उरण - खासदार कपिल पाटील( राज्यमंत्री- पंचायत राज्य भारत सरकार) यांच्याकडे उरण-पेण-पनवेल येथील महामुंबई सेझ ने ज्या जमिनींचा भूसंपादन करून 45 गावातील शेतकऱ्यांची जमीन कवडीमोल भावाने व काहींची तर फसवणूक करून घेतली होती. त्यासंदर्भात केंद्रीय मंत्री कपील पाटील यांच्या भिवंडी येथील निवास स्थानी मिटिंग लावण्यात आली होती. व ही मिटिंग जवळपास अर्धा तास त्यांच्या कार्यालयात चालली.खासदार तथा केंद्रीय मंत्री कपील पाटील यांनी सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्यात येईल व पुढील मिटिंग ही सह्याद्री अतिथीगृहात महसूल विभागाचे सचिव, जिल्हाधिकारी रायगड व सर्व संबंधित तालुक्यातील तहसीलदार यांच्या समवेत लावण्यात येईल असे सांगितले.सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असेही खासदार कपील पाटील यांनी उपस्थितांना सांगितले. ह्या प्रसंगी पेण येथील सेझ च्या जमिनी परत शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी लढा देणारे प्रकल्पग्रस्त सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष अरुण पाटील, उपाध्यक्ष कृष्णा वर्तक, कायदेशीर सल्लागार डी. पी. म्हात्रे, कार्याध्यक्ष प्रभाकर मोकाशी व उरण पूर्व विभागातील गोरख ठाकूर,चंद्रकांत घरत, भुपेंद्र ठाकूर, सुरज म्हात्रे आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे हेच एकमेव उद्दिष्ट असल्याने आम्ही उरण पूर्व विभागातील शेतकऱ्यांनी, सामाजिक कार्यकर्त्यांनी खासदार कपील पाटील यांची भेट घेऊन सेझ ची समस्या त्यांच्या समोर मांडली असल्याचे उरण पूर्व विभागातील सामाजिक कार्यकर्ते गोरख ठाकूर यांनी सांगितले. या बाबतीत खासदार कपील पाटील यांची भूमिका हे सकारात्मक असल्याने लवकरच हा प्रश्न सुटेल अशी आशा उरण, पनवेल, पेण मधील प्रकल्पग्रस्त, शेतकरी, सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
देवरुखात जागतिक महिला आणि कामगार दिन संयुक्तपणे होणार साजरा ; विशेष योगदान दिलेल्या कर्तृत्ववान महिलांना लोकनिर्माण हिरकणी सन्मान २०२४ आणि कामगार क्षेत्रात विशेष योगदान दिलेल्या कामगारांना गुणवंत कामगार पुरस्कार होणार प्रदान
मुंबई (शांताराम गुडेकर ) लोकनिर्माण वृत्तपत्राच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षे जागतिक घडामोडींवर अनेक उपक्रम साजरे करण्यात येतात...
-
मुंबई (प्रतिनिधी ) राज्य गुणवंत कामगार असोसिएशन. चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली महानंदा डेअरी.गोरे...
-
ठाणे : शनिवार दि.१३ मे रोजी पडलेगांव मधील श्री व सौ सुगंधा पंढरीनाथ ठाकुर यांचे सुपुत्र चि.निखिलच्या लग्नकार्यातील तांदूळ दळण्याच्या विधीम...
-
मुंबई दि. २० (अधिराज्य) प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली १९८४ साली पक्षाची जी पुनर्बांधणी झाली तेव्हापासून बाळासाहेबांच्या ...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा