आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

शुक्रवार, २६ नोव्हेंबर, २०२१

भारतीय संविधानाची प्रास्ताविका

 

आमचा मान,आमचा सन्मान

 भारतीय संविधान, भारतीय संविधान"

    ९ डिसेंबर १९४६ साली संविधान सभेचे पहिले सत्र सुरू झाले. २वर्ष ११महिने १७दिवस अखंड परिश्रम करून भारतीय संविधान तयार झाले.२६ नोव्हेंबर १९४९ रोजी  संविधान मसुद्याला  मान्यता देण्यात आली आणि २६ जानेवारी १९५०पासून संविधान अंमलात आले आणि आपला देश प्रजासत्ताक झाला. 

   भारतीय राज्यघटना हे जगातील सर्वात मोठे लिखित संविधान असून  समता, बंधुता, स्वातंत्र्य, लोकशाही,न्याय, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, राष्ट्रीय एकात्मता  या मूल्यांची घटनेत बीजे रोवून  संविधानाची निर्मिती करण्यात आली आहे . मुळ घटनेत १ प्रास्ताविका, ८ अनुसुची, २५ भाग आणि ३९५ कलमे होती. सध्या भारताच्या घटनेत १ प्रास्ताविका, १२ अनुसुची, २५ भाग, ४४८ कलमे, ५ परिशिष्टे आहेत.

      आपल्या संविधानचा आत्मा कशात आहे असे म्हटल्यास संविधानाचा  आत्मा हा  प्रास्ताविकेत आहे  असे म्हणता येईल जसे एखाद्या मंदिराचे सौंदर्य  त्याचा कळस पाहिल्यावर आपण ठरवतो त्याचप्रमाणे beauty of indian constitution असे म्हटल्यास premble असे म्हणता येईल.

     आपले  प्रास्ताविक हे वेगळे  आणि वैशिष्ट्यपूर्ण असे आहे.मग प्रश्न पडतो ही घटना  कुणाची आहे तर ही आम्हा भारतीय लोकाची आहे.आम्ही म्हटल्यावर  आपलेपणा एकजूटपणा निर्माण होतो. कोणताही धर्म या प्रेषित याचे नाव न घेता व्यक्तीला सर्वोच्च स्थान देणारी ही घटना आहे.म्हणून याची सुरुवात आम्ही भारतीय लोक अशी करण्यात आली आहे.मग ही कोणत्याही देशाची आहे तर जो देश सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही गणराज्य आहे अशा आमच्या भारत देशाची आहे. प्रास्ताविकेतून देशाची वाटचाल, ध्येयधोरणे, इच्छा आकांक्षा प्रतिबिंबीत होतात.देशातील नागरिकाला ही घटना स्वातंत्र्य, समानता , न्याय,एकता, बंधुता या मुल्याची हमी देते आहे आणि त्यानुसार घटनेत  विविध कलमाद्वारे  तरतुदी करण्यात आल्या आहेत.व्यक्तीला मुक्त व विकासाला  पोषक असे वातावरण हवे असेल तर  ही चार ही तत्व आवश्यक आहेत.यात सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय आहे. दर्जा  व संधीची समानता आहे. विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य आहे तसेच व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता अबाधित राखणारी बंधुता अपेक्षित असून या सर्व तत्वाची पूर्तता करण्याचा निर्धार केला जात आहे. शेवटी  संविधानाचा आम्ही स्वीकार करीत असून स्वताप्रत अर्पण करीत आहोत. म्हणजेच या प्रास्तविकेची सुरुवात ही आम्ही पासून होऊन शेवट हा स्वतः पर्यंत होत आहे आणि मला वाटतं हेच आपल्या प्रास्ताविकेचे वैशिष्ट्य आहे.देशातील प्रत्येक नागरिकाला सन्मान देणारे,त्याच्या मूलभूत हक्कांना अधिकारांना संरक्षण देणारे, नागरिकांच्या प्रगतीसाठी विविध कायदे करणारे आपले भारतीय संविधान चिरायु होवो हीच आपल्या सर्व भारतीयांची भूमिका असली पाहिजे.

    आमचा मान, सन्मान,शान  हे आमचे संविधान आहे.त्याच्याशी कटिबद्ध राहण्याचा आम्हा भारतवासीयांचा अखंड प्रयत्न राहिल.

   -प्रदीप महादेव कासुर्डे , घणसोली, नवी मुंबई 

     मो.7738436449






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...