आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ डिसेंबर, २०२१

लोक गौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या वतीने गुणवंत कामगार प्रभाकर कांबळे यांना " राष्ट्रीय लोक गौरव पुरस्कार "

मुंबई( प्रतिनिधी) विक्रोळी टागोर नगर येथील ज्येष्ठ समाजसेवक, गुणवंत कामगार, वनिता  फाऊंडेशनचे संस्थापक व राज्य गुणवंत कामगार असोसिएशनचे मुंबई जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र रत्न प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी सामाजिक, शैक्षणिक, सहकार ,कामगार व  पत्रकारितेच्या माध्यमातून केलेल्या समाजकार्याची दखल लोकगौरव राष्ट्रीय एकात्मता परिषदेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त वाशी येथील साहित्य  मंदिर सभागृहात आयोजित केलेल्या राष्ट्रीय सन्मान सोहळ्यात सुप्रसिद्ध उद्योजक शेठ एन.के.टी.  चॅरीटेबल ट्रस्ट चे  अध्यक्ष डॉ नानजीभाई. ठक्कर ठाणावाला, अभिनेत्री साक्षी परांजपे अभिनेता व गायक अरुण कुमार यांच्या हस्ते , ,,राष्ट्रीय लोक गौरव पुरस्कार सन्मानचिन्ह व सन्मानपत्र शाल व  गोल्ड मेडल देऊन गौरविण्यात आले आहे  . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  राष्ट्रीय एकात्मता परिषदेचे संस्थापक एन. डी. खान   होते .

         महाराष्ट्र रत्न  प्रभाकर तुकाराम कांबळे यांनी सामाजिक , शैक्षणिक , सहकार  ,कामगार  व पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या अनमोल योगदानाची दखल घेऊन अत्यंत मानाचा असा राष्ट्रीय लोकगौरव पुरस्कार देण्यात आला असून त्यांनी विविध क्षेत्राच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या  जडणघडणीत उल्लेखनीय कार्य करून इतरांच्या प्रगतीमध्ये स्वतःच्या आंतरिक समाधान मानले असून आपल्या कार्याची व  कामगिरीची दखल घेऊन अनेक संस्था-संघटनानी  राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व राज्यस्तरीय  दोनशेहून अधिक पुरस्कार मिळाले आहेत . तसेच महाराष्ट्र शासन अंतर्गत असणाऱ्या कामगार कल्याण मंडळाचा सन 2013 चा  "गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार " मिळालेला आहे

    अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झालेल्या प्रभाकर कांबळे यांना लोक गौरव राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचा सर्व स्तरातून तसेच वनिता फाउंडेशनच्या अध्यक्षा वनिता कांबळे ,व सुनील निकाळे, ज्येष्ठ समाजसेवक  राजेंद्र कांबळे अष्टपैलू कलाकार राजेंद्र सावंत ,राज जाधव आदींनी  अभिनंदन केले आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...