आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, ५ जुलै, २०२६

भांडुप (पश्चिम) सोनापूर परिसरात, एलबीएस (LBS) मार्गांवर जमिन खचली

मुंबई  : पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे आणि लगतच्या बांधकाम खोदकामामुळे रस्त्याचा काही भाग आणि फुटपाथ खचला आहे. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही,विडीओ व फोटो मिडीयावर भरपूर व्हायरल झाले.मात्र सुरक्षेचा उपाय म्हणून स्थानिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.घटनेचे प्रमुख तपशील:स्थान: सोनापूर, एलबीएस मार्ग, भांडुप (पश्चिम).कारण: मुसळधार पाऊस आणि परिसरातील एका खाजगी इमारतीच्या बांधकामासाठी केलेले खोदकाम (पिलिंगचे काम).नुकसान: रस्त्याचा आणि पादचाऱ्यांसाठी असलेला फुटपाथ खचला. एक टेम्पो खोल खड्ड्यात अडकल्याचीही माहिती समोर आली आहे.जीवितहानी: कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
       दुसरी घटना मुलुंड मलबार हिल येथे महाराष्ट्र विद्युत मंडळ पावर हाऊसची भिंत कोसळून रिक्षाचे नुकसान झाले. सर्व निष्काळजी चालू आहे.पावसाळ्यात खरं तर कोणतेही खोदकामाला परवानगी नसते १जून पासून चार महीने पालिकेची खोद कामे बंद असतात. मग विकासकाला काय कायदे वेगळे असतात का? संबंधित अधिकारी, प्रशासन आणि प्रतिनिधी याला जबाबदार आहेत आपल्या विभागात येवढी मोठी दुर्घटना घडते आणि कोणीच त्या घटना स्थळाची पाहणी देखिल करायला पुढे आले नाहीत. येरवी फोटोशूट फार छान करतात एक झाड लावले तरी गाजावाजा केला जातो. जर मनुष्य हानी झाली असती तर सरकार कडून पाच लाख जाहीर करून आपली जबाबदारी पार केल्याचे दृश्य असते. ते ही तोंडीच त्यातपण नेहमीचा वेळकाढू पणा पण दुर्घटना घडू नये म्हणून उपाय योजना मुळीच नसते. त्याचे उदाहरण मुलुंड मधील मेट्रो प्रकल्प अपघात झाला जीवीत हानी झाली कारण दुर्लक्ष ठेकेदार कोण काय कामाचा अनुभव हे न तपासता कामे जवळच्या व्यक्तीला दिली जातात.आमचे पाचही बोटे तुपात कामाचा दर्जा कोण तपासणार? 
भ्रष्टाचार मुक्त ऐकून होता पत प्रत्येक्षात तो अधिकच वाढत आहे.सर्व टक्केवारीत विकास कामे होतात. खरं तर मुंबईत खूपच दाटीवाटी झाली आहे पण सरकार ला महसूल मिळतो ना! मग मुग गिळून गप्प बसायचं टोलेजंग इमारती ला परवानगी दिली जाते. त्याआधी रस्ते व भौगोलिक अभ्यास न करता विकासक आपली कामे करून मोकळे होतात. पाणी निचरा, झाडे तोड, नाले अरुंद करून जागा हडपणे,वाहन स्थळ व्यवस्था व रस्त्यावर वाहतूक कोंडीला सामना सामान्य जनतेला करावा लागतो. अनेक त्रुटी असताना विकासक आपली कामे करून मोकळा होतो.तोपर्यंत सर्व कानाडोळा करून असतात सरकारी अधिकारी, स्थानिक प्रतिनिधी आधी येण्याजाण्याचा मार्ग तयार कधीच केला जात नाही दुर्दैव जनतेचे जर कोणी आवाज केला तर दडपशाही ने दबाव टाकून पोलीस वा जेल मध्ये डांबले जाते.ज्याची सत्ता त्याचे राज्य असेच चालू आहे देशात.

सोमवार, २९ जून, २०२६

सांडपाणी पाइपलाइनविरोधात गडब -खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक

जेसीबीने पाइपलाइन उखडली, पाइपलाइन वाद चिघळला ; 
सरपंच मानसी पाटील यांना मारहाण, वडखळ पोलिसांत तक्रार
गडब (अवंतिका म्हात्रे):पेण तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत काराव गडब हद्दीतील आर डी कॉम्प्लेक्स येथून जाणाऱ्या सांडपाण्याच्या पाईपलाईन विरोधाल खारजांभेळा ग्रामस्थ आक्रमक झाले प्रशासनाने वारंवार तक्रारी करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांनी अखेर जेसीबीच्या सहाय्याने अखेर ही पाईपलाईन उखरून काढली 
   आरडी कॉम्पेलेक्सचे मोजे काराव ब्राह्मणाचा ओढा या मार्गावर ही सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्यात आली होती .हा ओढा खाडी मार्गातून असून याच परिसरात जागरण जोगमाता देवीचे पुरातन मंदिर आहे .मंदिरासमोर सांडपाणी सोडण्यात येत असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य पसरले असून मंदिराचे पवित्र धोक्यात आले आहे. तसेच ओढ्यातील प्रदूषित पाण्यामुळे स्थानिक मासेमारी व्यवसायावरसुद्धा परिणाम होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे .याबाबत ग्रामस्थांनी प्रांताधिकारी आणि गटविकास अधिकारी यांच्याकडे लेखी निवेदन देऊनही कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचा आरोप करण्यात आला. तरी बडीमो यांनी पुन्हा मिटींग घेऊ असे सांगण्यात आले होते. यावर पंचायत समिती येथे मिटिंग घेण्यासाठी खारजांभेळा ग्रामस्थ तयार होते. परंतु मिटींग झाली नसल्याने  संतप्त ग्रामस्थांनी पाईपलाईन काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी दोन गटांमध्य जोरदार वाद निर्माण झाला. पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला . मात्र संतप्त ग्रामस्थ आणि जेसीबीच्या माध्यमातून सदर पाईपलाईन उकडून काढली वाद वाढत असल्याने परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वडखळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष जाधव यांनी दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
        दरम्यान सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांच्या उपस्थितीत पाईपलाईन काढण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. यादरम्यान एका महिलेने आपल्या कांशीलात मारण्याचा आरोप सरपंच मानसी मंगेश पाटील यांनी केला असून संबंधित महिलेविरुद्ध वडखळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यावेळी घटना स्थळी सरपंच मानसी मंगेश पाटील, उपसरपंच परशुराम मोकल तसेच सदस्य दिनेश म्हात्रे,भाग्याश्री कडू, सीता पाटील,मुक्ता वाघमारे,मनोहर पाटील तसेच गडब पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते .

भांडुप (पश्चिम) सोनापूर परिसरात, एलबीएस (LBS) मार्गांवर जमिन खचली

मुंबई  : पहिल्या पावसाच्या सुरुवातीलाच मुसळधार पावसामुळे आणि लगतच्या बांधकाम खोदकामामुळे रस्त्याचा काही भाग आणि फुटपाथ खचला आहे....