मुंबई (प्रतिनिधी)सुनिर्मल फाऊंडेशन हि धारावीतील प्रतिष्ठित अशी फाऊंडेशन असून धारावीतील गरीब आणि गरजूच्या मदतीसाठी सतत कार्यरत असते.धारावीशिवाय सुनिर्मल फाऊंडेशन आपल्या कार्याचा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा पुरेपूर प्रयत्न करते.म्हणूनच "एक दिवाळी आदिवासी आणि बेघर मुलासोबत गेल्या आठ वर्षांपासून हा उपक्रम राबवित आहे.
यावर्षी सुद्धा सुनिर्मल फाऊंडेशनच्या वतीने ठाणे येथील जीवन संवर्धन या संस्थेत राहत असणाऱ्या अनाथ आणि बेघर मुलीं सोबत फराळ वाटून दिवाळी साजरी केली.यावेळी शब्दश्री विलास देवळेकर यांनी दीपावली वर आपली कविता सादर करून वातावरण मंत्रमुग्ध केले.सुनिर्मल फाउंडेशनच्या वतीने दिवाळी फराळ वाटप करण्यासाठी दत्ता खंदारे, परशुराम गजाकोष,राम म्हस्के,ओमकार खंदारे,प्रदीप खंदारे, भावेश खंदारे, मंगेश गायकवाड, सामाजिक कार्यकर्त्यां सौ श्रद्धा तेंडुलकर, सामाजिक कार्यकर्त्यां पुनम जगताप,प्रेरणा खंदारे,वैष्णवी खंदारे,पत्रकार दिलीप शेडगे, पत्रकार शशिकांत सावंत, साहित्यिक विलास देवळेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.तसेच जीवन संवर्धन फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सदाशिव चव्हाण यांचे सहकार्य लाभले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा