मुंबई: आजपर्यंत मानवी मनोरे रचून अनेक बाळगोपाळ पथक पाहण्यात येतात. पण अलिबाग येथील "कुर्डूस" गावातील लोकांना एक आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे ही कुतुहलाची कामगिरी आहे. अलिबाग पोयनाड कुर्डूस गावात ही आगळीवेगळी दहीहंडी १९९१ पासून सुरू झाली. मानवी मनोरे न रचता विहीरीच्या कठड्यावर चारपाच सहकारी उभे राहून गोविंदा त्यांच्या हातावर उभा राहून मग हंडी चा अंदाज बघून हाताच्या पंजावर गोंविदा सावध उभा राहतो. विहिरीवर उंच बांधलेली हंडीला हाताचा स्पर्श करून हा मानकरी ठरायला जातो. जेव्हा शिटी वाजते तेव्हा तळहातावरील गोविंदा हा हनुमान पोझ मधून तयार असतो. बाळगोपाळ त्याला उंच हंडीच्या दिशेने भिरकवतात. तोच क्षण वेळेचे योग्य नियोजन करून गोविंदा मारूती सारखी आकाश झेप घेत हंडीला स्पर्श करून मानकरी ठरतो. या आगळ्यावेगळ्या हंडी साठी मुंबईतील पथके ही सामिल होवून मान मिळवण्याचा प्रयत्न करतात. देऊळ आळी गोंविदा पथक या हंडीचे आयोजन करतात .पराग पिंगळे,सचिन पिंगळे,सुशील कुमार पिंगळे,गुरुनाथ शेरामकर, गणेश केणी हे सर्व उत्सवाचे कार्यवाहक म्हणून काम करतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कर्तव्य, करुणा आणि आशेचा किरण : संरक्षण अधिकारी मा. श्रीमती प्रतिभा पाटील मॅडम यांच्या सामाजिक कार्याचा वेध
समाजात कायद्याचे राज्य असले, तरी आजही अनेकदा कौटुंबिक हिंसाचार आणि सामाजिक विषमतेमुळे महिला आणि बालकांना मोठ्या प्रमाणावर अन्यायाला सा...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा