आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, १२ फेब्रुवारी, २०२४

सिताराम बाबाजी तोरस्कर यांचे निधन

मुंबई (प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे जेष्ठ नागरिक सिताराम बाबाजी तोरस्कर( वय -८१ वर्ष )यांचे काल (दि.११/२/२०२४)रोजी रात्री ठिक ११ वाजता निधन झाले.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटूंबासाठी खर्च केले.पूर्वी ते मुंबईत मिल कामगार होते.मिल बंद झाल्यानंतरही ते मुंबईला छोटी मोठी नोकरी करत होते.नोकरी करून कुटूंबाचा गुजारा करत होते.त्यांना गावची खूप आवड होती. स्वर्गीय सीताराम तोरस्कर यांचे गावासाठी मोठे योगदान आहे.त्यांचे वाडी, गाव, तालुका, जिल्हा आणि मुंबई सह उपनगर मधील अनेक नातेवाईक यांच्याशी चांगले सलोख्याचे संबंध होते. काल त्यांच्या परिवारातील जेष्ठ व्यक्ती(सीताराम तोरस्कर ) लोप पावली आहे याचे दुःख परिवाराला आहे. त्यांच्या पच्छात दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखात वाडी, गाव सह मोहन कदम आणि परिवार तसेच सर्व संघर्ष विकास समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, सभासद सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटूंबास दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी व्यक्त केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...