आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

गुरुवार, २० जानेवारी, २०२२

सार्वजनिक समस्येचे निराकरण ; भाजपचे नागरिकांकडून आभार



मुंबई :   कांजूरमार्ग (पूर्व ) हनुमान नगर येथील साई मंदिराच्या परिसरात  गटार लाईन मध्ये गाळ साचल्यामुळे  परिसरात गटाराच्या पाण्यामुळे  डास, घाणीचे साम्राज्य व स्वच्छतेचा प्रश्न निर्माण झाला होता.  गेले अनेक दिवस तेथील रहिवाशी या समस्येने  त्रस्त होते. या  परिसरातील नागरिकांनी  वरील समस्या  संजय  नलावडे यांना   सांगताच भारतीय जनता पार्टी च्या कार्यसम्राट नगरसेविका सारिका ताई पवार व  भाजप विक्रोळी विधानसभा अध्यक्ष  श्री.मंगेश पवार यांच्या मार्फत सदर  तक्रारीवर अंमलबजावणी करण्यात आली . समस्येचे निराकरण केल्याबद्दल  नागरिकांनी नगरसेविका सारिका ताई पवार  आणि भाजप पदाधिकारी  संजय नलावडे यांचे  आभार  मानले . 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संकल्प संस्थेच्या वतीने पॅरा कौन्सिलिंग कोर्सचा शुभारंभ ; मानसिक आरोग्य क्षेत्रासाठी प्रशिक्षित समुपदेशक घडविण्याचा संकल्प

मुंबई दि. २२ (अधिराज्य) वाढत्या मानसिक तणाव, कौटुंबिक संघर्ष आणि सामाजिक समस्यांच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षित समुपदेशकांची गरज ओ...