आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, १५ एप्रिल, २०२६

पवईत संयुक्त जयंती महोत्सव संपन्न

पवई (प्रतिक कांबळे): महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सर्वत्र जगभर साजरी होत असते त्याच प्रमाणे पवईत देखील सम्राट अशोक, महात्मा ज्योतिबा फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांची संयुक्त जयंती महोत्सव १२ एप्रिल रोजी मुक्तेश्वर आश्रम प्रांगणात यशस्वी रित्या संपन्न झाला.
    सदर संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन द लॉर्ड बुद्ध धम्म टुर्स यांच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. यावेळी यामध्ये पवईतील तसेच आसपासच्या परिसरातील कलाकारांना निमंत्रण देऊन त्यांच्या कलेला दाद देण्याचे काम या संस्थेच्या वतीनं करण्यात आले‌. ही संस्था सालाबादप्रमाणे पवईत महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचवण्यासाठी सदैव तत्पर असते‌.या संयुक्त जयंती महोत्सवात कवी,गायक, समाजसेवक इत्यादी यांनी सहभाग घेत महापुरुषांचे विचार जनमानसात पोहचविले.तसेच कार्यक्रमाची सुरवात त्रिशरण पंचशील घेऊन झाली.
      जयंती महोत्सव यशस्वी रित्या संपन्न करण्यासाठी संस्थेतील रमेश वाटेकर,सुरेश गाडे,कल्पना घोक्षे,सुजल मोरे,वर्षा गायकवाड,सरला गांगुर्डे,संपदा जाधव,रमेश सोनपसारे,बाळु घोक्षे यादी पदाधिकाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वी रित्या संपन्न केला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी........ श्रद्धा, सबुरी आणि कृपेचा दिव्य संदेश

भारतभूमी ही संतांची पावन भूमी आहे. या भूमीत अनेक महान संतांनी मानवजातीला अध्यात्म, भक्ती आणि सदाचाराचा मार्ग दाखवला. अशाच तेजस्वी संतांपैकी ...