आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २४ मार्च, २०२६

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे साहेब यांचे निर्देश

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक संपन्न
मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर )   वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्पामुळे मच्छीमार बांधवांच्या होणाऱ्या नुकसान भरपाईसंदर्भात मंत्रालयात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.तसेच या बैठकीस माजी आमदार किरण पावसकर यांनी मंत्री महोदयासमोर काही मागण्या मांडल्या पुढीलप्रमाणे १)वर्सोवा - वांद्रे सागरी सेतू बांधकाम प्रकल्प जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत माहीम मच्छीमारांना वन टाइम सेटलमेंट न देता प्रत्येक वर्षी नुकसान भरपाई देण्यात यावी.२)वरळी मच्छीमारांना बी.एम.सी. ने ज्याप्रमाणे नुकसान भरपाई दिली, त्याच धर्तीवर माहीम मच्छीमारांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी.३) दि.०९ मार्च २०२३ च्या शासन निर्णयामध्ये वर्सोवा - वांद्रे सागरी सेतू बांधित मच्छीमाऱ्यांच्या प्रत्येक घरातील एकाच बोटीला नुकसान भरपाई मिळेल. हे सुधारित करून (घरामागे न देता रजिस्टर असलेल्या प्रत्येक बोटीला नुकसान भरपाई देण्यात यावी.) या प्रमुख मागण्या मांडल्या.
          तसेच सन्माननीय उपमुख्यमंत्री मा.श्री. एकनाथजी शिंदे साहेब यांनी मुख्यमंत्री असताना सह्याद्री अतिथी ग्रह येथे संयुक्त बैठक घेऊन वरळी कोळीवाड्यातील मच्छीमारांना नुकसान भरपाई मिळवून दिली. त्याच बैठकीला शिंदे साहेबांनी विशेष बाबमध्ये माहीम मच्छीमारांनाही नुकसान भरपाई देण्यात यावी असे आदेश दिले होते.
          यावेळी मंत्री नितेश राणे साहेब यांनी सांगितले की, वर्सोवा कोस्टल रोड व भविष्यातील वाढवण पर्यंत होणारा कोस्टल रोड प्रकल्प एमएमआरडीए च्या माध्यमातून पूर्णत्वास येणार आहे. या पार्श्वभूमीवर या भागातील बाधित होणाऱ्या मच्छिमारांना योग्य नुकसानभरपाई मिळावी यासाठी विशेष अभ्यासगट स्थापन करून महिन्याभरात त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश यावेळी मंत्री नितेश राणे साहेब यांनी अधिकाऱ्यांना दिले.
           या बैठकीस माजी आमदार श्री. किरण पावसकर साहेब, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन रामास्वामी, एमएमआरडीएचे वरिष्ठ अधिकारी, संबंधित विभागांचे अधिकारी तसेच श्री. दिनकर तांडेल (महीकवती सोसायटी), श्री. दिलीप पागधरे ( माहीम विविध सोसायटी) श्री जयेश तांडेल (माहीम नाखवा सोसायटी) श्री. सचिन लिमन असे मच्छीमार संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंत्री नितेश राणे साहेब यांनी कोणत्याही मच्छीमारांचे आम्ही नुकसान होऊन देणार नाही असे आश्वासन दिले. म्हणून सर्व मच्छीमार सोसायटीच्या प्रतिनिधीने व किरण पावसकर यांनी सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री श्री.नितेश राणे साहेब यांचे मनापासून आभार मानले.

आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ आयोजित आगरी कोळी चषक 2026 स्पर्धा भांडुप येथे संपन्न

मुंबई (सतिश पाटील ): आगरी कोळी सांस्कृतिक क्रीडा मंडळ (मुंबई ठाणे पालघर विभाग) नियोजित २१ संघामध्ये आई गावदेवी ४०+ मास्टर (भांडुप गाव ) आयोजित चाळीस वर्षावरील खेळाडूंसाठी आगरी कोळी चषक 2026 स्पर्धेचे आयोजन भांडुप गाव येथील भांडुपेश्वर कुंडा जवळील आदर्श क्रीडांगण येथे संपन्न झाले. सदर स्पर्धा एकूण मुंबई ठाणे पालघर विभागातील २१ गावातील संघांमध्ये भरवण्यात आली होती. सदर स्पर्धेचे भरवण्याचे मुख्य हेतू हा चाळीस वर्षे वरील खेळाडूंमधील जिद्द, चिकाटी दाखवण्याची तसेच आगरी कोळी समाजाला एकत्र बांधून ठेवण्या चा एका अतुल्य उपक्रम होता . 
    या स्पर्धेत प्रथम पारितोषिक आई गावदेवी ४०+ भांडुप मास्टर,द्वितीय पारितोषिक चिखलादेवी मास्टर कोपरी ठाणे, तृतीय पारितोषिक श्री पोषमात्रा भाईंदरपाडा मास्टर, तृतीय पारितोषिक शेंडोबा कासारवडवली बी,
चतुर्थ पारितोषिक श्रीराम बिलालपाडा मास्टर 
चतुर्थ पारितोषिक श्री दत्तगुरु नवघर मास्टर ए या संघाना मिळाले आहे. या प्रसंगी अनेक सर्व पक्षीय नेते, मंडळास मदत करणारे दानशूर व पत्रकार यांचा सत्कार करण्यात आला.

वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू प्रकल्पग्रस्त मच्छिमारांना दिलासा; नुकसानभरपाईसाठी विशेष अभ्यासगट स्थापन करण्याचे मंत्री नितेश राणे साहेब यांचे निर्देश

मंत्री नितेश राणे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात विशेष बैठक संपन्न मुंबई(शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर )   वर्सोवा-वांद्र...