मुंबई (प्रतिनिधी)- विक्रोळी टागोर नगर येथे वनिता फाउंडेशन ,एरिया सभा समर्थन मंच , तक्षशिल बुद्ध विहार समिती च्या वतीने संविधान दिनानिमित्त भारतीय संविधान ७४ वी घटना दुरुस्तीच्या अनुषंगाने वार्ड निहाय एरिया सभा द्वारे नगर राज बिल व मतदार जागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी स्थानिक वार्ड नंबर ११९ च्या नगरसेविका मनिषा ताई रहाटे होत्या. यावेळी त्यांनी आपल्या वार्डातील सोयीसुविधा व समस्या कोण- कोणत्या प्रकारच्या आहेत याची माहिती दिली. भारतीय संविधान 74 वी घटनादुरुस्ती नुसार महानगरपालिका प्रशासन यांच्या निर्णय प्रक्रियेत नगराज विधेयकाच्या माध्यमातून लोकांचा प्रत्यक्ष सहभागासाठी क्षेत्र सभा ,/एरिया सभा वार्ड निहाय कमिट्या स्थापन करून कायद्याची अंमलबजावणी करून आपल्या विभागाचा विकास होऊ शकतो म्हणून या सभेचे आयोजन करून स्थानिक नगरसेविका मनिषा ताई रहाटे यांच्यासोबत करून वार्ड क्रमांक ११९ ची सर्व प्रकारची माहिती घेण्यात आल्याचे वनिता फाउंडेशनचे संस्थापक प्रभाकर कांबळे यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन मैत्री सामाजिक संस्थेचे अध्यक्ष व एरीया सभा समर्थन मंचाचे सुरज भोईर यांनी केले . या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती मध्ये डॉ. श्रीपाल कांबळे, मनसेचे वार्ड अध्यक्ष संतोष देसाई मा. हुसेन शेख, राजेंद्र भिसे , प्रीती क्षीरसागर ,सिताराम शेलार समाजसेवक डॉक्टर योगेश भालेराव वनिता फौंडेशनच्या अध्यक्षा वनिता ताई कांबळे तक्षशिला बुद्ध विहारचे मनोज भाऊ निकाळे ,अरुण कांबळे ,प्रदीप हिरे ,पत्रकार अविनाश माने आदी मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी मार्गदर्शनपर विचार मांडले व सर्वांना भारतीय संविधान उद्देशिकेचे वाटप करण्यात आले .शेवटी सर्वांचे आभार फाऊंडेशनचे डॉ. श्रीपाल कांबळे यांनी मांडले . राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान
मुंबई (गणेश हिरवे) दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
-
मुंबई(उदय दणदणे) महाराष्ट्रातील लोककला परंपरेतील कोकणातील कलगी तुरा लोककला व लोककलावंतांची मातृसंस्था- "कलगी तुरा समाज उन्न...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा