आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० सप्टेंबर, २०२५

कामगारांच्या वेदनांनी काळीज पिळवटून टाकणारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील सत्य घटनेवर आधारित एक अलौकिक नाट्यकृती "ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स"

मुंबई( महेश्वर तेटांबे): दि.२७.०९.२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजता साहित्य संघ मंदिर नाट्यगृह, चर्नीरोड या ठिकाणी मौर्या प्रतिष्ठान आयोजित, डॉ.सोमनाथ सोलवलकर लिखित, महेंद्र दिवेकर दिग्दर्शित "ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स" हा सत्य घटनेवर आधारित एक उत्कृष्ट नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड उत्साहात पार पडला. या नाटकाचे लेखक "डॉ.सोमनाथ सोलवलकर" यांच्या उत्कृष्ट लेखणीतून साकारलेली ही नाट्यकृती आज खऱ्या अर्थाने अनुभवायला मिळाली. आणि त्याच ताकदीने नाट्याची जाण असलेले अनुभवी नाट्य अभिनेते आणि दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांनी आपल्या अभ्यासपूर्ण दिग्दर्शनातुन रंगमंचावर साकारलेली प्रत्येक व्यक्तिरेखेच्या प्रसंगनिष्ठ भावनेने रेखाटलेले हुबेहूब असे भीषण चित्रण या कलाकृतीची याची दाद द्यावी तेवढी कमीच आहे. "ईम्युनिटी-दि व्हाईस ऑफ टॉलरेंन्स" या नाटकाचा विषय व त्यातील असलेले गांभिर्य हे केवळ आणि केवळ आजच्या बदलत्या संस्कृतीमधल्या बड्या बापजाद्या बिल्डर्संना/व्यावसायिकांना मोठ्याल्या व्यावसायांमधून मिळणा-या भरमसाठ श्रीमंतीच्या हव्यासापायी दिवसाच्या २००-३०० रुपयाच्या मजूरीसाठी राब राब राबवणा-या बिचा-या सामान्य कामगारांच्या दैनंदिन गरजेच्या व्यथा ह्या कोविड सारख्या भयानक महामारीमध्ये सुद्धा ह्यांना न कळाव्यात एवढे खेदजनक असल्याचे भासते. कारण या कोविड-१९ साथीच्या काळात अनेक कामगारांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. देशात लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कारखाने आणि कामाची ठिकाणे बंद पडल्याने लाखो स्थलांतरित कामगारांना उत्पन्नाचे नुकसान, अन्नटंचाई आणि त्यांच्या भविष्याबद्दल अनिश्चिततेचा सामना करावा लागला होता. अशा परिस्थितीत आपल्या उपजिवेकेसाठी कोणत्याही वाहतूकीचे साधन नसताना रात्रंदिवस चालून प्रवास करुन मुळ गावी जायचे स्वप्न पाहणा-या या कामगारांचा अचानक रेल्वेच्या मालगाडीच्या अपघातात मृत्यू होणे ही बाब मनाला चटका देणारी होती आणि याचे प्रसंग वर्णन चित्रण हे दिग्दर्शकाने उत्तम रीत्या मांडले आहे. 
     मुळात या नाटकातील सर्व कलाकारांनी समजून उमजून आणि अतिशय उत्कृष्ठ पद्धतीने केलेल्या उत्तम अभिनयाला नक्कीच यश आलं आणि पुढे देखील येईलच असं एक प्रेक्षक म्हणून मला वाटतं, कारण कोणत्याही नाटकाची जमेची बाजू म्हणजे त्या नाटकाचा ज्वलंत विषय व त्या ज्वलंत विषयाला तेवढ्याच ताकदिने धगधगीत ऊर्जा देणा-या नाटकातील पात्रांची योग्य निवड, या नाटकातील पात्रांची निवड अतिशय समर्पक अशी झाली होती की, कारण या नाटकाच्या विषयाचा असलेला पोत आणि त्यातील विषयाचं असलेलं गांभिर्य हे ठळकपणे मांडण्याची जबाबदारी ही निवडलेल्या प्रत्येक कलावंतांची असते, तिच जबाबदारी योग्य व टोकदार नजाकतीने व भावभावनांच्या हिंदोळ्यावर झुलणा-या पाळण्याप्रमाणे ठोसपणे मांडण्याचा प्रयत्न आजच्या नाट्यप्रयोगातील प्रत्येक पात्रांनी अगदी जीव ओतून केला असं म्हणणं वावगे ठरणार नाही. या नाटकालीत मुख्य पात्र असं कुणीच न्वहतं. सगळीच पात्र जशास तशा तोडीची होती त्यात प्रामुख्याने "कम्मो" "शिवा" "चंपक चाचा" "मुकादम" "सलिल चाचा" त्याचबरोबर नाटकातील दोन बाल कलाकार यांच्या अभिनयाने तर नाटकाची ऊंची अधिकच वाढली. प्रकाशयोजनाकार श्याम चव्हाण यांनी दिलेली प्रकाशयोजना कोरोना महामारीच्या प्रवासादरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या त्या सर्व कामगारांच्या वेदनादायी व्यथा रंगमंचावरील चंद्राच्या साक्षीत पाण्याच्या लखलखत्या प्रत्येक थेंबातून नाटकाचे संगितकार महेंद्र मांजरेकर यांच्या संगितातून जाणवत होत्या. प्रत्येक रंगकर्मी ने आपापल्या परीने मोलाचे योगदान दिले त्यामुळे नाट्यप्रयोग अतिशय सुंदर झाल्याचे माझ्यासारख्या अनेक प्रेक्षकांचे मत आहे हे मी ठामपणे सांगू ईच्छितो. खरं पाहता वयाच्या 12 वर्षांपासून कलाक्षेत्रात खडतर प्रवास करणारे प्रतिभावान दिग्दर्शक महेंद्र दिवेकर यांनी या नाटकातील प्रत्येक प्रसंग आपल्या कल्पक आणि तल्लख बुद्धीने जिवंत केला आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही एकंदरीत सर्व कलावंतांनी आपल्या बहारदार अभिनयाने आपली इम्युनिटी वापरून जान आणली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

गरिबांची दिवाळी गोड होण्यासाठी सामाजिक संस्था पुढे सरसावल्या

दरवर्षी दिवाळी आणि इतर सणांनिमित्त आनंदाचा शिधा रेशन दुकानांवर शासनाकडून देण्यात येतो, पण यंदा तो देण्या...