आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २८ एप्रिल, २०२१

आगरी साहित्यिक सर्वेश तरेंची मायेची सावली हरवली ; अश्विनी तरे यांचे दुःखद निधन

दिव्या पाटील / नवी मुंबई - आगरीकोळी भाषेची गोडी ज्यांनी जगाला नव्याने दाखवली असे आगरी कोळी साहित्यिक सर्वेश तरे यांच्या आईचे म्हणजेच अश्विनी रवींद्र तरे यांचे दुःखद निधन झाले. अश्विनी तरे ह्यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले होते त्यातील शासनाचा हिरकणी नवोद्योजिका पुरस्काराने त्यांना गौरविण्यात आले होते. 

अश्विनी तरे ह्या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या होत्या. समाजाबद्दल त्यांच्या मनात नेहमीच ओढ होती. 

  त्यांनी अनेक सामाजिक कार्ये देखील केली आहेत. त्यांना पाककलेची देखील फार आवड होती. कुटुंबात व कुटुंबा बाहेर सुद्धा त्या नेहमी दुसर्यांना मदत व पाठिंबा देत असत. त्यांच्या अश्या अचानक जाण्याने सर्वांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सगळी कडे हळहळ व्यक्त केली जात आहे. आदर्श वार्ताहर तर्फे अश्विनी रवींद्र तरे यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: