मुंबई आणि उपनगरा मध्ये मुंबई महानगरपालिकेने घनकचरा संकलन आणि वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी घनकचरा विभागाच्या ताब्यात नवीन वाहनांची सोय करण्यात आली आहे.
सदर वाहनांवर अनेक वर्षांपासून कायमसवरूपी जे कर्मचारी होते त्यांची उचलबांगडी करून आहे त्या भांगामध्ये झाडू खात्यात काम देऊन योग्य न्याय दिला आहे. महापालिकेने नवीन वाहनांवर वरील कर्मचाऱ्यांमध्ये कपात केली आहे ज्या वाहनांवर सहा कर्मचारी होते.त्या वाहनांवर सध्या तीन कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे.कंत्राटी कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे
काही कंत्राटी कर्मचारी गेली आठरा ते वीस वर्षे मुंबई महानगरपालिकेत कंत्राटी पद्धतीवर काम करीत आहेत.त्यांची कायमस्वरूपी होण्याबाबत कोर्टात खटला सुरु आहे.तरी देखील नवीन कंत्राट दाराला कंत्राट दिल्याने आता नवीन कंत्राटच्या वतीने वाहनांवर काम करण्याची पाळी आली आहे.
सध्या मोठया वाहनांवर आठ टन कचरा उचलण्यासाठी तीन कर्मचारी तसेच सहा टन कचरा उचलण्यासाठी दोन कर्मचारी नियुक्क्ती केली आहे.त्या पूर्वी कायमस्वरूपी कर्मचारी व कंत्राटी कर्मचारी मिळून सहा कर्मचारी साडेपाच टन कचरा उचलीत होते.आता मोजक्या कंत्राटी कर्मचाऱ्याच्या वतीने सदर कचरा उचलण्याची पाळी आली आहे. त्यामुळे कंत्राटी कर्मचाऱ्यामध्ये अंसंतोष पसरला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांची पिळणूक न करता त्यांना तातडीने कायमस्वरूपी करावे अशी कंत्राटी कर्मचाऱ्यांची मागणी आहे.
-शरद नामदेव बनसोडे,
जेष्ठ पत्रकार
मालाड (पूर्व) मुंबई