आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, ३० सप्टेंबर, २०२०

रेल्वे प्रशासनाने हलगर्जीपणा बंद करावा आणि सर्व सामान्यांसाठी लोकल सेवा सुरु करावी - अनंत हुमणे


     गेल्या सहा महिन्यांपासून लोकल सेवा बंद आहे. कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन जनतेने देखील प्रशासनाला साथ दिली. आज अत्यावश्यक सेवा म्हणून ठराविक लोकल सेवा चालू आहेत. त्यामध्ये सर्व सामान्य नागरिकांना प्रवास करण्यास मनाई आहे.
शिवराज्य कामगार हक्क संघटना महाराष्ट्र राज्य सलग्न पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य ही संघटना संस्थापक,अध्यक्ष श्री.प्रकाश डोंगळे सर यांच्या मार्गदर्शना खाली गेल्या चार लॉकडाउन पासून सतत पोलीस खाते व सामान्य नागरिकांसाठी कोणत्याही प्रकारे मानधन न घेता सेवा करत आहे. पोलीस खात्याला बंदोबस्तासाठी सदैव मदत करत असून जनतेचे सुख-दुःख व इतर अनेक सामाजिक क्षेत्रातील समस्या सोडविण्यासाठी संघटना अहोरात्र सक्रीय  आहे. अशा सेवाभावी कार्य करत असलेल्या संघटनेतील पदाधिकारी व सदस्य यांना काही ठराविक रेल्वे स्थानकावर प्रवास तिकीट नाकारले जात आहे. सरकारकडून कोणत्याही प्रकारे मानधन न घेता संघटना पोलीस खाते व नागरिकांची अहोरात्र सेवा करत असताना संघटनेतील सेवेकरी कर्मचारी वर्गाला लोकलचे तिकीट किंवा मासिक प्रवास पास नाकारले जात आहे. अशावेळी अापण योग्य तो निर्णय घेऊन संघटनेच्या सर्व सदस्यांना त्यांच्या ओळख पत्रावर रेल्वे प्रवासाकरता मासिक पास उपलब्ध करुन देणे या संदर्भात आम्ही केंद्रीय रेल्वे मंत्री पियूष गोयलसाहेब यांना ईमेल द्वारे पत्र पाठवून कळविले होते. पोलीस सेवा संघटनेचे ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अनंत हुमणे यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल येथे व्यक्तीशः रेल्वे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करुन सुद्धा त्यांनी अद्याप योग्य तो निर्णय घेतलेला नाही. DRM ऑफिसमध्ये पत्रव्यहार करा असे सांगण्यात आले.
          तरी रेल्वेच्या संबंधित अधिकारी वर्गाने याबाबत योग्य अशी दखल घ्यावी. लोकल सेवा ही फक्त अत्यावश्यक म्हणून काम कारणाऱ्यांसाठी आहे मग लोकल प्रवासी एवढे वाढले कसे. ह्या कडे रेल्वे प्रशासन यांचा लक्ष नाही का.अनेक लोकांनी  बोगस ओळख पत्र बनवून घेतले आणि खोटे ओळख पत्रावर प्रवास करत आहेत.ज्यांची ओळख आहे त्यांनी बोगस कार्ड बनवले पण सर्वसामान्य माणसाचा काय? त्यांनी बस साठी दोन तास लाईन मध्ये उभे राहायचे का? लोक बेरोजगार झाले आहेत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाने योग्य ति दखल घेऊ लोकल गाड्या वाढवून व  नियम बनवून सर्व सामान्य नागरिकांसाठी सुद्धा लोकल सेवा सुरु करावी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: