आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, २० सप्टेंबर, २०२५

वसुधा वैभव नाईक यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार (दिल्ली) जाहीर !!

पुणे (प्रतिनिधी): पुणे शहरातील साहित्यिक, कवयित्री, समाज कार्यकर्ती, एक निवृत्त उपक्रमशील शिक्षिका, युवा क्रांती संघटनेची राष्ट्रीय सल्लागार, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेची पुणे उपाध्यक्ष, रमाची पाटी या शॉर्ट फिल्मची लेखिका, शिक्षक ध्येय या साप्ताहिकाची उपसंपादिका, सा.आम्ही मुंबईकर या वृत्तपत्राची उपसंपादिका, बिनधास्त न्यूज रिपोर्टरची पुणे प्रतिनिधी, इत्यादी संस्थांवर कार्यरत असणाऱ्या स्वतःची वसुधा फाउंडेशन नावाची एक सामाजिक संस्थेच्या संस्थापिका व अध्यक्ष आहेत. प्रेमाने जग जिंकता येते. या उक्ती प्रमाणे त्यांचे उत्तम कार्य चालू आहे.
 यांना भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल पुरस्कार-२०२५ जाहीर झाला आहे. ज्येष्ठ समाजसेवक प्रवचनकार डॉ रवींद्र भोळे, अध्यक्ष पद्मश्री डॉ मणीभाई देसाई मानव सेवा ट्रस्ट उरुळी कांचन यांनी वरील सरदार वल्लभाई पटेल हिंदू रत्न पुरस्कार जाहीर केलेले आहेत
डॉ.मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट, क्रीडा मंत्रालय भारत सरकार निती आयोग संलग्नित दिल्ली,आय.एस. ओ. नामांकित प्रा.डॉ.रविंद्र भोळे आरोग्य सेवा केंदाच्या वतीने जाहीर करण्यात आला. हा कार्यक्रम पुणे येथे आयोजित करण्यात आला आहे.वसुधा वैभव नाईक यांनी आजतागायत निस्वार्थ सामाजिक सेवा केल्याबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा यांचा दिल्लीचा पहिला पुरस्कार जाहीर होत आहे.

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संजय दिना पाटील यांच्या पाठपुराव्याला यश, भांडुप स्टेशन परिसर होणार मोकळा, बेस्ट चौकीच्या पुनर्बांधणीचे भूमिपूजन संपन्न

मुंबई (प्रतिनिधी): भांडुप रेल्वे स्थानक मार्गावरील वाहतूक कोंडी, नागरिकांची गैरसोय व वारंवार घडणाऱ्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ...