मुंबई(शांताराम गुडेकर )
मुंबई मध्ये मोठ्या प्रमाणावर परराज्यातील मजूर कामगार करोना आणीबाणी मध्ये अडकले या कामगारांना मुंबई महानगर पालिकेच्या वतीने विविध विभागातून त्या त्या विभागातील वार्ड आँफीसर,सीडीओ, पोलिस अधिकारी सहकार्य मदत करत आहे. अशाच प्रकारे मुलुंड,टी विभागाच्या वतीने ठाणे स्टेशन वरून सूटणारे रेल्वे गाडी ने आपल्या गावी परतणारे १२०० प्रवासी यांना, अन्न पाकीट, १२०० मास्क, १२०० पाण्याच्या बाटल्यांचे वाटप करण्यात आले. या वेळी रेल्वे अधिकारी,सहायक पोलिस अधिकारी वाळके,मनपा अधिकारी सीडीओ वेदिका पाटील, गणेश आंबोरे या विधायक उपक्रमाला सहकार्य केले. दैनिक जनखुलासाच्या वतीने अशा कर्तव्य दक्ष अधिकारी, कर्मचारी यांचे शत:आभार व्यक्त करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा