आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १७ जून, २०२६

मुंबई येथे " राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन संमेलन संपन्न"

मुंबई : "पुरस्कारा मुळे व्यक्तीच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते.त्यामुळे त्या व्यक्तीची ऊर्जा शतपटीने वाढते.भावी काळात आपल्या उत्तम कार्याचा आलेख उंचावण्याची त्यांना प्रेरणा प्राप्त होते."असे भावपूर्ण उदगार सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार यांनी काढले.कार्य दर्पण युट्युब चॅनेल व महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गआयोजित राष्ट्रीय कार्य दर्पण संमेलन व सन्मान पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आयकर विभागाचे अतिरिक्त आयुक्त सुनिल आगावणे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, संस्था कार्य दर्पण पुरस्कारामुळे संपूर्ण महाराष्ट्राशी सुसंवाद साधते. कर्करोग शास्त्रज्ञ डॉ.अमजद खान पठाण यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की  "संस्थेने हा स्तुत्य उपक्रम राबवून चांगले कार्य केले आहे.त्यामुळे पुरस्कारार्थींना प्रोत्साहन मिळून त्यांचे मनोबल वाढते.त्यांची प्रगती होते." 
     कार्यक्रमाचे प्रास्तविक करताना संस्थेचे संस्थापक एन.डी.खान यांनी सांगितले की, "पुरस्कारामुळे सेवाव्रतींना त्यांच्या चांगल्या कार्याची पोच-पावती मिळते.भावी पिढीस त्यांच्या उपक्रमाची जाणीव होते..समाज भूषण उत्तमराव तरकसे यांनी संस्थेने कार्य दर्पण पुरस्काराचे सातत्य ठेवल्याबद्दल अभिनंदन केले.
     सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपक कदम यांनी ओघवत्या भाषेत केले.तर पुरस्कार सोहळ्याचे निवेदन निवेदिका व साहित्यिका सौ.अनघा जाधव यांनी त्यांच्या खास शैलीने केले.
     महाराष्ट्रातील विविध भागातून आलेल्या पुरस्कार्थींना मान्यवरांच्या हस्ते शाल, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.महाराष्ट्र राज्याच्या जलसंपदा विभागाचे विशेष अधीक्षक डॉ.जे.के.महाडिक, कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर ,लोककला लोकनृत्य अभ्यासक, संशोधक व नृत्य दिग्दर्शक पंकज पाडाळे,लोकनृत्यनिपुण वेसावकर, बेन्ज Hospital चे चेअरमन डॉ.आबिद सय्यद , कार्टर रेस्टॉरंट चे चेअरमन मेहबूब खान, साहित्यिक व शीघ्र कवी प्रा.जमील कमील. इत्यादी मान्यवर उपस्थित होते.सौ.सलमा खान ह्या सदर कार्यक्रमाच्या प्रमुख आयोजक होत्या.
 वेसावकर फेम तथा कोळी नटसम्राट राजेश खर्डे यांनी मी है कोळी या कोळी गीतावर पुरस्कारार्थी सोबत केलेले नृत्य व रोशन मोडकले यांच्या विद्यार्थ्यांना सादर केलेले नृत्य व तीन वर्षांच्या चिमुकली कु.बावनथडे हिने छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला जयजयकार कार्यक्रमाचे‌ विशेष आकर्षण ठरले 
    डॉ.विजय मोरे यांच्या आभार प्रदर्शना्ने कार्यक्रमाची सांगता झाली.  डॉ .ईसा शेख , विजय भोसले, शब्दश्री विलास देवळेकर, राजकुमार ताकमोगे,सौ. मीना ताकमोगे, प्रतिभा किर्तीकर्वे , गुलाब सलाट, इत्यादी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.शब्दश्री विलास देवळेकर यांचे" राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार" या आद्य अक्षराने केलेल्या कवितेचे फ्लेक्स सर्वांचे लक्ष वेधत होते.

विरेंद्र म्हात्रे यांना मुंबईत पुरस्कार प्रदान

नवी मुंबई : राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार २०२६ समाजसेवा, पर्यावरण, संवर्धन, धार्मिक उपक्रम आणि जनहिताच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणारे नवी मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत 'राष्ट्रीय कार्य दर्पण सन्मान पुरस्कार२०२६' प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र लोक कल्याणकारी सेवा संस्थेच्या वतीने मुंबई येथे आयोजित दर्पण गौरव संमेलनात हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
     मुंबईतील मराठी पत्रकार भवन येथे झालेल्या या सोहळ्यात प्रसिद्ध कोळी नटसम्राट राजेश खर्डे वेसावकर यांच्या हस्ते लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी आयकर विभागाचे प्रमुख अतिरिक्त आयुक्त सुनील अगवणे, संगीतकार कौशल इनामदार, डॉ. अमजद खान पठाण, डॉ. पूर्णिमा सुर्वे, डॉ. जे. के. महाडिक, उत्तम तरकसे, सायली पावसकर, सलमा खान, एन. डी. खान आदी उपस्थित होते.
     लायन हार्ट ग्रुप नवी मुंबईचे विरेंद्र यशवंत म्हात्रे हे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक आणि पर्यावरण क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांनी समाजसेवेची वाट निवडली असून, कोणतेही शासकीय अनुदान किंवा वर्गणी न घेता स्वतःच्या खर्चातून विविध उपक्रम राबवत आहेत.

मुंबई येथे " राष्ट्रीय कार्य दर्पण गौरव संमेलन संमेलन संपन्न"

मुंबई : "पुरस्कारा मुळे व्यक्तीच्या चांगल्या कामाची दखल घेतली जाते.त्यामुळे त्या व्यक्तीची ऊर्जा शतपटीने वाढते.भावी काळात आपल्या उत्तम ...