आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

सोमवार, २८ सप्टेंबर, २०२०

विरार शिवसेनेच्या वतीने गरजु नागरीकांना पुन्हा जिवनावश्यक वस्तुंचे वाटप..कोरोना संकट काळी मदतीचा हात

नालासोपारा : विरार शहरात देखील कोरोना या संसर्गजन्य रोगामुळे सगळीकडे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या काळात बहुतांश कुटुंबावर उपासमारीची वेळ आली असल्याने मागील मार्च महिन्यात लाँकडाऊन झाल्यापासुन शिवसेना शहर उपप्रमुख श्री.उदय अरुण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग प्रमुख प्रविण आयरे, उप विभाग प्रमुख संतोष राणे, सुनिल चव्हाण, शाखाप्रमुख तुकाराम भुवड यांनी विभागातील कोणतेही कुटुंब उपाशी राहु नये यासाठी कोरोना काळात मनवेलपाडा, कारगिलनगर येथे विविध भागात जाऊन रोज सकाळ-संध्याकाळी 300 नागरीकांना खिचडीचे वाटप करण्यात येत होते तसेच कोकण नगर परिसरात सेनिटायझर वाटप, Arsenic Album च्या गोळ्यांचे वाटप, गणेशोत्सव काळात मनवेलपाडा तलाव शेजारी नेत्र तपासणी शिबीर तसेच उदय जाधव यांच्या शिवसेना "मातोश्री" संपर्क कार्यालय येथे शेकडो गरजु कुटुंबाना जिवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले.

       महामारीच्या काळात महागाई वाढत असल्याने कोरोना बरोबरच कांदाने देखील नागरिकांच्या डोळ्यातुन पाणी काढायला सुरूवात करताच शिवसेनेच्या वतीने विभागातील नागरीकांना अत्यंत स्वस्त दरात कांदे उपलब्ध करून देण्यात आले किंबहुना अत्यंत गरजु असलेल्या काही चाळ-कमिटींना मोफत कांदे उपलब्ध करून देण्यात आले तसेच वसई तालुक्यातुन गणेशोत्सवाला आपल्या गावाला जाणारे चाकरमान्यांची संख्या लक्षात घेता मुख्यमंत्री व परिवहन मंत्री मंत्री यांना पत्रव्यवहार करून कोकणात जाण्यासाठी एस.टी बस सुरू करण्याबरोबरच वसई तालुक्यात खाजगी ट्रव्हल्स कडुन नागरीकांची होणारी लुट थांबवण्यासाठी एकदर निश्चित करून देण्यास विनंती करण्यात आली व ती मान्य देखील देखील झाली.

        वाढत्या कोरोना रूग्णांना रक्ताची कमतरता भासत असल्याने शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री मान.श्री.उध्दवजी ठाकरे यांच्या अावाहनाला प्रतिसाद देत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन देखील "मातोश्री" संपर्क कार्यालय येथे करण्यात आले होते तसेच "सरला रक्तपेढी" च्या माध्यमातुन शेकडो रूग्णांना रक्तपुरवठा करण्यात आला व कोविड रूग्णांना रूग्णवाहिका उपलब्ध करून कोविड सेंटर मध्ये हलविण्यास मदत करण्यात आली.

      पण लाँकडाऊन काही संपत नसल्याचे लक्षात घेऊन मागील 15 दिवसांपासुन पुन्हा एकदा गरजु नागरिकांना मदतीचा हात देण्यासाठी मनवेलपाडा गाव येथील आई एकवीरा इमारत, जय जिवदानी काँलनी, सि.एम.नगर, कारगिल नगर, आश्रया बार मागील इमारती, गणेश चौक, सह्याद्री नगर, विवा जांगीड काँम्प्लेक्स, महाकाली मंदिरच्या मागील एकता नगर, टेपाचा पाडा, राजा नगर, जयदिप शाळेच्या मागील परिसर तसेच कोकण नगर, आई-बाबा नगर या भागातील सोसायटी व चाळ कमिटींचे पदाधिकारी यांच्या मार्फत अत्यंत गरीब व गरजु अशा 200 नागरिकांची यादी मागवुन त्या गरजु नागरिकांना आपल्या कार्यालयात न बोलवता श्री.उदय जाधव यांनी शिवसेना पदाधिकारींसह स्व:ता त्या नागरीकांच्या घरी जाऊन विभागातील शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडीने जिवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.

       पुढील येत्या आठ दिवसात मनवेलपाडा विभागातील 250 रिक्षावाले तसेच कोरोना काळात विरार शहरातल्या मनवेलपाडा विभागातील नागरीकांच्या मालमत्तेच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्विकारलेल्या सोसायटींच्या सुरक्षा रक्षक यांना देखील मदत म्हणुन अन्न-धान्य वाटप केले जाणार आहे.

         आतापर्यंत कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महिला आघाडीच्या सौ.रोशनी रा.जाधव, सौ.साक्षी उ.जाधव, शाखाप्रमुख मंगेश मोरे, चंद्रकांत सावंत, गणेश जाधव, पियुष घडशी, उपशाखा प्रमुख:- प्रकाश गोरिवले, मिलिंद बेंडल, योगेश आंग्रे, प्रदिप मोरे, विनोद गावकर, प्रकाश चावडा, गटप्रमुख: राजेश जाधव, दिनेश खळे, अमोल चाचे, बंड्या गुरखे, अरविंद दामुष्टे, गणेश चिल्ले, दिनेश मोरे, प्रशांत देवळेकर, संतोष साळुंखे युवासेनेचे राहुल नानकर, रोहित कदम, निखील आंग्रे, वैभव कदम, दुर्वैश देसाई, संदिप गोसावी, सुरज हातणकर, ओमकार वर्मा, आकाश मुळे महिला आघाडीच्या प्रतिक्षा गुरव, सुनिता मुळे, रजनी कोठावळे, मंगल गायकवाड, प्राची घडशी आदि शिवसैनिक, युवासैनिक व महिला आघाडी यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: