आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

"रयतेचा राजा" ई- विशेषांकासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

मुंबई   साहित्य जागर मंच , मुंबई ,विठूमाऊली सेवाभावी संस्था , नाशिक व बहिणाबाई साहित्य संस्था , डोंबिवली निर्मित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त "रयतेचा राजा " हा ई -विशेषांक प्रकाशित केला जाणार आहे. या विशेषांकात स्वलिखित कविता, लेख, अशा प्रकारचे साहित्य तसेच विदयार्थ्यांनी काढलेली चित्रे असणार आहेत.कविता विषय छत्रपती शिवाजी महाराज असून जास्तीत जास्त 20 ओळीची मर्यादा आहे. लेखासाठी,1) छत्रपती शिवाजी महाराज आदर्श व्यक्तिमत्व, 2)गड-किल्ले, 3)छत्रपती शिवाजी महाराज कार्य कर्तृत्व असे विषय असून शब्दमर्यादा २५०शब्द आहे.कविता व लेख मोबाईलवर टाईप करून पाठवावे.आपले साहित्य पाठवताना आपला थोडक्यात परिचय, फोटो पाठवावा.

आपले साहित्य विनामूल्य ई विशेषांकात समाविष्ट केले जाणार असून ई बुक प्रकाशन कार्यक्रमाबद्दल कळवण्यात येईल. तेव्हा आपले साहित्य 5 फेब्रुवारी  पर्यंत खालील व्हाट्सअप नंबरवर किंवा इमेलवर पाठवावे. प्रदीप कासुर्डे -7738436449 , महेंद्र सूर्यवंशी -7020921404, लिलाधर महाजन-9867249718

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!

मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...