आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

रविवार, २५ जुलै, २०२१

ऑलम्पिकमध्ये भारताची चांगली सुरवात...

Well begin is half done अशी इंग्रजीमध्ये जी म्हण आहे,म्हणजे कोणत्याही कामाची सुरुवात ही चांगली झाली तर अर्धी लढाई जिंकल्यासखिच असते व पुढील काम सोपे होते व याचा प्रत्यय आज पाहिल्याच दिवशी भारतीय खेळाडू मीराबाई चानू हिने आणून दिला.जपानची राजधानी टोकियो येथे आजपासून सुरू झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये भारताची आघाडीची वेटलिफ्टर चानू हिने आज झालेल्या महिलांच्या ४९ किलो वजनी गटात पहिल्या प्रयत्नात ८७  किलो वजन उचलले तर दुसऱ्या प्रयत्नात ११५ असे एकूण २०२ किलो वजन उचलून भारोत्तोलनामध्ये जगातील आघाडीच्या देशांच्या भारोत्तोलकांना तोडीस तोड लढत देत रौप्यपदकाची कमाई केली.चीनच्या खेळाडूने २१० किलो वजन उचलून प्रथम क्रमांक पटकाविला. ऑलिम्पिकमधील भारताचे हे पहिले पदक आहे.यापुढेही भारताचे अनेक खेळाडू विविध स्पर्धेत विविध गटात अनेक सुवर्ण पदक जिंकून देतील असा विश्वास भारतीयांनी व्यक्त केला असून आपले खेळाडू नक्कीच अनेक पदक जिंकून तो विश्वास सार्थ ठरवितील अशी आशा आहे.

-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...