आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ९ जून, २०२६

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. स्टेशन रोडच्या मध्यभागी असलेली बेस्ट बस चौकी आता पर्यायी जागेवर हलविण्यात येत असून तिच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले. या निर्णयामुळे भांडुप स्टेशन परिसर अधिक प्रशस्त, सुरक्षित व नागरिकांसाठी सुलभ होणार आहे.
भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील बेस्ट बस चौकीमुळे अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत होती. याशिवाय या ठिकाणी वारंवार अपघात घडत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला होता. गतवर्षी झालेल्या भीषण अपघातात चार नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता. या गंभीर परिस्थितीची दखल घेत खासदार संजय दिना पाटील यांनी प्रशासन, पालिका व बेस्ट अधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा करून चौकीसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याची मागणी लावून धरली होती. डीपीडीसीच्या बैठकीपासून प्रत्यक्ष पाहणीपर्यंत प्रत्येक स्तरावर पाठपुरावा करत त्यांनी प्रशासनाला या प्रश्नाच्या कायमस्वरूपी समाधानासाठी भाग पाडले. त्यांच्या पुढाकारामुळे पालिकेने नवीन जागेची निवड करून ती बेस्ट चौकीसाठी उपलब्ध करून दिली असून खासदार निधीतून या चौकीची उभारणी करण्यात येणार आहे.
        नवीन चौकीचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या मध्यभागी असलेली विद्यमान बेस्ट चौकी हटविण्यात येणार आहे. त्यामुळे स्टेशन परिसरातील अडथळे दूर होऊन नागरिकांना ये-जा करण्यासाठी अधिक मोकळी जागा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, या ठिकाणी असलेली पोलीस बीट चौकीदेखील लवकरच पर्यायी जागेवर हलविण्यात येणार असल्याची माहिती खासदार संजय दिना पाटील यांनी दिली. त्यामुळे संपूर्ण स्टेशन परिसर मोकळा होऊन पादचारी व वाहनचालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. या विकासकामाच्या भूमिपूजन सोहळ्यास शिवसेना पक्षाचे विभाग प्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेवक सुरेशजी शिंदे, नगरसेविका दिपमाला बडे, राजोल संजय पाटील, भांडुप पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण , विक्रोळी बेस्ट आगाराचे व्यवस्थापकीय प्रमुख अर्जुन मांजरेकर तसेच शिवसेनेचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. स्टेशन परिसरातील दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या या प्रश्नाला मार्गी लावल्याबद्दल नागरिकांनी खासदार संजय दिना पाटील यांचे विशेष आभार व्यक्त केले असून, त्यांच्या प्रभावी पाठपुराव्यामुळे भांडुपकरांच्या दैनंदिन प्रवासातील मोठा अडथळा दूर होत असल्याची भावना व्यक्त केली.

रविवार, ७ जून, २०२६

आगरीसेना प्रमुख राजाराम साळवी यांचे दु:खद निधन ; राजकीय क्षेत्रात शोककळा

मुंबई : आगरी सेना प्रमुख राजाराम साळवी (वय ८०) यांचे ६ जून २०२६ रोजी सायंकाळी प्रदीर्घ आजाराने कळवा (ठाणे) येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.राजाराम साळवी हे ठाणे आणि कोकणातील आगरी समाजाचे बुलंद आवाज आणि एक लढवय्ये नेते म्हणून ओळखले जात होते.त्यांच्या निधनाने सामाजिक, कामगार आणि राजकीय क्षेत्रात मोठी शोककळा पसरली आहे.
       सामाजिक व शैक्षणिक कार्य: त्यांनी कामगारांच्या हक्कांसाठी 'कामगार एकता' ही संघटना स्थापन केली आणि ठाण्यातील कारखान्यांमध्ये कामगारांचे अनेक प्रश्न सोडवले.याशिवाय, त्यांनी कळवा येथे 'मनीषा शिक्षण संस्था' सुरू करून शैक्षणिक क्षेत्रातही मोलाचे योगदान दिले.
राजकीय कारकीर्द: त्यांनी विविध राजकीय पक्षांमध्ये महत्त्वाची पदे भूषवली। त्यांनी समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदही सांभाळले होते। तसेच, भाजपमध्ये कार्यरत असताना त्यांनी गोपीनाथ मुंडे आणि प्रमोद महाजन यांच्यासोबत काम केले आणि महाराष्ट्र राज्य 'ओबीसी महामंडळ'चे अध्यक्षपदही भूषवले होते.
     त्यांचे पार्थिव रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत कळवा येथील निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले असून त्यानंतर कळवा येथेच त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.मा. साळवी साहेबांनी आगरी सेना स्थापन करून ३९ वर्ष पुर्ण झाली.त्यांना बहुजनांचे लाडके नेते संबोधले जात कोणीही अडचणी व समस्या घेऊन गेले तरी ते मार्गदर्शक म्हणून नेहमीच आदरणीय, सर्वांच्या मनात बसलेले आज नेते हरपले.या नेत्यास भावपूर्ण श्रद्धांजली.

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...