केंद्र सरकारने तीनही सैन्यदलात सैनिकांची कंञाटी पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला आहे. संरक्षण मंञालयाने संसदेत रीतसर प्रस्ताव मंजूर करून घेतला असेल तेव्हा विरोधी पक्षांचे खासदार सभेत हजर असणार .त्यांच्या संमतीने प्रस्ताव संमत झाला असेल. प्रस्तावाची अमलबजावणी करणे हे तीनही सैन्यदलाच्या प्रमुखांचे कर्तव्य आहे. सैन्यात कंञाटी पद्धतीने सैनिकांची भरती करून प्रशासनातील विश्वासर्हता कशी राखणार ? सैन्यदलात कंञाटी पद्धत हे न समजणारे कोडे आहे. जे सैन्यदलात सैनिक म्हणून चार वर्षे काम करतील त्यांना शासनाच्या सुविधा - सवलती मिळतील का ? तसेच, सेवा समाप्ती नंतर त्याना कुठे नोकरी मिळेल याची शाश्वती काय ? सर्वाना सुरक्षारक्षक करण्याएवढ्या कंपन्या आहेत का ? भविष्यातील चिंता आंदोलकांना सतावत असावी म्हणूनच प्रशासनाच्या आदेशा विरोधात तरूण उमेदवार रस्त्यावर उतरला.रागाला डोळे नसतात असे लोक म्हणतात हेच यातून दिसून येते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले
पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (प्रतिनिधी): वाॅशिंग्टन डी.सी. (यू.एस्) येथील नामांकित Cederbrook University कडून मानवी आभामंडळ व विश्र्लेषण या विषयावरील ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा