याच उपक्रमांतर्गत समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या मान्यवरांचा सन्मान दरवर्षी संस्थेतर्फे केले जातात. यंदाच्या या सोहळ्यात डॉ बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार, महात्मा ज्योतिबा फुले पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, सावित्रीबाई फुले पुरस्कार, राजर्षी शाहू महाराज पुरस्कार, कर्मवीर भाऊराव पाटील पुरस्कार, पु. ल. देशपांडे पुरस्कार* तसेच कुसुमाग्रज पुरस्कार प्रदान करून विविध क्षेत्रांतील कर्तृत्ववान व्यक्तींना कार्यक्रमाच्या अध्यक्षा लेखिका कवयित्री वक्त्या पूर्णिमा शिंदे, लेखक बाबुराव शिंदे, लेखक श्रीनिवास सप्रे यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
पुरस्कारप्राप्त मानकऱ्यांमध्ये निशा शेलार, वैशाली हजारे, चंद्रकांत गोविंद पाटील, विनोद अच्युत बांदोडकर, मिलिंद कांबळे चिंचवलकर, डॉ. आकाश वानखेडे, राजीव प्रधान, कनोजे काळूदास देवराम, संजय नागावकर, सुदाम शांताराम अहिरराव, प्रमोद नरसिंह सूर्यवंशी, अशोक कांबळे, सुदत्ता सुधीर साळवे तसेच प्रकाश लक्ष्मण पालांडे यांचा समावेश होता.
कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर, साहित्यप्रेमी व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. सन्मानित व्यक्तींनी आपल्या कार्यातून समाजासाठी अधिक योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.
कार्यक्रमाचे प्रभावी व नेटके सूत्रसंचालन डिजिटल गुरु मनीष पंडित यांनी केले. त्यांच्या ओघवत्या शैलीमुळे कार्यक्रम अधिक रंगतदार झाला.