आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ जून, २०२०

पुणे जिल्हा रुग्णालयात ७५ वर्षीय महिलेची कोरोनावर मात

सद्यस्थितीत राज्यात कोरोनाचे जवळपास एक लाख चाळीस हजारांच्या आसपास रुग्ण असून बरे होणाऱ्यांची संख्यादेखील सत्तर हजारांच्या घरात आहे. म्हणजेच महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ५०टक्के आहे. जवळपास आठ लाख चाचण्यांतून एक लाख चाळीस हजार पॉझिटिव्ह अहवाल म्हणजे पंधरा टक्क्यांच्या जवळपास आहेत. त्यामुळे निगेटिव्ह रिपोर्टची संख्यादेखील चिंतेचे कारण नसल्याचेच दर्शवते. उपचार घेत असलेले बहुतांश रुग्णदेखील सौम्य व कोणतेही लक्षण दिसत नसलेलेच आढळून येत आहेत. हे रुग्णदेखील लवकरच बरे होऊन घरी परतणार आहेत. त्यामुळे कोरोनाबाबत जास्त काळजी नसावी. तसेच या आजाराचा फार धसका घेणेदेखील बरे नव्हे. मात्र आवश्यक प्रतिबंधात्मक दक्षता ही घ्यायलाच हवी. सर्वसाधारणपणे ज्यांची प्रतिकार शक्ती चांगली आहे असे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. मुंबई ठाण्यासारख्या मोठ्या शहरांत ही रुग्णसंख्या व मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. असे असले तरी राज्यातील सर्वच महानगरपालिकांमध्ये कोरोना व संशयीतांना रोखणे आव्हानात्मक ठरत आहे. यातच वयोवृद्ध, विविध आजारांचे रुग्ण यांना कोरोनाची लागण झाली तर त्यांना त्यातून बरे करण्याचे मोठे आव्हान आरोग्य यंत्रणांसमोर उभे ठाकते. पुण्याच्या शासकीय जिल्हा रूग्णालय येथेदेखील कोरोना रूग्णाकरीता विशेष वार्ड तपासणी ऊपचार सुविधा उपलब्ध करणेत आली आहे़. मागील आठवड्यात अतिदक्षता विभागातील चार रुग्ण ठणठणीत बरे होवून घरी सोडण्यात आले, यात एका ७५ वर्षाच्या महिलेचा समावेश आहे. एक महिन्यापूर्वी या महिलेस रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, त्यावेळी तिला निमोनिया आणि डायबिटीस चा त्रास होता, त्यातच तिला कोरोनाची लागण झाली. अशा परिस्थितीत तिला २५ दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले, नंतर तिला ७ दिवस जनरल वॉर्ड मध्ये ठेवण्यात आले आणि अखेर कोरोनावर मात करून तिला घरी सोडण्यात आले. याबद्दल रुग्णालयीन अधिकारी कर्मचाऱ्यांचे कौतुक करायलाच हवे. तात्पर्य इतकेच की कोरोना झाला म्हणजे मृत्यू अटळ हा समज डोक्यातून काढून टाकायला हवा. तुमचे वय कितीही असो, तुम्हाला लक्षणे असोत नसोत, तुमची रोगप्रतिकार शक्ती चांगली असली की कोरोना तुम्हाला अधिक काळ जखडून ठेवू शकत नाही. त्यामुळे कोरोनाबधित व्यक्तींनो, अजिबात मानसिक दडपण न घेता योग्य आहार, पथ्ये व दक्षता घेऊन लवकर या आजारावर मात करून बरे व्हा. तसेच भविष्यात या आजाराची लागण होऊ नये म्हणून आवश्यक काळजी मात्र घ्यायलाच हवी. 


-वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

फिलिप रॉड्रिग्ज यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

मुंबई (गणेश हिरवे) शिक्षक नेते शिवाजी शेंडगे आयोजित नुकताच शिक्षक स्नेहमिलन कार्यक्रम दहिसर येथील पूजा हॉल मध्ये संपन झाला.यावेळ...