आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

'लेखणी बोलते तेव्हा' समूह आयोजित जल्लोष ३०० उपक्रमांचा कार्यक्रम संपन्न.

बातमीदार - राज पवार

विरार ( पालघर )   लेखणी बोलते तेव्हा समूह आयोजित जल्लोष ३०० उपक्रमांचा विशेष कार्यक्रम जल्लोषात साजरा झाला. ३०० उपक्रमांच्या यशामुळे समूह प्रशासक  कवी निलेश हेंबाडे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कवी प्रदीप ऐंगडे काव्यमनी प्रयागदिप उपस्थित होते.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवयित्री प्रिया गावडे यांनी केले तर ग्राफिक्सकार कवयित्री अश्विनी चव्हाण यांनी उत्तम ग्राफिक्स केले. जल्लोष ३०० उपक्रमामध्ये ३३ कवींनी सहभाग घेतला होता. शरयू कुलकर्णी, कालिंदी वाणी, राज पवार,सरोज गाजरे, स्नेहा पंडित, वंदना बिरबटकर, रुपाली पाटील, रविंद्र गिमोणकर,संजना वितुरकर, चंद्रशेखर कानकाटे,अमोल खटावकर, रंजना बोरा,अमोल पवार, वैशाली वर्तक, स्वप्ना चौधरी,संध्याराणी कोल्हे, विद्या आसावा, वेदांती पाटील, संगीता ढोमसे, कल्पना देशमुख, आप्पा तरे, सुनंदा चौधरी, अंजली तरे, जान्हवी कुंभारकर, अरविंद कुळकर्णी, नेहा धारुळकर,माधुरी दायमा, दिनेश मोहरील, चंचल भंडारी,जितेश कायरकर, सुजाता जाधव, लक्ष्मण शेडगे, राजेंद्र वाणी,यांनी हिरवा चुडा, काका, माझी लेखणी यावर उत्तम चारोळ्या सादर केल्या.

                   लेखणी बोलते तेव्हा समूहाचे प्रशासक निलेश हेंबाडे यांनी आभार प्रदर्शन केले. राष्ट्रीय गीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: