आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २४ जून, २०२२

कायदा कागदावरच ?

मुंबई पोलिसांनी दुचाकीस्वारासह मागे बसलेल्या व्यक्तीलाही हेल्मेट सक्ती केल्याने काहींनी त्याचे स्वागत केले तर काहींनी नाराजी प्रकट केली.अपघाताच्या दृष्टीने हा कायदा योग्य असला तरी त्याची अंमलबजावणी मात्र काटेकोरपणे होताना दिसत नाही.आजही अनेक ठिकाणी दुचाकीस्वार तर सोडाच पण पाठीमागे बसलेल्या व्यक्तीकडे हेल्मेट नसते.काही ठिकाणी वाहतूक पोलिसांनी अश्या व्यक्तीकडून दंड वसूल केल्याचे वृत्तपत्रात वाचले पण लालबाग येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील भारतमाता चौक,लालबाग मार्केट येथील संत जगनाडे चौक या मुख्य ठिकाणी मात्र वाहतूक पोलीस विनाहेल्मेट दुचाकीस्वाराकडे दुर्लक्ष करताना दिसतात. त्यामुळे या मार्गावर अनेक दुचाकीस्वार आणि पाठीमागे बसलेली व्यक्ती विनाहेल्मेट प्रवास करताना आढळत आहेत .त्यामुळे या कायद्याची पूर्ण व काटेकोर अमंलबजावणी झाल्याशिवाय या कायद्याला काहीच अर्थ नाही.

-अरुण पां. खटावकर
लालबाग

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...