सध्या कोविडच्या उडालेल्या हाहाकारामुळे सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत आहे व अशावेळी सामाजिक संस्था,क्रीडा मंडळे, गणेशोत्सव व दहीहंडी पथक व वैयक्तिकरित्या रक्तदान शिबीर आयोजित करून हा तुटवडा भरून काढण्याच आवाहन मुख्यमंत्री व आरोग्यमंत्री यांनी केले आहे.रक्तदानासारखे पवित्र कार्य नाही व आपण केलेल्या रक्तदानामुळं कोणाचे प्राण वाचत असतील तर यासारखं समाधान नाही.रक्ताला जात पात,धर्म प्रांत असा भेदभाव नाही व सर्वांचं रक्त एकाच रंगाचं आहे.एकमेकांना मारून,मारामारी करून रक्त रस्त्यावर सांडवून वाया घालविण्यापेक्षा रक्तदान करून ते गरजूंच्या नसानसातून वाहन केव्हाही चांगलं.तेव्हा सध्याची बिकट परिस्थिती व रक्ताची गरज लक्षात घेता रक्तदानासाठी सर्वानी पुढाकार घ्यायला हवा.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा