कोकणवासी मानणार नाही हार
हिरव्यागार महाराष्टावरती प्रलयाने केले अत्याचार
अशा परिस्थितीत मानणार नाही
कोकणवासी कधीच हार
दिले भरभरून तपस्वी या कोकणानी
भारतभुला
अन्याय सहून ही विझला नाही
कोकणातला चुला
गीतारहस्य रुपी ग्रंथाने दाखविले विश्वरूप
चिखलीच्या त्या बाळाने दाविले स्व स्वरूप
धोंडो केशव कर्वे यांनी स्थपून कन्याशाळा
सोडवल्या अबलांच्या बंदिशाळा
या सर्वांचा असता आशीर्वाद
कसा घाबरेल कोकणवासी आहे कुणाची बिषाद ?
-रविंद्र आत्माराम बागुल,बोरिवली,मुंबई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा