आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २६ एप्रिल, २०२१

कातळवाडीतील कर्तव्यदक्ष,मनमिळाऊ व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड ; जयराम सखाराम तांबे यांचे दुःखद निधन !

चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मुर्तवडे कातळवाडी गावचे भूमिपुत्र जयराम सखाराम तांबे ( वय वर्षे - ७६ ) यांचे नुकतेच रविवार दि.२५ एप्रिल २०२१ रोजी आकस्मिक निधन झाले.

कातळवाडीतील सामाजिक,शैक्षणिक कार्यात नेहमीच अग्रनिय असणारे हे नेतृत्व होते.कातळवाडी येथील अनेक वर्षे प्रसिद्ध असे साज श्री कला केंद्र यांचे मालक तसेच विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसा.लि.गाव ( कळंबट,केरे, पिळवली, मुर्तवडे ) या संस्थेचे माजी चेअरमन म्हणून कार्यभार संभाळला.कातळवाडी ग्रामीण मंडळाचे सल्लागार व श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ,( तांबेवाडी ) मंडळाचे मार्गदर्शक व श्री हनुमंतरायाचे पुजारी होते.

जयराम तांबे ( बाबा ) म्हणजे कातळवाडीतील एक सर्वश्रुत नाव होते.त्यांच्या अचानक जाण्याने वाडीत शोककळा पसरली आहे.आपल्या प्रेमळ,शांत,नम्र स्वभावाने ते अनेकांच्या ह्रदयी दडलेलं एक व्यक्तिमत्त्व होतं.

त्यांच्या निधनाच्या बातमीने अगदी सगळ्यांनाच धक्का बसला.बाबांनी अथक परिश्रमाने कातळवाडीतील अनेकांना आदर्श म्हणजे श्री हरिश्चंद्र तांबे ( भाई ) यांना त्याकाळी अगदी आर्थिकदृष्ट्या कमकुवत परिस्थिती,अपुरी दळणवळण साधने या समयी देखील बाबांनी त्यांचा मुलगा आमच्या हरी भाईंना उच्च शिक्षण दिले.

  बाबांच्या पोटी हरी भाई,चंदू दादा,प्रभा दादा, राजा दादा,योगेश,नीलम ताई ही त्यांची मुलं आज या साऱ्यांना चांगले संस्कार देत,मायेने वाढवत आज हा परिवार सुखी-समाधानात जीवन जगत आहे.मात्र आजच्या बाबांच्या जाण्याने,या दुःखद घटनेने या कुटुंबावर दुःखाचे सावट कोसळले आहे.त्यांना कातळवाडी ग्रामीण-मुंबई मंडळ व श्री तांबे नवतरुण हनुमान भक्त मंडळ ( तांबेवाडी ) तर्फे भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: