आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ७ जुलै, २०२६

गोकूळधाम - यशोधाम लायन्स मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : लायन्स क्लब मुंबई गोकुळ धाम - यशोधाम यांच्या वतीने मेगा मेडिकल कॅम्प नुकताच गोरेगाव (पूर्व), न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स सोसायटी नंबर १९ येथे, वर्षातील पहिले वैद्यकीय शिबिर अत्यंत यशस्वीरीत्या पार पडले.
    शिबिरात रक्तातील साखरेची तपासणी, बॉडी मास इंडेक्स (BMI) मोजणी, रक्तदाब तपासणी तसेच स्तन कर्करोग तपासणी अशा मोफत निदान सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. ५० हून अधिक नागरिकांनी या सुविधांचा लाभ घेतला. त्यामध्ये ३३ महिलांनी स्तन कर्करोग तपासणी करून घेतली.
     शिबिराचे उद्घाटन - उपजिल्हा राज्यपाल (1st VDG) लायन विकास सराफ यांच्या हस्ते झाले. शिबिराचे उत्कृष्ट नियोजन व व्यवस्थापन डॉ. गायत्री पांडव (डीसी डायबेटीस), डॉ. उमेश जोशी (जीएफए ह्युमॅनिटेरियन), डॉ. किशोर पांडव आणि लायन्स क्लब चे अध्यक्ष लायन सुभोध गोखले यांनी केले. झोन चेअरपर्सन आदित्य शेट्टी उपस्थित होते.
     मुसळधार पावसाची परिस्थिती असूनही ज्येष्ठ चार्टर सदस्य प्रा. पाटील तसेच लायन संगीता भुतानी, लायन ज्योती कुलकर्णी, लायन उर्मिल वर्मा आणि लायन मोहन राव यांनी उपस्थित राहून शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.विशेष ज्येष्ठ समाजसेवक संदीप राजपुरकर यांनी सहकार्य केले
       या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा नव्या लायन वर्षाची एक उत्तम सुरुवात ठरली आहे. याच प्रेरणेने वर्षभरात अशा १० हून अधिक वैद्यकीय शिबिरांचे आयोजन करण्याचा संकल्प आहे, व समाजसेवेचे कार्य अधिक व्यापकपणे करता येईल असे डॉ. गायत्री पांडव यांनी कळविले आहे.

सोमवार, ६ जुलै, २०२६

पाईपलाईनचा अडथळा, गडब गावात पुराचा विळखा ; मुसळधार पावसाने कहर; गडबमधील सखल भागातील घरांत पाणी

आश्वासनांची बरसात, उपाययोजनांचा दुष्काळ; गडबकरांचे हाल!
गडब (अवंतिका म्हात्रे): पेण तालुक्यातील गडब गावात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागातील अनेक घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. गावातून वाहणाऱ्या नाल्याची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक कुटुंबांचे आर्थिक नुकसान झाले असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.      स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील नाल्यातील पावसाचे पाणी नैसर्गिकरित्या खाडी व समुद्राकडे वाहून जात असते. मात्र, जेएसडब्ल्यू कंपनीने टाकलेल्या पाईपलाईनमुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह बाधित होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे पाणी साचून राहून गावात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
      दरवर्षी या समस्येबाबत कंपनी प्रशासनाला वारंवार सूचना आणि तक्रारी करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाणी अडल्यामुळे सखल भागातील घरांमध्ये पाणी शिरून घरगुती साहित्य, धान्य तसेच इतर वस्तूंचे मोठे नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे.
        दरम्यान, या समस्येसंदर्भात ग्रामपंचायतीची भूमिकाही प्रश्नचिन्हाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागरिकांच्या मते, प्रत्येक वर्षी समस्या सोडविण्याची आश्वासने दिली जातात, मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात येत नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ असल्याचे दिसत आहे.
      ग्रामस्थांकडून आता प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे.

गोकूळधाम - यशोधाम लायन्स मेगा मेडिकल कॅम्प उत्साहात संपन्न

मुंबई : लायन्स क्लब मुंबई गोकुळ धाम - यशोधाम यांच्या वतीने मेगा मेडिकल कॅम्प नुकताच गोरेगाव (पूर्व), न्यू म्हाडा कॉम्प्लेक्स सो...