काय आहेत कारणे:-उरणच्या विकासासाठी सिडकोने येथील शेती,मिठागरे यांच्या वर मातीचा भराव केला.त्यावेळी या भागातील भरती ओहटीचे त्याच प्रमाणे पावसाचे पाणी याचा निचरा करण्यासाठी असलेले नाले(पवळी)बुजविण्यात आल्या. त्यामुळे येथील नैसर्गिक मार्गच बंद केले. त्याचप्रमाणे ते आकुंचित केले.त्याचा परिणाम समुद्राच्या पाण्याने आपली वाट बदलली ते थेट गावात शिरू लागले आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर येऊ लागलं आहे. जे सिडकोने केले तेच जेएनपीटीने ही केले.
उरण मध्ये विकासाची कामे करीत असताना सिडकोने अगदी जागतिक पातळीवर येथील भरती ओहटी च्या पाण्याचा निचरा करणाऱ्या यंत्रणेचा अभ्यास केला. त्यासाठी करोडो रुपये खर्च केले. उरण मध्ये डच या देशाच्या धर्तीवर पाण्याचा निचरा करण्यासाठी होल्डींग पौंड (धारणतलाव) तयार केले आहेत. आशा प्रकारचे सहा होल्डिंग पौंड आहेत असे सिडको कडून सांगितलं जातं.पण आजच्या स्थितीत यातील एकाही तलावात पाणी साचत नाही याचे कारण या तलावात मातीचा गाळ साचला आहे.या गाळावर सध्या खारफुटी उगवली आहे.ती हटविल्या शिवाय या तलावातील गाळ काढता येऊ शकत नाही. त्यासाठी मागील 15 वर्षा पासून मुंबई उच्च न्यायालयात सिडकोची याचिका असल्याचे उत्तर सिडको कडून दिल जात आहे.
जेएनपीटीचे ढिसाळ नियोजन :-जसखार,सोनारी,करळ व सावरखार या चार गावात पाणी शिरल्यावर त्यासाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च केले जातात, परंतु प्रश्न मात्र कायम आहे.पाणी साचून येथील घरांची नुकसानी सुरूच आहे.
पूरग्रस्त होण्याचा धोका:-उरणचा विकास चालू असताना सिडको तसेच JNPT प्रशासन कडून कोणत्याही प्रकारचे योग्य नियोजन केले जात नसल्याने उरणला नेहमी पुराचा धोका बसत आहे.उरणच्या विकासा संदर्भात नेहमी चुकीच्या पद्धतीने नियोजन केले जात असल्याने त्याचे गंभीर परिणाम येथील नागरिकांना, ग्रामस्थांना भोगावे लागत आहे. पाऊस सतत, मुसळधार पडला की उरण मध्ये पूर येतो व शेतीचे, फळ बागांचे तसेच नागरिकांच्या घरांचे अतोनात नुकसान होते. नुकसान ग्रस्त पीडिताला योग्य ती मदत त्याच्यापर्यंत पोहोचतच नाही.
[[जमिनी गेल्याने प्रकल्पग्रस्त झालोच आहोत पण यापुढे दक्ष नागरिक म्हणून जागे होऊन आपल्या गाव आणि परिसरात गटारे नागरी सुविधा या करीता सिडको व जेएनपीटी कडून खर्च करण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी हा योग्य प्रकारे खर्च होऊन काम होत का याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ते न झाल्यास उरणला पूरग्रस्त होण्या पासून कोणीही वाचवू शकणार नाही.]]
- नरेश कोळी , हनुमान कोळीवाडा येथील रहिवाशी तथा सामाजिक कार्यकर्ते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा