मुंबई (प्रतिनिधी ) रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यामधील कासार कोळवण गावचे जेष्ठ नागरिक सिताराम बाबाजी तोरस्कर( वय -८१ वर्ष )यांचे काल (दि.११/२/२०२४)रोजी रात्री ठिक ११ वाजता निधन झाले.त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य कुटूंबासाठी खर्च केले.पूर्वी ते मुंबईत मिल कामगार होते.मिल बंद झाल्यानंतरही ते मुंबईला छोटी मोठी नोकरी करत होते.नोकरी करून कुटूंबाचा गुजारा करत होते.त्यांना गावची खूप आवड होती. स्वर्गीय सीताराम तोरस्कर यांचे गावासाठी मोठे योगदान आहे.त्यांचे वाडी, गाव, तालुका, जिल्हा आणि मुंबई सह उपनगर मधील अनेक नातेवाईक यांच्याशी चांगले सलोख्याचे संबंध होते. काल त्यांच्या परिवारातील जेष्ठ व्यक्ती(सीताराम तोरस्कर ) लोप पावली आहे याचे दुःख परिवाराला आहे. त्यांच्या पच्छात दोन मुलगे, पुतणे, सुना, नातवंडे असा असा मोठा परिवार आहे त्यांच्या दुःखात वाडी, गाव सह मोहन कदम आणि परिवार तसेच सर्व संघर्ष विकास समितीचे सर्व पदाधिकारी,सदस्य, सभासद सहभागी असून त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो व कुटूंबास दुःख पचविण्याची शक्ती परमेश्वर त्यांना देवो अशी भावपूर्ण श्रद्धांजली सर्वांनी व्यक्त केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
खारेपाटाच्या पाणीप्रश्न सुटावा यासाठी अमर म्हात्रे यांचे सलग सहाव्या दिवशीही उपोषण सुरू !!
प्रतिनिधी : पेण तालुक्यातील वाशी-शिर्की खारेपाट परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न अधिकच गंभीर बनला असून सामाजिक कार्यकर्ते अमर बळीराम म्ह...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा