मुंबई :(सतीश पाटील)आज संपुर्ण महाराष्ट्रात आणि देशभरात सानपाडा गावातील कन्येने नावलौकिक मिळवला आहे आणि सर्वांनाच त्याचा सार्थ अभिमान आहे. सानपाडा गावची कन्या कु. किर्ती जयेंद्र पाटील हिने महाराष्ट्राकडून ज्युनियर महिला फुटबॉल स्पर्धांमध्ये, उत्तर प्रदेशच्या टीमचा पराभव करत प्रथम क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे या ज्युनियर महिला टिमची मुख्य कोच म्हणून काम पाहतान हा विजय मिळविला व संपूर्ण महाराष्ट्र राज्याचे नाव लौकिक केले.
या अविश्वसनीय कामगिरी बद्दल कु किर्ती जयेद्र पाटील हिचे खुप खुप अभिनंदन.आजच्या काळात फक्त शिक्षण घेऊन आणि नोकरी व संसार करणे म्हणजेच आपले जीवन सार्थक झाले असे नाही. आपल्या मुलांना खेळ क्रीडा याचे शिक्षण देणे आवश्यक आहे. कदाचित हेच विद्यार्थी उदया देशाचे नाव उज्वल करू शकतात!मोबाईल गेम, रिल्स स्टार पेक्षा मैदानी खेळ अतिशय महत्वाचे आहेत. यातूनच भविष्य घडते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा