आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, १२ मार्च, २०२२

अंबरनाथ मटका चौक येथे अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलीस नेमणे गरजचे

अंबरनाथ / अविनाश म्हात्रे :- अंबरनाथ मध्ये वाढत्या वाहनांची संख्या आणि गर्दी पाहता सकाळी आणि मुख्यतः संध्याकाळी गर्दीच्या वेळी अंबरनाथ मधील अनेक ठिकाणी त्यात अंबरनाथ मधील महत्वाचं ठिकाण म्हणजे अंबरनाथ पोलीस चौकी / मटका चौक / अंबरनाथ एमआयडीसी हायवे रोड अशा अनेक ठिकाणी वाहतूक पोलीस गरजेचं असून या पूर्वी देखील मुख्य अंबरनाथ मधील महत्वाचं ठिकाणी सिग्नल यंत्रणा बसवणे गरजेचं आहे अशी बातमी प्रसारित केली होती, या चौकात लावण्यात आलेल्या विजेचे खांब हे कमी प्रकाश देणारे आहेत उच्च दर्जाचे जास्त प्रकाश देणारे बल्ब लावावेत अशी रस्ताने प्रवास करणाऱ्या प्रवाशांची मागणी आहे, जेव्हा मंत्री,लोकप्रतिनिधी किंवा व्हाईआयपी व्यक्ती अंबरनाथ मध्ये येतात तेव्हाच येथे वाहतूक पोलीस तात्पुरते तैनात दिसतात,जर छोटे मोठे अपघात टाळायचे असल्यास येथे नियमित पणे वाहतूक पोलीस नेमणे गरजेचं आहे या महत्वाच्या विषयावर अंबरनाथ मधील लोकप्रतिनिधी / पुढारी आणि प्रशासनानी लक्ष देणे गरजेचं आहे.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली मुंबई विभाग कार्यकारिणी बिनविरोध घोषित

मुंबई  (रामदास धो. गमरे):  बौद्धजन पंचायत समिती तालुका दापोली जिल्हा रत्नागिरी या समितीच्या मुंबई विभाग सभासद आणि रहिवाशांची सर्वसाधारण सभा ...