नागरिकांची रोग प्रतिकार शक्ति वाढावी यासाठी रोग प्रतिबंधक उपाय म्हणून ग्रामीण भागातील गाव, वाडी, वस्त्यांवर ग्रामपंचायत, सामाजिक संस्था, व्यक्ति यांच्या कडून गोळ्यांचे वाटप केले जाते उपक्रम उत्तम, स्वागतार्ह, आवश्यकच आहे यात वाद नाही. परंतु होतय काय की अनेक वृद्ध, अशिक्षित ग्रामस्थांचा गैरसमज झालेला ही आढळूण येतोय की दिलेल्या गोळ्या तीन दिवस घेतल्या की माझ्यापाशी करोना येणारच नाही, त्याचा प्रादुर्भाव होणार नाही अर्थात हे अशिक्षितपणामुळे घडते आहे किंवा न समजल्यामुळे आणि म्हणूनच गोळ्या वाटप करणार्या स्वयंसेवकानी, कर्मचार्यांनी अशा वृद्ध, अशिक्षित ग्रामस्थाना समजेल, पटेल, उमजेल अशा भाषेत सांगावयास हवे, पटवून द्यायला हवे की आम्ही देत असलेल्या गोळ्या फक्त शक्ति वाढविणार्या आहेत, कोरोना जवळ येऊ नये म्हणून शासनाने दिलेले नियम पाळलेच पाहिजेत, शक्यतो बाहेर पडू नका आणि जावच लागलं तर नाका तोंडाला मास्क, रुमाल लावूनच बाहेर पडा आदि मार्गदर्शन त्यांना समजेल तो पर्यन्त करावयास हवे असे वाटते.
-विश्वनाथ पंडित
जिजामाता मार्ग, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा