ममता मसुरकर यांनी शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले.
     संस्कार, शिक्षण आणि सामाजिक बांधिलकी या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्याचे कार्य करणाऱ्या सौ. ममता मसुरकर यांचा सन्मान हा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

बुधवार, १७ जून, २०२६

मुंबई येथे " राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन संमेलन संपन्न"

मुंबई : "पुरस्कारा मुळे व्यक्तीच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते.त्यामुळे त्या व्यक्तीची ऊर्जा शतपटीने वाढते.भावी काळात आपल्या उत्तम कार्याचा आलेख उंचावण्याची त्यांना प्रेरणा प्राप्त होते."असे भावपूर्ण उदगार सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले.कार्य दर्पण युट्युब चॅनेल व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गआयोजित राष्ट्रीय कार्य दर्पण संमेलन व सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनिल आगावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था कार्य दर्पण पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्राशी सुसंवाद साधते. कर्करोग शास्त्रज्ञ डॉ.अमजद खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की  "संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबवून चांगले कार्य केले आहे.त्यामुळे पुरस्कारार्थींना प्रोत्साहन मिळून त्यांचे मनोबल वाढते.त्यांची प्रगती होते." 
     कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना संस्थेचे संस्थापक एन.डी.खान यांनी सांगितले की, "पुरस्कारामुळे सेवाव्रतींना त्यांच्या चांगल्या कार्याची पोच-पावती मिळते.भावी पिढीस त्यांच्या उपक्रमाची जाणीव होते..समाज भूषण उत्तमराव तरकसे यांनी संस्थेने कार्य दर्पण पुरस्काराचे सातत्य ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.
     सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कदम यांनी ओघवत्या भाषेत केले.तर पुरस्कार सोहळ्याचे निवेदन निवेदिका व साहित्यिका सौ.अनघा जाधव यांनी त्यांच्या खास शैलीने केले.
     महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या पुरस्कार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे विशेष अधीक्षक डॉ.जे.के.महाडिक, कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर ,लोककला लोकनृत्य अभ्यासक, संशोधक व नृत्य दिग्दर्शक पंकज पाडाळे,लोकनृत्यनिपुण वेसावकर, बेन्ज Hospital चे चेअरमन डॉ.आबिद सय्यद , कार्टर रेस्टॉरंट चे चेअरमन मेहबूब खान, साहित्यिक व शीघ्र कवी प्रा.जमील कमील. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सौ.सलमा खान ह्या सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक होत्या.
 वेसावकर फेम तथा कोळी नटसम्राट राजेश खर्डे यांनी मी है कोळी या कोळी गीतावर पुरस्कारार्थी सोबत केलेले नृत्य व रोशन मोडकले यांच्या विद्यार्थ्यांना सादर केलेले नृत्य व तीन वर्षांच्या चिमुकली कु.बावनथडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला जयजयकार कार्यक्रमाचे‌ विशेष आकर्षण ठरले 
    डॉ.विजय मोरे यांच्या आभार प्रदर्शना्ने कार्यक्रमाची सांगता झाली.  डॉ .ईसा शेख , विजय भोसले, शब्दश्री विलास देवळेकर, राजकुमार ताकमोगे,सौ. मीना ताकमोगे, प्रतिभा किर्तीकर्वे , गुलाब सलाट, इत्यादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.शब्दश्री विलास देवळेकर यांचे" राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार" या आद्य अक्षराने केलेल्या कवितेचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधत होते.

बालसंस्कार व युवक विकासासाठी कार्य करणाऱ्या ममता मसुरकर यांचा गौरव

ठाणे(प्रतिनिधी-गुरुनाथ तिरपणकर) जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘सर्...