आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २२ एप्रिल, २०२६

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

कल्याण :(प्रतिनिधी:सुनिल इंगळे )उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे खान्देश भूषण, खान्देश रत्न आणि खान्देशश्री पुरस्कार यंदा जाहीर करण्यात आले आहेत. हे पुरस्कार ग्लोबल खान्देश महोत्सव 2026 दरम्यान प्रदान करण्यात येणार आहेत.यावर्षीचा खान्देश भूषण पुरस्कार प्रसिद्ध एकपात्री अहिराणी नाटक “आयात पोयत सख्यान” चे निर्माते, दिग्दर्शक व लेखक श्री. प्रविण माळी यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या कलात्मक योगदानाची दखल घेत हा सन्मान प्रदान केला जाणार आहे.तसेच खान्देश उद्योग रत्न पुरस्कार नामांकित बांधकाम व्यावसायिक श्री. सुनील चौधरी यांना जाहीर करण्यात आला आहे. उद्योग क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना हा गौरव मिळणार आहे.प्रशासकीय क्षेत्रातील योगदानाबद्दल खान्देशश्री पुरस्कार श्री.प्रदीप अहिरे, श्री.राहुल गांगुर्डे आणि डॉ. कमलकांत वडेलकर यांना जाहीर करण्यात आला आहे.तर कला क्षेत्रात कु. श्रद्धा महिरे आणि गायन क्षेत्रात श्री.पी.गणेश यांना देखील खान्देशश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
     यावर्षीचा ग्लोबल खान्देश महोत्सव दिनांक 22 ते 26 एप्रिल 2026 दरम्यान उत्साहात पार पडणार असून, या कालावधीत आयोजित विशेष समारंभात सर्व मान्यवरांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.खान्देशच्या सांस्कृतिक, सामाजिक व औद्योगिक क्षेत्रात व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना गौरविण्याची ही परंपरा यंदाही कायम ठेवण्यात आली असून,या पुरस्कारांमुळे अनेकांना प्रेरणा मिळणार आहे.

मंगळवार, २१ एप्रिल, २०२६

भांडुप येथे भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन

मुंबई (पंकजकुमार पाटील)- सध्या लग्न सराईचे दिवस सुरु आहेत. घरोघरी पालक, नातेवाईक आपल्या मुलांसाठी सुयोग्य वधु वा वर शोधण्याच्या तयारीला लागलेले दिसतात. पालकांचा हा लग्नाचा ताण हलका करून त्यासाठी सहकार्य करायला मुंबईतील आगरी समाज विकास संघ दरवर्षी वधु वर मेळावे भरवून समाजकार्य करण्याचे काम करीत असतो .
   हाच हेतू समोर ठेऊन आगरी समाज विकास संघ, मुंबई व स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य आगरी वधु -वर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सदर मेळावा रविवार दि. २६ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता स्व. दीना बामा पाटील प्रतिष्ठान, भांडुप स्टेशन रोड, भांडुप (पश्चिम ), मुंबई याठिकाणी आयोजित करण्यात आला आहे.
     या कार्यक्रमासाठी वधू वर यांनी उपस्थित राहणे गरजेचे आहे. सोबत नवीन उमेदवार असेल तर ३ बाय ४ चे दोन फोटो, तसेच उमेदवाराची जुनी नोंद असल्यास संस्थेने दिलेली नोंदवही आणण्याची सूचना करण्यात आली आहे.
      तेव्हा या मेळाव्यासाठी आगरी समाजातील इच्छुक वधु - वर उमेदवारांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे . अधिक माहितीसाठी धनाजी म्हात्रे- 98690 07754, सागर पाटील- 97735 29747, संजय म्हात्रे- 99679 72206, श्याम नाकटे- 99696 20057 यांच्याशी संपर्क साधावा. 


(बातमीदार मो. 9833127069)

उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे प्रतिष्ठित पुरस्कार जाहीर

कल्याण :(प्रतिनिधी:सुनिल इंगळे )उत्तर महाराष्ट्र खान्देश विकास मंडळ तर्फे दरवर्षी दिले जाणारे मानाचे खान्देश भूषण, खान्देश रत्न ...