मुंबई: आजपर्यंत मानवी मनोरे रचून अनेक बाळगोपाळ पथक पाहण्यात येतात. पण अलिबाग येथील "कुर्डूस" गावातील लोकांना एक आगळी वेगळी परंपरा जोपासली आहे ही कुतुहलाची कामगिरी आहे. अलिबाग पोयनाड कुर्डूस गावात ही आगळीवेगळी दहीहंडी १९९१ पासून सुरू झाली. मानवी मनोरे न रचता विहीरीच्या कठड्यावर चारपाच सहकारी उभे राहून गोविंदा त्यांच्या हातावर उभा राहून मग हंडी चा अंदाज बघून हाताच्या पंजावर गोंविदा सावध उभा राहतो. विहिरीवर उंच बांधलेली हंडीला हाताचा स्पर्श करून हा मानकरी ठरायला जातो. जेव्हा शिटी वाजते तेव्हा तळहातावरील गोविंदा हा हनुमान पोझ मधून तयार असतो. बाळगोपाळ त्याला उंच हंडीच्या दिशेने भिरकवतात. तोच क्षण वेळेचे योग्य नियोजन करून गोविंदा मारूती सारखी आकाश झेप घेत हंडीला स्पर्श करून मानकरी ठरतो. या आगळ्यावेगळ्या हंडी साठी मुंबईतील पथके ही सामिल होवून मान मिळवण्याचा प्रयत्न करतात. देऊळ आळी गोंविदा पथक या हंडीचे आयोजन करतात .पराग पिंगळे,सचिन पिंगळे,सुशील कुमार पिंगळे,गुरुनाथ शेरामकर, गणेश केणी हे सर्व उत्सवाचे कार्यवाहक म्हणून काम करतात.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
नामदेव ठाकूर यांना राज्यस्तरीय कर्तुत्व गौरव पुरस्कार
उरण दि २३(विठ्ठल ममताबादे )डोंगर परिसरात राहणाऱ्या आदिवासी बांधवांच्या विविध समस्यांना शासनस्तरावर न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र मेहनत घे...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
कल्याण : गुरूवार दि.१५ आॕगस्ट २०२४ रोजी सरस्वती मंदिर पडलेगांव शाळेत या वर्षी दहावीमध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण क...
-
मुंबई (प्रतिनिधी)सण आला नारळी पुनवचा " या गाण्याच्या यशस्वीरित्या वाटचाली नंतर यावर्षी गणपती बाप्पाच्या आगमनानिमित्त विठ्ठ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा