आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २० एप्रिल, २०२४

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

मुंबई-परळ ( गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिकाजी तेटांंबे यांनी आपल्या दुसऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय, सुरेंद्र गावसकर हॉल, दुसरा मजला, नायगांव, दादर (पूर्व) येथे शनिवारी दिनांक २० एप्रिल रोजी सायंकाळी ४ वाजता सिने-नाट्य क्षेत्रांतील तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजीत केले असुन या सोहळ्यात विजेत्या लघुपटांना रोख पारितोषिके आणि पुरस्कार प्रदान करण्यात येणार आह़े. शिवाय कला, सामाजिक, शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तळागाळातील कलावंत, तंत्रज्ञ यांना रंगकर्मी, कलाभूषण, समाजभूषण तसेच जीवनगौरव आदी पुरस्कार प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात येणार आह़े. या सोहळ्यात उपस्थित मान्यवर म्हणुन "कुटुंब रंगलंय काव्यात" चे सादरकर्ते प्रा.विसुभाऊ बापट, प्रसिद्ध ज्येष्ठ कवी अरुण म्हात्रे, प्रसिद्ध विनोदी अभिनेते विजय पाटकर, प्रसिद्ध समाजसेवक खलील शिरगांवकर, संजय सावंत, एन.डी.खान, प्रसिद्ध अभिनेत्री सिद्धी कामथ, गीता कुडाळकर, दै.आपलं नवे शहर चे उपसंपादक राजेंद्र घरत, जनजागृती सेवा संस्थेचे अध्यक्ष गुरुनाथ तिरपणकर, प्रसिद्ध अभिनेते आणि निवेदक विलास (बाळा) चोकेकर, अँड.सुनिल शिर्के, डॉ.किशोर खुशाले, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या लघुपट सोहळ्यासाठी लेखक, दिग्दर्शक व अभिनेता अनंत सुतार, अभिनेता,निर्माता सुरेश डाळे व ग्राफीक डिझायनर, समाजसेवक मनिष व्हटकर, अभिनेत्री लक्ष्मी गुप्ता आणि सोनाली पेडणेकर यांनी विशेष मेहनत घेतली असुन सर्व थरांतील व्यक्तींनी या सोहळ्याला उपस्थिती दर्शवावी असे आवाहन संयोजक महेश्वर भिकाजी तेटांबे यांनी केले आह़े.

सोमवार, १५ एप्रिल, २०२४

नवभारत हायस्कूल कुसूर* येथे मोफत ई लर्निग किट, लॅपटॉप आणि प्रिंटर वाटप कार्यक्रम संपन्न ; साई एज्युकेअर फाउंडेशनचा स्तुत्य उपक्रम...!

वैभववाडी - कुसूर गावातील माध्यमिक शाळा, नवभारत हायस्कूल येथील विद्यार्थ्यांसाठी साई एज्युकेअर फाउंडेशन (रजि.) या संस्थेतर्फे (CSR Initiative ) माध्यमातून मोफत ई - लर्निग सिलेबस किट (५ वी ते १० वी), एक लॅपटॉप आणि प्रिंटर, स्कॅनर, झेरॉक्स मशीन इत्यादी शालेय साहित्य शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन क्षिरसागर सर आणि सहायक शिक्षक श्री भरत पाटील सर यांच्याकडे कु . साई सुरेश पाटील याच्या हस्ते सुपूर्द करण्यात आले.
तसेच शैक्षणिक वर्ष २०२३-२४ यामध्ये केंद्र सरकार तर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता ८ वी NHMS परिक्षेत उत्कृष्ट यश आणि शिष्यवृत्ती प्राप्त केलेल्या कु. सोहम संदिप पाटील आणि कु. सानवी संतोष शिंदे या यशस्वी विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन अभिनंदन करण्यात आले.
   सदर कार्यक्रम प्रसंगी साई एज्युकेअर फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष श्री सुरेश पाटील, सचिव श्री निखिल कुडतरकर, खजिनदार सौ वृषाली सुरेश पाटील, कार्याध्यक्ष श्री अदित्य पतियाणे, सहकार्याध्यक्ष पारस अनिल पाटील तसेच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि विशेष कार्यकारी अधिकारी श्री महेश रावराणे, तसेच शाळेचे शिक्षकवर्ग ही उपस्थित होते.

पालघर,रत्नागिरी,सिंधुदुर्ग मधील १० शाळांमध्ये "ई -प्रशाला" प्रकल्पाची सुरुवात

मुंबई (शांताराम गुडेकर ) रत्नागिरी,पालघर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता आणि शिक्षणाची गुणवत्ता वाढवण्यासाठी "ई -प्रशाला" राबवण्यात आला.पालघर जिल्ह्यातील नूतन विद्यालय,बहांडोली शाळेमध्ये या प्रकल्पाचे भव्य उद्घाटन सोहळा पार पडला.
              रेनोवेट इंडिया,अजिंक्य युवा प्रतिष्ठान संस्थाच्या संयुक्त प्रयत्नातून तसेच मोसंबी या कंपनीच्या सहकार्यामुळे हा प्रकल्प राबवण्यात आला.यामध्ये निवडक दहा शाळांमध्ये आधुनिक प्रोजेक्टर आणि इतर तंत्रज्ञानाचा वापर करून इयत्ता पहिली ते दहावीच्या विद्यार्थियांचे शिक्षण अधिक सोपे आणि सोयीस्कर होणार आहे.यामुळे विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढेल,विषयांची चांगली समज येईल आणि स्वतंत्र विचार करण्याची क्षमता विकसित होईल.एकूण १० शाळांमधील २४८७ विद्यार्थीना या उपक्रमाचा लाभ होणार आहे.पालघर जिल्ह्यातील १,रत्नागिरी जिल्ह्यातील ४ आणि सिंधुदुर्ग जिल्हयातील ५ शाळांमध्ये ह्या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
               उद्घाटन समारंभात रेनोवेट इंडियाचे श्री.आलोक कदम यांनी तंत्रज्ञान-आधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या शाळांचे कौतुक केले. या प्रकल्पामुळे शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांती घडून येईल असा विश्वास व्यक्त केला.अजिंक्य युवा प्रतिष्ठान आणि शाळांच्या मुख्याध्यापकांनीही या प्रकल्पाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.ग्रामीण भागातील शाळांमध्ये "डिजिटल ई - प्रशाला " उपक्रम घेऊन जाण्यास जी संधी रिनोव्हेंट इंडिया आणि मोसंबी कंपनी ने दिली त्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक आभार अजिंक्य युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद मांडवकर यांनी मानले.

श्री राम मंदिर धामणदेवी तर्फे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन

मुंबई (शांताराम गुडेकर ) श्रीराम मंदिर धामणदेवी, ता.पोलादपूर जि.रायगड तर्फे वै. परमपूज्य सद्गुरु मोरे माऊली यांच्या कृपाशीर्वादाने गुरुवर्य श्रीपतीबाबा मोरे यांच्या प्रेरणेने श्री सद्गुरु दादा महाराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दिनांक १५ एप्रिल २०२४ ते गुरुवार १८ एप्रिल २०२४ दरम्यान अखंड हरिनाम सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. आज सकाळी ७ वाजता हभप तुकाराम सीताराम शिगवण यांच्या हस्ते श्रीचां अभिषेक करण्यात आला. त्यानंतर सकाळी 8 वाजता हभप दगडु शिगवण यांच्या हस्ते विणापुजन तर दगडु चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण करून सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. सकाळी १० ते १२ वाजता हभप निवृत्ती दादा मोरे यांचे कीर्तन , संध्याकाळी ४ ते ५ वाजता विठ्ठल भरणे यांचे प्रवचन तर रात्री ९ ते ११ वाजता हभप शिवम महाराज कदम यांचे कीर्तन , मंगलवार १६ एप्रिल २०२४ रोजी सकाळी १० ते १२ वाजता हभप सत्यवान महाराज महाडिक यांचे कीर्तन , संध्याकाळी ४ ते ५ हभप प्रवीण वांद्रे यांचे प्रचवन तर रात्री हभप तुळशीदास महाराज मोकळ यांचे कीर्तन , बुधवारी १७ एप्रिल २०२४ रोजी हभप लक्ष्मण महाराज जाधव यांचे कीर्तन व संध्याकाळी प्रवचन तर रात्री ९ ते ११ वाजता हभप गौतम महाराज जाधव यांचे कीर्तन गुरुवार १८ एप्रिल २०२४ रोजी हभप रघुनाथ महाराज कदम यांचे काल्याचे कीर्तन होणार आहे. या कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व भाविकांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी नम्र विनंती पुणा व मुंबई च्या कमिटीच्या वतीने तसेच प्रसिद्ध उद्योगपती अनंत गणपत कदम , अर्जुन बांद्रे , बाळाराम कदम , बळीराम चव्हाण , पांडुरंग मोरे , अनिल गोडांबे यांच्या वतीने करण्यात आली आहे.

श्री स्वामी समर्थ कोकण वधु-वर मेळावा विरार येथे संपन्न

मुंबई (दिपक मांडवकर/शांताराम गुडेकर )
       सध्या लगीन सराई जोरात चालू असून वधू आणि वर यांचा योग्य जोडीदार मिळणे देखील कठीण परिस्थितीत निर्माण झाली आहे.मुला -मुलींचे करिअर मध्ये वय निघून जात असताना आई वडिलांना देखील आपल्या मुलांना योग्य जोडीदार शोधणे कठीण झाले आहे.याच निमित्ताने श्री स्वामी समर्थ कोकण वधूवर सूचक मंडळाच्या वतीने विरार येथे भव्यदिव्य असा वधू-वर मेळावा आयोजित करण्यात आला. हे मंडळ गेले दहा वर्षे ही सेवा अविरतपणे चालवत असताना संस्थापक सौ. साक्षी ताई परब यांनी सर्वात मोठं योगदान दिले आहे.या मंडळात आता पर्यंत शेकडो वधू-वरानी आपले नाव नोंदणी केली तर आता पर्यंत ३०० पेक्षा जास्त लग्न जुळवून आणण्याचा इतिहास या मंडळाने केला आहे. 
              रविवारी( दि. १४ एप्रिल) झालेल्या मेळाव्यात वधू वरानी चांगला प्रतिसाद दिला. तर संस्थापक साक्षी ताई यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, आपले कार्यालय विरार पूर्व येथे शॉप न १, विरार पोलीस स्टेशनच्या बाजूला, सागर झेरॉक्स, विरार पूर्व दर रविवारी सकाळी ११ते ८ वाजे पर्यंत सुरू असते तर नालासोपारा येथील कार्यालयात हे दर शनिवारी सुरू ठेवण्यात आले असून या मंडळाच्या वेबसाईटवर- sskokanvadhuvar.com या मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन आपण आले नाव नोंदणी करावी व 9607068820, 9637068820 या संपर्क नंबर व आपले माहिती द्यावी असे सूचित करण्यात आले. काल झालेल्या कार्यक्रमात त्याचक्षणी चार लग्न जुळवून पुन्हा एकदा विश्वासाचे नाते जोडले गेले.

रविवार, १४ एप्रिल, २०२४

चैत्री नवरात्रौत्सव भक्ती व कलामहोत्सवात नवरत्न व नवदुर्गा पुरस्कारांचे वितरण ; ब्रेल लिपीतील पुस्तकांबद्दल राजेंद्र घरत यांचा नवरत्न पुरस्कार देऊन सन्मान

नवी मुंबई : ‘आनंद चॅरिटेबल ट्रस्ट'च्या वतीने आयोजित होत असलेल्या ठाणे येथील जांभळी नाका येथील शिवाजी मैदान ‘चैत्री नवरात्रोत्सव २०२४ भक्ती व कला महोत्सवा' च्या चौथ्या दिवशी १२ एप्रिल रोजी समाजामध्ये विविध क्षेत्रात लक्षवेधी कार्य करणाऱ्या पुरुषांना नवरत्न व महिलांना नवदुर्गा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
    याप्रसंगी नवी मुंबईतील पत्रकार राजेंद्र घरत यांची अंध विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीत तेवीस पुस्तके प्रकाशित झाल्याबद्दल देवीच्या मूर्तीचे सन्मानचिन्ह, शाल व वस्त्रप्रावरणे देऊन नाट्य परिषदेचे कार्याध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी संतोष कारखानीस, किरण गावंड, अथर्व बेडेकर, डॉ. संतोष पाठारे, अमेय गावंड, महेश आंब्रे, संदीप विचारे. निशिकांत महांकाळ, विनोद देसाई, युट्युबर विनायक माळी (विशेष पुरस्कार) यांचाही त्यांच्या बहुमोल कार्याबद्दल सन्मान करण्यात आला. तसेच ठाणे आणि परिसरातून नवदुर्गा पुरस्काराच्या मानकरी म्हणून अस्मिता चौधरी, सोनाली लोहार, हर्षदा पांडे, प्रज्ञा पंडित, क्षमा जोगळेकर, अलका वढावकर, अंजुषा पाटील, शुभदा कुर्वे, विमुक्ता राजे, निधी सामंत (विशेष पुरस्कार ) यांनाही गौरवण्यात आले नवरत्न व नवदुर्गा पुरस्कार मिळवणाऱ्या या सर्व विजेत्यांना देवीच्या आरतीचा मान देण्यात आला. या पुरस्कार सोहळ्यासाठी निवृत्त पोलीस उपायुक्त संजय धुमाळ, ज्येष्ठ रंगकर्मी अप्पा महाशब्दे, शिक्षण तज्ञ श्रीमती मीरा कोरडे यांची सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली होती.

अलिबागमधील वावे गावात अमृतमहोत्सवी भव्य श्रीरामजन्मोत्सव सोहळा

वावे -अलिबाग ( प्रतिनिधी -दिनेश तुरे ) :- सालाबादप्रमाणे मुक्काम - वावे , तालुका- अलिबाग , जिल्हा - रायगड येथे मिती चैत्र शु . ९ , नवमी - शके १९४६ , बुधवार दिनांक १७ -०४-२०२४ रोजी ७५ व्या अमृतमहोत्सवी श्रीराम जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे , सकाळी ९.०० वाजता श्रीराम प्रासादिक भजन मंडळ वावे : बुवा - श्री बळीराम गावंड ( संगीत विशारद रवींद्र वाघमारे यांचे शिष्य ) तसेच मृदंगमणी - श्री हरिश्चंद्र न. गावंड , श्री दामोदर गावंड , जनार्दन गावंड , ( संगीत विशारद बाबुराव वाघमारे यांचे शिष्य ) चालक - श्री दिलीप पाटील , संदीप गायकर , मॅनेजर -वसंत गावंड, वावे ग्रामस्थ यांचे सुश्राव्य भजन होणार आहे . श्रीरामप्रभुंच्या जन्मसोहळ्याचे पोथीवाचन सकाळी - १०.०० ते १२.३० या वेळेत होणार आहे . श्रीरामनवमी दिवशी दुपारी १२.३० वाजता मर्यादापुरुषोत्तम श्रीराम प्रभुंचा जन्मोत्सवाचा सोहळा भक्तिभावे संपन्न होणार आहे . भक्तजनांसाठी महाप्रसादाची व्यवस्था दुपारी १ .०० ते ४.०० या वेळेत असणारं आहे. तसेच भक्तजनांच्या मनोजनार्थ पंचक्रोशीतील : बेलोशी, महाजने , आंदोशी, उसर , वळवली , आंबेपूर , या सहा भजनी मंडळांचे कार्यक्रम दुपारी १ ते रात्रौ ७ या वेळेत होणार आहेत , त्यामुळे भक्तजनांना संगीतमय मधुर स्वरांचा आस्वाद मिळणार आहे. श्रीराम प्रभूंची पालखी रात्रौ ९.०० वाजता विविध सजावटीने सजविलेला श्रीरामरथ चलचित्र पालखी सोहळा सोबत देवेश बेंजो पथक वावे , गावदेवी बेंजो पथक वावे , विभागातील ताशा पथक आणि पालखी सोबत वावे ग्रामस्थ व पंचक्रोशीतील लेझीम पथकांची रंगत पहायला मिळणार आहे , अशी भव्य पालखी मिरवणूक गावातून काढण्यात येणार आहे . पालखी सोबत बेलोशी ,महाजने, आंदोशी , या पंचक्रोशीतील व गावातील टाळ मृदूंगधारी वारकरी भजने व भावगीते होणार आहेत . परंपरागत ध्वनी -किरण साउंड सर्व्हिस -वळवली यांचे आहे . वेशभूषा - स्वराली ड्रेसेस थेरोंडा सौ . विनोदिनी कोंडे व रंगभूषा -महेंद्र गावंड यांची असणार आहे . तसेच वेषभुषाधारक भाविक वावे ग्रामस्थ हे श्रीराम प्रभूंच्या पालखीचे प्रमुख आकर्षण असणार आहे . श्रीराम प्रभूंच्या पालखी सोहळ्यात गुलालाची चौफेर उधळण करून ग्रामस्थ आपला आनंद साजरा करतात , तसेच लाठी -काठी , मल्लखांब अशा मैदानी खेळांची थरारक प्रात्यक्षिके दाखविण्यात येणार आहेत .आकर्षक रोषणाईने श्रीराम मंदिर उजळून निघणार आहे . टाळ मृदूंगाच्या नादात भक्तीमय वातावरणात या अविस्मरणीय अशा श्रीराम प्रभुंच्या भक्तिमय आनंद जन्मोत्सव सोहळ्याचा व तीर्थप्रसादाचा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा व याची देही ,याची डोळा अशा या भक्तीमय सोहळ्यात सहभागी होऊन या सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी द्विगुणीत करावा असे आवाहन वावे ग्रामस्थांच्या वतीने श्री दिनेश हरिश्चंद्र तुरे ( मुक्त-पत्रकार ,वृत्तपत्रलेखक ) यांनी केले आहे . तसेच नाट्यरसिकांच्या मनोरंजनार्थ शुक्रवार दिनांक १९ एप्रिल २०२४ रोजी लेखक कमळाकर बोरकर लिखित “बिजली कडाडली “ या धमाल विनोदी तमाशा प्रधान दोन अंकी नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. अशा प्रकारे या दरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन वावे ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे . श्रीराम प्रभूंच्या चरणी नतमस्तक होऊन अलोट भक्तीद्वारे या मंगलमय भक्तीमय सोहळ्याचा आनंद आपण सर्वानी लुटू या ! एकही नारा जय श्रीराम ! एकही नाम जय श्री राम प्रभु ! श्री राम जय राम ! जय जय राम !!

सिने-नाट्य कलावंतांच्या उपस्थितीत रंगणार आर्यारवी एंटरटेनमेंटचा दुसरा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार वितरण आणि विशेष गौरव प्रदान सोहळा .. !

मुंबई-परळ ( गुरुनाथ तिरपणकर) आर्यारवी एंटरटेनमेंटच्या पहिल्या राष्ट्रीय लघुपट स्पर्धेच्या अभूतपूर्व यशानंतर निर्माते महेश्वर भिक...