आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ जुलै, २०२१

अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ ;5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूरडाळ शासन देणार मोफत

आ.वा वृत्तसेवा, रायगड :- राज्यात माहे जुलै,2021 मध्ये विशेषत : दि.22 व 23 जुलै, 2021 रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक कुटुंबे बाधीत झाली आहेत. अशा बाधीत कुटुंबांना आपत्तकालीन परिस्थितीमध्ये किमान उदरनिर्वाहाचे साधन म्हणून राज्य शासनातर्फे अन्नधान्य (गहू व तांदूळ), केरोसीन व तूरडाळ उपलब्ध करुन देण्याचा  निर्णय घेण्यात आला आहे.  
           रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली व सातारा या जिल्ह्यांमधील माहे जुलै, 2021 मध्ये विशेषतः दि. 22 व 23 जुलै, 2021 रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधीत झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ (बाधीत कुटुंबाकडून मागणी झाल्यास तांदळाचे प्रमाण वाढवून एकूण 20 किलो अन्नधान्य) व 5 लिटर केरोसीन तसेच 5 किलो तूरडाळ मोफत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.
          शासन निर्णयानुसार बाधीत कुटुंबांची संख्या / यादी जिल्ह्यातील संबंधित जिल्हा पुनर्वसन अधिकारी यांनी उपलब्ध करुन द्यावी. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या जिल्हा स्तरावरील शासकीय गोदामामध्ये इतर योजनांमधील शिल्लक असलेल्या अन्नधान्यामधून तात्काळ वाटप सुरु करावे. अन्नधान्याच्या आवश्यकतेबाबतचे एकूण परिमाण त्यांनी शासनास कळविल्यानंतर या परिमाणाएवढया अन्नधान्याची मागणी MSP / MSP DERIVED RATE ने केंद्र शासनाकडे करण्यात येईल व त्याकरिता आवश्यक असलेला निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल, असे कळविण्यात आले आहे.
           बाधीत कुटुंबांसाठी आवश्यक असलेले केरोसीन जिल्हाधिकारी यांना तात्काळ मोफत उपलब्ध करुन देण्याबाबत BPCL, IOC व HPCL या ऑईल कंपन्यांना शासन स्तरावरुन कळविण्यत यावे. याकरिता आवश्यक असलेला निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल.
          बाधीत कुटुंबांसाठी आवश्यक असलेली तूरडाळ संबंधित जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या जिल्ह्यातील घाऊक बाजारातून खरेदी करुन त्याचे प्रति कुटुंब 5 किलो या परिमाणात तात्काळ वाटप सुरु करावे. या तूरडाळीसाठी आवश्यक असलेला निधी जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या आपत्ती निवारण निधी मधून उपलब्ध करुन घ्यावा. किती परिमाणात तूरडाळ खरेदी करण्यात आली, या बाबतची आकडेवारी जिल्हाधिकारी यांनी शासनास कळविल्यानंतर या तूरडाळीकरिता खर्च करण्यात आलेल्या रक्कमेएवढा निधी वित्त विभागाकडून उपलब्ध झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांना उपलब्ध करुन दिला जाईल.
          अन्नधान्य, डाळी व केरोसीन यांचे वाटप झाल्यानंतर किती परिमाणात वाटप करण्यात आले व त्या करिता किती खर्च झाला ही आकडेवारी सर्व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्राप्त झाल्यानंतर या बाबींसाठी आवश्यक असलेला निधी वित्त विभागाने तात्काळ उपलब्ध करुन द्यावा, असेही शासन निर्णयाद्वारे सूचित करण्यात आले आहे.
           हा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा सांकेतांक क्रमांक 202107261141426106 हा आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

राष्ट्रीय कर्मचारी सेनेतर्फे महाराष्ट्र दिन व कामगार दिन स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक उद्यान शिवाजी पार्क दादर मुंबई येथे संपन्न

मुंबई (शांताराम गुडेकर /समीर खाडिलकर)  शिवसेना सचिव,प्रवक्ता,मा.आमदार राष्ट्रीय कर्मचारी सेनेचे अध्यक्ष मा.आ.श्री. किरण पावसकर ...