अशोक अँड ज्योती गोयल फाउंडेशनच्या वतीने ही गरजू विद्यार्थ्याना शालेय साहित्य दिले गेले.सुमारे पन्नास गरजू विद्यार्थ्याना वह्यांचे वाटप राष्ट्र सेवा दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन वैद्य आणि जन आंदोलनाचे राष्ट्रीय समन्वयक डॉ. प्रा.संजय मंगला गोपाळ यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत समाजात सर्वधर्म समभाव जपण्याचे व विविध जाती धर्मात एकोपा निर्माण करण्याचा संदेश देत सफल विकास वेलफेअर सोसायटी संस्थेच्या कामाचे कौतुक करत पुढील कामात आवश्यक सहयोग व मार्गदर्शन देण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाची सुरुवात वैशाली महाडिक यांच्या हस्ते पाहुण्यांना पुष्प देऊन करण्यात आले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निसार अली सय्यद यांनी केले.
सोमवार, २३ सप्टेंबर, २०२४
कुर्बानीच्या पैशातून विद्यार्थ्याना सहकार्य
मुंबई ( गणेश हिरवे)बकरी ईद निमित्ताने ' कुर्बानी ' मधील काही रक्कम शालेय साहित्याच्या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांना देण्याचे आवाहन राष्ट्र सेवा दल, मालवणी, काचपाडा विभाग आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या वतीने मागील सात वर्षांपासून करण्यात येत आहे यंदाही तसे आवाहन केले होते.त्याला प्रतिसाद देत मुस्लिम समाजातील काही नागरिकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घे...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
-
मुंबई (प्रतिनिधी)सण आला नारळी पुनवचा " या गाण्याच्या यशस्वीरित्या वाटचाली नंतर यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त विठ्ठ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा