आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ ऑक्टोबर, २०२५

नेरुळ येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन

नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : नेरुळ येथील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय येथे दिवाळी अंक प्रदर्शन २०२५ चे आयोजन ग्रंथालयातर्फे करण्यात आले असून त्याचे उद्घाटन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या हस्ते दिनांक २९ ऑक्टोबर २०२५ रोजी करण्यात आले. प्रदर्शनीत १०२ विविध विषयावरील दिवाळी अंक ठेवले असून, आठवडा भरासाठी आयोजित या दिवाळी अंक प्रदर्शनीच्या उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी जिल्हा ग्रंथालय अधिकारी प्रशांत पाटील, प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, महापालिका नेरुळ विभाग अधिकारी डॉ. अनुराधा बाबर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संजय बनसोड, जेष्ठ नागरिक संघाच्या सार्वजनिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, सुनील आचरेकर, रुग्णसेवा केंद्राचे अध्यक्ष रणजीत दीक्षित, सेंट ऑगस्टीन हायस्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती समीरा माने, शब्दालय प्रकाशनाचे सुमित लांडे, लेखक गजानन म्हात्रे, सुभाष हांडे देशमुख, भालचंद्र माने तसेच सेंट ऑगस्टीन हायस्कूल मधील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रसंगी सांस्कृतिक समन्वय विशेषांक शब्दालय - २०२५ या दिवाळी अंकाचे प्रकाशन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच सौ. अमृता दिवाण यांनी लिहिलेला Love Interrupted हा ग्रंथ डॉ. कैलास शिंदे यांना भेट देण्यात आला.
     ग्रंथालयाच्या प्रवेशद्वारावरच सेंट ऑगस्टीन हायस्कूल मधल्या विद्यार्थ्यांनी पुष्पगुच्छ देऊन पाहुण्यांचे सुंदर स्वागत केले. ग्रंथालयाच्या कार्यालयात प्रवेश करतानाच डॉ. कैलास शिंदे यांनी फित कापून दिवाळी अंकाच्या दालनाचे उद्घाटन केले. ठाणे जिल्ह्यात मुख्यतः नवी मुंबईतील क्षेत्रातील वाचकांना आवश्यक ते वाचन साहित्य या वाचनालयात उपलब्ध असून ग्रंथालय ही वर्धिष्णू संस्था असल्याने ग्रंथालयासाठी नेरुळ येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भवन येथील इमारतीतील जागा महानगरपालिकेने उपलब्ध करून द्यावी अशी विनंती आपल्या प्रास्तविकात प्रशांत पाटील यांनी केली.
    उपस्थितांशी संवाद साधताना डॉ. कैलास शिंदे यांनी दिवाळी अंकाच्या प्रदर्शनीचे कौतुक करुन पुस्तकाचे जीवनातील महत्त्व सखोलपणे विशद केले. ते म्हणाले की, नवीन डिजिटल युगात वाचनाचे महत्त्व खूप मोठे आहे. कारण मानवाचा सर्वांगीण विकास करावयाचा असेल तर तरुण पिढीने विविध विषयावरील ग्रंथांचे नियमितपणे वाचन केले पाहिजे. सध्याची ही जागा ग्रंथालयास अपुरी पडते आहे या आलेल्या सूचनेची दखल घेऊन त्यांनी सांगितले की, नेरुळ मधीलच पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर भावनातील जागेची माहिती घेऊन त्याविषयी कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जाईल असे सांगतानाच शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयासाठी नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत अनुदान देण्याबाबतही सकारात्मक विचार करण्यात येईल असे त्यांनी सुचित केले. सुभाष कुलकर्णी यांनी ग्रंथालय, वाचनालय यांचे मानवी जीवनातील महत्त्व विशद करुन वाचाल तर वाचाल या म्हणीचा उल्लेख करुन युवकांनी नियमितपणे वाचन केले पाहिजे असे स्पष्ट केले.
    संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती अमरजा चव्हाण यांनी आपल्या ओघवत्या शैलीत खूप सुरेख केले. शेवटी संजय बनसोड यांनी आभार प्रदर्शन केले. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्था सन 2026 च्या दिनदर्शिकाचे प्रकाशन

गडब (अवंतिका म्हात्रे): सालाबादप्रमाणे कै मोरेश्वर भगत शैक्षणिक सामाजिक विकास संस्थेच्या सन 2026 च्या दिनादर्शिका प्रकाशन सोहळा ...