अलिबाग- वारकरी संप्रदाय नसता तर आजची नवी पिढी भरकटली असती. या पिढीला खऱ्या अर्थाने परंपरा, संस्कार काय असतात हे वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून माहीत होत आहे. आजच्या काळात भगवंताला मानणारी कोणतीही व्यक्ती रस्त्यावरून दिंडी जात असताना नकळतपणे नतमस्तक होते, असे राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु. आदिती तटकरे आज खालापूर येथे म्हणाल्या.
महाराष्ट्र वारकरी साहित्य परिषद यांच्या विद्यमाने 10 वे अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलन रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील देवन्हावे येथील नोव्हाटेल इमॅजिका या ठिकाणी दि.22 व 23 जानेवारी 2022 हे दोन दिवस आयोजित करण्यात आले असून या संमेलनास राज्यमंत्री तथा पालकमंत्री रायगड कु.आदिती तटकरे यांनी शुभेच्छा देण्यासाठी भेट दिली,त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी वारकरी परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील (काकाजी) दिनेश डिंगले, खासदार श्रीरंग बारणे, सुनील पाटील, वारकरी व अन्य मान्यवर कोरोना नियमांचे तंतोतंत पालन करीत उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा