पाचशे चौरस फुटांच्या घरांना मालमत्ता कर माफ करून शासनाने एक क्रांतिकारी निर्णयातून सर्वसामान्य, मध्यमवर्गीय मुंबईकर, चाकरमानी कष्टकरी, यांना नववर्षाची विशेष आणि मोठी भेट देवून दिलासा दिलाय यात वाद नाही. एक अभिनंदनीय आणि स्तुत्य निर्णय असंच म्हणावं लागेल. त्याच प्रमाणे तीन चार वर्षांपूर्वी ग्रामीण भागात घरांवर तीस टक्के घरपट्टी करात घसघशीत वाढ करून ग्रामीण भागातील शेतकरी, नागरिक, कष्टकरी आणि व्यावसायिक यांचे जणू कंबरडेच मोडून ठेवले आहे. महाआघाडी शासनाने जसा सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकाभिमुख निर्णय घेतलाय त्या प्रमाणे ग्रामीण भागातील घरपट्टी कर माफ करावा अथवा जर माफ करणे अशक्य असेल तर कमीतरी करावा नव्हे निदान तीस टक्के करण्यात आलेली जीवघेणी वाढीव घरपट्टी जरुर रद्द करावी आणि ग्रामीण भागातील जनतेचा, शेतकरी, कष्टकरी, व्यापारी यांचा शासनाने दुवा घ्यावा एवढीच अपेक्षा.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा