आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १९ ऑगस्ट, २०२६

अभिमान कि अपमानाची गोष्ट! सुविधांचा अभाव... पालघर जिल्ह्यात आजही रुग्णाला झोळीत न्यावे लागते !!

मुबंई (सतिश पाटील): विकसित भारत, विश्वगुरु, जगात एक नंबर,नविन अधुनिक भारत फक्त भाषणातच प्रत्येक्षात जैसे थे,,,
मुंबई पासून दोन तासाच्या अंतरावर वाडा जव्हार पालघर जिल्हा 75 किमी अंतरआहे. आणि तरीही आज हा भाग सुगसोई पासून वंचित आहे. हि पहीली घटना नाही तर पाणी, पुल, रस्ते, शिक्षण,वैद्यकीय सेवा अशा अनेक सेवेपासून वंचित आहे. याच भागातील तारपा वादक यांना भारत सरकार राष्ट्रपती यांच्या हस्ते पद्मश्री भिकल्या भिंडा यांचा वाजत गाजत सन्मान केला. पण दुर्दैव त्याच व्यक्तीच्या गावात सुविधा पासून वंचित आहे पण सरकारचं लक्ष नाही.
जव्हार वाडा खडकी पाडा ८० वर्षानंतर भारत स्वतंत्र झाल्यानंतर ही सुविधांचा अभाव पाई पेशन्ट ला न्यावे लागते झोळीत दवाखान्यात नेणारा विडीओ व्हायरल पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील वाळवंडा परिसरातील खडकीपाडा येथे रस्ता आणि पुलाच्या अभावामुळे एका रुग्णाला झोळीत घालून उपचारासाठी नेण्याचा संतापजनक प्रकार समोर आला असून, याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
          स्वातंत्र्याची ८० वर्षे लोटल्यानंतरही आदिवासी भागात मूलभूत सुविधांचा तीव्र अभाव असल्याचे या घटनेने पुन्हा सिद्ध केले आहे.घटनेची पार्श्वभूमी आणि कारणेरस्ते व पुलाचा अभाव: पालघरमधील जव्हार तालुक्यातील खडकीपाडा गावाला जोडणारा पक्का रस्ता तसेच नदीवर पूल नाही.झोळीतून वाहतूक: रस्ता नसल्याने रुग्ण किंवा गर्भवती महिलांना मुख्य रस्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठी गावकऱ्यांना तासनतास झोळीचा आधार घ्यावा लागतो.प्रशासनिक अनास्था: स्थानिकांनी अनेकदा मागणी करूनही पुलाचे आणि रस्त्याचे प्रलंबित काम पूर्ण झालेले नाही, ज्यामुळे ग्रामस्थांना नजीकच्या दवाखान्यात जाण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागतो

लायन्स क्लब सावर्डे,आयडियल आयोजित मोफत मधुमेह तपासणी शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; ११० नागरिकांचा सहभाग

कोकण - ( दिपक कारकर )बदलत्या जीवनशैली-मुळे मनुष्यास अनेक व्याधींना तोंड द्यावे लागत आहेत. फास्ट फूड, केमिकलयुक्त अन्न पदार्थ याचा विपरित परिणाम आपल्या शरीरावर होत आहेत. धावपळीच्या जीवनात स्वतःच्या शरीराकडे लक्ष देण्यास कोणाला वेळ नाही. त्यामुळे आजचा छोटासाचा आजार भविष्यात मोठे स्वरुप धारण करत असतो. त्यासाठी संतुलित आहार आणि व्यायाम हा प्रत्येकाने करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नियमित आरोग्य तपासणी केल्यास वेळीच आजाराने निदान होऊ शकते. देशात सध्या मधुमेही रुग्णांची संख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यामुळे इतरही अनेक समस्या निर्माण होत आहेत. वेळीच उपचार केल्यास यावर आपण मात करु शकतो.     अशा समाज भावनेतून नुकताच मंगळवार दि.१८ ऑगस्ट २०२६ रोजी लायन्स क्लब सावर्डे,आयडीयल संस्थेच्या माध्यमातून चिपळूण तालूक्यातील वहाळ येथे डॉ.अजित गावकर यांच्या श्री.गणेश क्लिनिक मध्ये मोफत मधुमेह तपासणी व उपचार शिबीर यशस्वीरित्या संपन्न झाले.
      या शिबिरात तब्बल ११० नागरिकांनी सहभाग घेतला. यामध्ये ५० जुने मधुमेही रुग्ण तर १५ नवीन मधुमेहाचे निदान झालेले रुग्ण होते.सर्वांनी मोफत तपासणी, वैद्यकीय मार्गदर्शन व औषधोपचाराचा लाभ घेतला.
      या शिबिरासाठी डॉ.मृणाल भुवड (MD,DNB) यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ.लायन अजित गावकर आणि डॉ.लायन स्वाती गावकर यांची विशेष उपस्थिती लाभली.
     सदर शिबिराच्या यशस्वी आयोजनाकरिता डॉ.मृणाल भुवड यांचा लायन्स क्लब सावर्डे आयडियलतर्फे भेटवस्तू व वृक्षरोपटे देऊन सन्मानित करण्यात आले.या माध्यमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा एक आदर्श संदेश देण्यात आला.
       या संपूर्ण उपक्रमासाठी श्री गणेश क्लिनिकचे सर्व स्टाफ,कर्मचारी आणि अनमोल सहकार्य करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे लायन्स क्लब सावर्डे, आयडियलतर्फे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
         याप्रसंगी डॉ.अजित गावकर म्हणाले आताच्या महाग होत चाललेल्या आरोग्य सेवेत "सेवा हीच खरी मानवता ; आरोग्य हीच खरी संपत्ती ; आणि समाजासाठी केलेले प्रामाणिक कार्य हीच खरी लायन्सची ओळख आहे.ह्या स्तुत्य उपक्रमाचे विविध स्तरातून अभिनंदनासह कौतुक होत आहे.

अभिमान कि अपमानाची गोष्ट! सुविधांचा अभाव... पालघर जिल्ह्यात आजही रुग्णाला झोळीत न्यावे लागते !!

मुबंई (सतिश पाटील): विकसित भारत, विश्वगुरु, जगात एक नंबर,नविन अधुनिक भारत फक्त भाषणातच प्रत्येक्षात जैसे थे,,, मुंबई पासून दोन त...