आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, १० जानेवारी, २०२३

महाराष्ट्रातील शहरांची नावे मराठी असावी

 महाराष्ट्र राज्य स्थापन करण्यासाठी अनेक थोर पुरूषांनी लढा दिला तसा श्री छञपती शिवाजी महाराज यांच्या काळखंडात अनेक मावळे, सरदार,सेनापतींनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी छञपती शिवाजी महाराजांना साथ दिली. हिंदुस्तानावर मुगल, पोर्तुगीजांनी,इंग्रजांनी राज्य केले होते. माञ, छञपती शिवाजी महाराजनी   हिंदुस्तानात हिंदुंचे राज्य स्थापन केले.खरे तर हिंदुस्तानावर आणि हिंदु राज्यांवर आक्रमण करणाऱ्या  व्यक्तींचे नावे शहरात देऊ नये असा दडंक हवा होता परंतु तसे घडले नाही. मुंबई महानगरपालिकेने माञ इंग्रजी नावे असलेल्या ठिकाणी बदलून मराठी - हिंदु नावे देण्याचा नियम केला आहे त्याप्रमाणे मुंबई मधील इंग्रजीत असलेली नावे बदली गेली आहेत. महाराष्ट्रातील शहरांची नावे बदलण्याचा अधिकार नगरविकास खात्याचा आहे. त्याचा त्यांनी उपयोग करून औरंगाबाद चे छञपती संभाजी महाराज नगर केले.उस्मानाबादचे धाराशीव केले आहे. झाडे, फुले , नद्या, पर्वत यांची सुद्धा नावे दिली पाहिजेत. निसर्गाचे ॠण फेडणे माणसाचे काम आहे. महाराष्ट्र सरकारने विचार करून निसर्गाला न्याय द्यावा. 


-महादेव गोळवसकर 
 कल्याण 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

पवईतील आंबेडकरी चळवळीतील युवा तडफदार धाडसी नेतृत्व हरपले

पवई (प्रतिक कांबळे): पवईतील आय.आय‌‌.टी संकुलात कामास असलेले आंबेडकरी विचारधारेचे युवा तडफदार धाडसी नेतृत्व सदैव समाजकार्य करण्यासाठी तत्पर अ...