आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० ऑगस्ट, २०२६

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रम व ओएससी (OSC) माहिती सत्राचा कार्यक्रम नुकताच यशस्वी रित्या पार पडला. 
​    त्यानुसार दि.१४ ऑगस्ट २०२६ रोजी  माता रमाबाई आंबेडकर म्युनिसिपल हॉस्पिटल, चेंबूर येथील डॉक्टर्स, नर्स व इतर वैद्यकीय कर्मचारी तसेच स्त्रीमुक्ती संघटना (कौटुंबिक सल्ला केंद्र), चेंबूर चे कर्मचारी आणि दिलासा केंद्र, मुलुंड येथे भेट देऊन तेथील अधिकारी, कर्मचारी व उपस्थितांना 'हर घर तिरंगा' अभियानाबाबत तसेच सखी वन स्टॉप सेंटर (OSC) च्या सेवा व कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
      दि.१५ ऑगस्ट २०२६ रोजी  स्वातंत्र्य दिनानिमित्त पुरुष भिक्षेकरी गृह, महिला भिक्षेकरी गृह व सखी एक थांबा केंद्र (OSC), चेंबूर येथे राष्ट्रध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. सदर प्रसंगी भिक्षेकरी गृहातील भिक्षेकरी, शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग व स्टाफ उपस्थित होते. या सर्वांना राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला तसेच सखी एक थांबा केंद्राच्या (OSC) कामकाजाबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
​      तसेच महिला व बालकांमध्ये जनजागृती होण्याच्या उद्देशाने 
अभियानादरम्यान महिला, बालके व लाभार्थी यांना राष्ट्रध्वजाचे महत्त्व, राष्ट्रध्वजाचा सन्मान, राष्ट्रीय एकात्मता व देशभक्ती याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. तसेच “हर घर तिरंगा २०२६” अभियानामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्यात आले.
​     तसेच अभियानादरम्यान नागरिकांना “हर घर तिरंगा” उपक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. तिरंग्यासोबत छायाचित्र (Tiranga Selfie) घेऊन अभियानात सहभाग नोंदविण्याबाबतही जनजागृती करण्यात आली.
      ​वरीलप्रमाणे सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर), चेंबूर यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर, जनजागृतीपर व राष्ट्रभक्तीपर उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात आले आहेत.​सदर कार्यक्रमांमधून डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, संस्थांचे कर्मचारी, नागरिक, महिला, बालके, भिक्षेकरी गृह लाभार्थी व रुग्ण यांच्यामध्ये राष्ट्रध्वजाबद्दल आदर व राष्ट्रप्रेमाची भावना वृद्धिंगत करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

संगीतमय कार्यक्रम -"मेरी जान तिरंगा है" व सन्मान सोहळा संपन्न

पनवेल : ७९ व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून टी.एम.जी.क्रिएशन आयोजित देशभक्तीपर गीतांचा ' मेरी जान तिरंगा है हमारा' हा बहारदार कार्यक्रम व सन्मान सोहळा रोटरी कम्युनिटी हॉल, नवीन पनवेल येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाला.भारतीय चित्रपट सृष्टीच्या सुवर्णकाळातील हिंदी व मराठी चित्रपटामधील राष्ट्रभक्तीपर गीते ७ते७०वर्षे वयोगटातील गायकांनी सादर केली.सदरहु संपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना एन.डी.खान यांची होती.
     अँड सुरेखा भुजबळ, अशोक डिका, डॉ. विजय मोरे,विद्या डोंबे, सुनिल दळवी,मिलिंद जाधव, सुरेश लहुळकर, राजकुमार सावंत, श्वेताम्बरा करबाटे,,दीपक कदम, अनिल शिशुपाल, सुनीता भुजबळ, कु.अर्णव झोडगे, कुमारी पार्थी घरत, कुमारी सावनी पाटील, मिलिंद पराटे, इत्यादी गायकांनी आपल्या सुरेल आवाजात गाणी गाऊन श्रोत्यांचे कान तृप्त केले.
    कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे संस्थापक एन.डी.खान यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनघा जाधव यांनी नेहमीच्या सफाईने केले.प्रसंगानुरूप दर्जेदार काव्यपंक्ती त्यांनी सादर केल्या.
     कॅप्टन मनोज भांबरे, ॲड.जीविता पाटील, विलास खानोलकर ,सि.के.टी चे डॉ . राजेश येवले, प्रल्हाद तळेले,.हाजी शाहनवाज खान,अभिनेत्री उर्मिला डांगे, सिने कलाकार सुरज कांबळे, अनुप बहाड , सौरभ पवार,साहित्यिक ऋता भांबरे, विजय भोसले, भगवान बडगुजर, रोशन शेख , शैलेंद्र अक्कलकोटे , वनिता कोळी आणि छाया अक्कलकोटे 
इत्यादी मान्यवरांचा सन्मानचिन्ह प्रदान करुन सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमात पनवेल परिसरातील २५ शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.यावेळी नाजनिन पालेकर, रेश्मा मुलये, पूनम गुप्ता, मंजूषा कदम,सुधा वाटवे, मनिषा वाटवे गीता देवरीया हे आपल्या शालेय शिक्षकां सोशल उपस्थित होते.
     कार्यक्रमास सहभागी झालेल्या सर्व गायकांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.  कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.सलमा खान , डॉ .विजय मोरे श्री.राजकुमार ताकमोगे सौ.मीना ताकमोगे यांनी विशेष परिश्रम घेतले.

महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर तिरंगा २०२६” अभियानांतर्गत आयोजित उपक्रमाचा व ओएससी (OSC) माहिती सत्राचा यशस्वी समारोप

मुंबई : महिला व बाल विकास विभाग(​महाराष्ट्र शासन)सखी एक थांबा केंद्र चेंबूर, मुंबई उपनगर (वन स्टॉप सेंटर) यांच्या वतीने “हर घर ...