" विभक्त कुटुंब पद्धतीचा परिणाम राहत्या घरांवर झाला.घरे मिळणे दुरापास्त झाले. मुंबई वाढत - वाढत डहाणू,कासरा,खोपोली,पनवेल पर्यंत पोहोचली. मुंबईतील जागांचे दर गगनाला भिडले.ठाणे,नवी मुंबई,वसई - विरार ,पनवेल महानगरपालिका या क्षेत्रातही जागां शिल्लक नाहीत म्हणून लोक त्याही पुढे सरकू लागले.परवडणारे घरे येथे नाहीत. पैशाची जमवाजमव करून घर घेण्याचे स्वप्न पाहणारे हजारो लोक कुठल्या ना कुठल्या कारणाने फसले जातात. नवीन बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी घर घ्यायचे म्हटले तरी विकास घर विकण्याचे काम खाजगी संस्था/ कंपनीला देतात.त्यामुळे अशा ठिकाणी घरे अधिक महागडी असतात.म्हाडा, सिडको या सरकारी कंपण्यानी बांधलेली घरे तुलनेने स्वस्त असतात पण ती कोणत्याही नागरी सेवा सुविधा उपलब्ध नसलेल्या ठिकाणी असतात. येथे घर घेतले तर यातनांना सामोरे जावे लागले. रेल्वे स्टेशन पासून लांब, शाळा,महाविद्यालय,रुग्णालय ,दवाखाने,भाजी मंडई जवळ पास नसते.वाहतूक व्यवस्था नसते .तरी गरजूंना पर्याय नसतो म्हणून येथील घरे शासनाच्या निर्देशानुसार विकली जातात. आता घरे घेणाऱ्यांची संख्या मोठी असल्याने सोडत पद्धत वापरली जाते. येथे फसवणूक होत नाही. जुनी घरे विकत घेताना दलाच्या सुळसुळाटामुळे घरे महाग होतात. घर घेताना कोणाच्या आमिषाला बळी न पडता शांतपणे चौकशी करून मगच घर खरेदी अथवा विक्री करावे असे वाटते.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
शिक्षकांच्या पाठीशी पंचायत समिती खंबीर; करंजाडी गणात 'एआय' तंत्रज्ञान आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर देणार!
मुठवली येथे करंजाडी गणाची पहिली शैक्षणिक आढावा बैठक संपन्न! गडब(अवंतिका म्हात्रे) : महाड तालुका पंचायत समितीचे सर्व अधिकारी व शि...
-
मुंबई ( प्रतिनिधी): श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज जन्म संस्थान श्रीक्षेत्र आपेगाव येथे अत्यंत मानाचा असा ज्ञानरत्न पुरस्कार ...
-
नवी मुंबई(सुभाष हांडे देशमुख) : एस. आय. ई. एस. जुनियर कॉलेज ऑफ कॉमर्स नेरुळ येथे वार्षिक आंतर महाविद्यालयीन पर्यावरण प्रदर्शन सृ...
-
मुंबई (गणेश हिरवे) लालबाग-परळ म्हणजे बॉडीबिल्डिंगचे जणू माहेरघर. मुंबई बॉडीबिल्डर्स असोसिएशन आणि शिवसेना...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा