गेली 33 वर्षे संस्थेच्या माध्यमातून दरवर्षी न चुकना आषाढी एकादशीस वृक्षदिंडी व वृक्षारोपण सोहळा आयोजित करण्यात येत असतो. पण दीड वर्षापासून उद्भवलेल्या कोरोना या साथरोगाच्या महासंकटामुळे मागच्या वर्षापासून सदर कार्यक्रम मर्यादित स्वरुपात वृक्षपुजन व वृक्षारोपण करून साजरा करण्यात येत आहे. यावर्षीही झालेल्या या कार्यक्रमात तुळशीचे पुजन व लागवड करण्यात आली. गेल्या दीड वर्षाच्या कोरोना महामारीच्या काळात प्राणवायुचे महत्व जनसामान्यांस चांगले उमगले आहे. आणि तुळस ही प्राणवायु देणारी व हवेचे शुध्दीकरण करणारी वनस्पती आहे. याच विचाराचा धागा पकडुन संस्थेने तुळस लागवड व संवर्धन अधिक मोठ्या प्रमाणात होण्यासाठी माझे घर माझे तुळशी वृंदावन या अभिनव स्पर्धेचे या कार्यक्रमांच्या निमित्ताने ऑनलाईन पद्धतीने आयोजन केले. त्यास उत्स्फुर्तपणे लोकांचा चांगला प्रतिसाद अनेक ठिकाणांहून मिळाला व लोकांनी विशेष अभिनंदन केले. अजून ही लोक स्पर्धेत सहभागी होत आहेत.या प्रसंगी बोलताना यूथकौन्सिल नेरुळ या संस्थेच्या कार्याचा गौरव करून पंडित जितेंद्र कुलकर्णी म्हणाले की, माझे घर माझे तुळशी वृंदावन हा आयोजित केलेला स्पर्धात्मक उपक्रम खरोखरच कौतुकास्पद आहे. यामुळे तुळशीचे महात्म्य अधिक प्रमाणात समाजामध्ये अधोरेखीत होण्यास मदत होणार आहे. हायकोर्ट वकील सुरेश निलाटकर म्हणाले की, डॉक्टर गिरीश कुलकर्णींचा मानपत्र देवून झालेला गौरव हा योग्यच आहे. त्यांनी कोरोना महासंकट काळातील रुग्णांप्रती दिलेली वैद्यकीय सेवा खरोखरच अभिमानास्पद आहे. मी त्याचा स्वत: साक्षीदार आहे.
संपूर्ण कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संस्थेचे सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी केले. तर शिवाजी शिंदे यांनी उपस्थितांचे व मान्यवरांचे यथोचित आभार मानले.कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वश्री रमेश सुर्वे, भालचंद्र माने, जी. आर. पाटील, विक्रम राम, सुजीतसिंह उभी, यशवंत गोनेवाड, दत्ताराम आंम्ब्रे, नरेश विचारे, निशांत बनकर, एस. बी. सिंग आदिंनी खूप मेहनत घेतली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा