भारतीय हवामान खात्याने यावर्षी समाधानकारक व सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे.वरुन राजाच्या आगमनाकडे डोळे लावून बसलेल्या सर्वांसाठीच ही आनंदाची वार्ता आहे. राज्यातील काही भागांत मान्सूनचे दमदार आगमनही झाले आहे. गेल्या काही वर्षात पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे देशातील बहुतांश भागात दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा भागात तर भीषण परिस्थिती निर्माण झाली होती. हंडाभर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना वनवन भटकावे लागत होते. अशा वेळी हवामान खात्याने व्यक्त केलेला अंदाज दिलासादायक असाच आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस पडणार असल्याने पावसाचे पाणी वाया न जाता जास्तीतजास्त पाण्याची बचत कशी होईल याचे नियोजन आत्तापासूनच करायला हवे. पावसाच्या पाण्याचा थेंब थेंब वाचवला पाहिजे. नदी, विहीर, तलाव बंधारे यात जास्तीजास्त पाणी साठा कसा होईल याचे नियोजन सरकारी पातळीवर होणे गरजेचे आहे. नागरिकांनीही पावसाचे पाणी वाचवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले पाहिजे. घर, सोसायटी, शासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, याठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम बसवली पाहिजे. जेणेकरून ते पाणी जमिनीत साठवले जाईल. पावसाचे पाणी वाहून वाया जाण्यापेक्षा ते पाणी ते पाणी झाडे,शेती,परसबाग, बगिच्यात पोहचले पाहिजे. पाण्याचा थेंब न थेंब महत्वाचा आहे. पाण्याची जितकी बचत आपण करणार तितके पाणी आपल्याला पुढे वापरायला मिळणार आहे. कारण पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती आहे. पाण्याची बचत ही आता काळाची गरज बनली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार
मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा