आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शनिवार, ३० ऑक्टोबर, २०२१

१३ व्या महिन्याचा पगार म्हणजे बोनस

स्वातंत्र्य पूर्व काळात ब्रिटिश राजवटीत आठवड्याला पगार मिळत होता.परंतु भारत स्वतंञ झाल्यावर डाॅक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कामगारांना महिन्याला पगार देण्याचा कायदा केला तेव्हा पासून महिन्याला पगार मिळू लागला.चार आठवड्याचा एक महिना म्हणजे अठ्ठेचाळीस आठवडे बाकी राहिले चार आठवडे याचा पगार बोनस म्हणून देण्यात आला.म्हणजे बावण आठवडे पूर्ण झाले. 
     यावरून असे दिसते बोनस हा कामगारांच्या हक्काचा आहे. बोनसच्या मागणी साठी १८ जानेवारी१९८२ साली मुंबईतील बासष्ट कापड गिरण्या मध्ये संप कामगारांनी केला. कामगार संपला पण ' संप ' संपला नाही. कामगार नेत्यांनी बोनससाठी संप करताना भानं ठेवणं महत्त्वाचे आहे. महाराष्ट्रातील मोठ मोठे उद्योग बंद पडले.कामगार बेकार झाला याचं भान ठेवून बोनसची मागणी ताणायला हवी.
    मुंबई महानगरपालिका कामगारांना १९८५ सालापासून सानुग्रह अनुदान देण्याची झाली. शिवसेनेने याच सालात मुंबई महानगरपालिकेत सत्ता मिळवली होती. शिवसेना प्रमुख वंदनीय  बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने मुंबई महानगरपालिका कामगारांना बोनस सुरू झाला. म्युनिसिपल मजदूर युनियनने तत्कालीन कामगार नेते वंदनीय जाॅर्ज फर्नांडिस यांच्या लढ्याला यश आले होते. शरद राव,महाबळ शेट्टी कामगार नेते होते. तेव्हा पासून महानगरपालिका कामगारांना  बोनस  मिळतो आहे.मुंबई महानगरपालिका सेवा देणारी स्वायत्त संस्था आहे म्हणून सानुग्रह अनुदान दिले जाते.मुंबई महानगरपालिकेची पद्धत अन्य  महानगरपालिकांनी अंमलात आणली.त्याचा लाभ महाराष्ट्रातील अन्य महानगरपालिका कामगारांना होतो आहे. 

-  महादेव गोळवसकर 
     कल्याण- पश्चिम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: