कोकणातील बळीराजाच्या मागे लागलेली संकटाची मालिका काही केल्या थांबेना. लॉक डाऊन आणि निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्याने हतबल झालेल्या कोकणातील बळीराजाच्या पुढे आणखी एक नवे संकट आले आहे. कोकणातील बळीराजाने पावसाळा सुरु होण्यापूर्वीच आपल्या शेतात भातरोपांची लावणी केली होती. कोकणातील बळीराजा भात बियाणांची लावणी करून पावसाची वाट पाहत असताना ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळाने सर्वांचे कंबरडे मोडले. निसर्ग चक्रीवादळात समुद्राला आलेल्या भरतीत समुद्राचे खारे पाणी शेतात शिरल्याने भात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शेतात समुद्राचे खारे पाणी शिरल्याने भात बियाणे वाया गेल्याने संपूर्ण हंगामच हातचा गेला आहे त्यामुळे बळीराजा चिंताक्रांत झाला आहे. समुद्राचे खारे पाणी सुमारे साडे तीनशे हेक्टर शेतात शिरल्याने तेवढी जमीन नापीक होण्याची भीती निर्माण झाली आहे. खाडीचे पाणी शेतात येऊ नये म्हणून खारभूमी विभागाकडून खाडीच्या मुखाजवळ स्वयंचलित दरवाजे लावण्यात येतात. भरती ओहोटीच्या वेळी समुद्राचे खारे पाणी शेतात शिरू नये हे दरवाजे लावण्यात येतात पण निसर्ग चक्रीवादळात यातील काही दरवाजे तुटल्याने समुद्राचे खारे पाणी थेट शेतात शिरले. कर्ज काढून बळीराजाने भात बियाणे आणले होते आता हातचा हंगाम गेल्याने हे कर्ज कसे फेडायचे तसेच हा हंगाम गेल्याने घर संसार कसा चालवायचा या विवंचनेत कोकणातील बळीराजा सापडला आहे. बळीराजाला या विवंचनेतून बाहेर काढायचे असेल तर सरकारने कोकणातील बळीराजाला मदतीचा हात द्यावा. ज्या शेतकऱ्यांचा शेतात समुद्राचे खारे पाणी शिरले आहे अशा शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी.
दौंड जिल्हा पुणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा