आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, २० एप्रिल, २०२१

माणसा माणसा जागा हो,आरोग्य व्यवस्थेचा धागा हो !!

 कोवीड - १९ पहिला टप्पा संपला, दुसर्या टप्पा सुरू असताना दैनंदिन रूग्णालयात रुग्णांची संख्या वाढते आहे. वर्षभराने कोवीड-१९वर लस आली.केंद्र सरकार, महाराष्ट्र सरकार कोवीड - टप्पा दोन वर नियंत्रण मिळविण्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहेत. कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी लाॅकडाऊन सूरू झाले आहे.पुन्हा परिस्थिती जैसे थे झाली आहे.

   महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे स्वतः परिस्थिती वर लक्ष ठेवून आहेत. सर्व शासकीय यंत्रणा कोनावर मात करण्यासाठी युद्ध पातळी वर काम करीत आहेत. माञ, महाराष्ट्रातील विरोधी पक्ष नेते प्रामाणिकपणे सरकारच्या कामकाज पद्धतीवर सडकून टिका करीत आहेत. जनता माञ, खरे काय आणि खोटे काय यावर लक्ष ठेवून आहे.प्रसार माध्यमातून विरोधीकांची मते कायम प्रसारित करण्यात येतात त्यामुळे जनतेत संभ्रम निर्माण होतो आहे.कोरोनाची नैसर्गिक आपत्ती महाराष्ट्र सरकारने ओढून आणलेली नाही. की,केंद्र सरकारने ओढून आणलेली नाही. परिस्थिती वर मात करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी दोन्ही सरकारांना सहकार्य करण्याची गरज आहे. म्हणून प्रत्येक माणसाने आपण आणि आपल्या कुटुंबियांना नैसर्गिक आपत्तीतून वाचविले पाहिजे. सरकारने आलेल्या निर्बंधांचे पालन केले पाहिजे तेव्हा आपले आरोग्य चांगले ठेवून कोरोनावर मात करता येईल. 

 हाताला सेनीटायझर, तोंडावर मास्क , व्यक्ती मधील अंतर हे नियम पाळले तर कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवा येईल. मागील वर्षी कोनामुळे प्रत्येक व्यक्ती पासून देशाच्या अर्थव्यवस्थेपर्यंत अतोनात नुकसान झाले, मनुष्य हानी झाली. याचे भान ठेवून कोवीड- टप्पा दोन चा मुकाबला केला पाहिजे. आरोग्य सेवेत काम करणार्या सर्व देवदूतांच्या धैर्याला सलाम. 

  -महादेव गोळवसकर , वृत्तपत्र लेखक,  लांजा रत्नागिरी .
                    

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: