आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २९ सप्टेंबर, २०२१

राज्यस्तरीय वृत्तपत्रलेखन स्पर्धा २०२१

मुंबई- जॉय सामाजिक संस्था मुंबई च्या वतीने मराठी वर्तमानपत्रात वाचकांच्या सदरात लिखाण करणारे वृत्तपत्रलेखक यांच्यासाठी ( बातम्या देणारे पत्रकार नव्हे ) वृत्तपत्र लेखन स्पर्धा २०२१ चे आयोजन करण्यात आले असून १ जानेवारी २०२१ ते ३० सप्टेंबर २०२१ या कालावधीत प्रसिद्ध झालेल्या दोन पत्रांची झेरॉक्स प्रत ( व्हाट्स अप वर नाही ) पाठवून देण्यात यावी असे आवाहन संस्थेचे संस्थापक-अध्यक्ष गणेश हिरवे यांनी केले असून पहिल्या तीन उत्कृष्ट पत्रलेखकाना व दोन उत्तेजनार्थ अशी एकूण पाच पारितोषिक सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.पत्रलेखकानी आपली पत्रे  स्पीड पोस्ट किंवा कुरिअरनेच (साध्या पोस्टाने नाही) गणेश हिरवे, २/१२ पार्वती निवास,रामनगर, बांद्रेकरवाडी, डॉ देशमुख जवळ,जोगेश्वरी पूर्व येथे २५ ऑक्टोबर पर्यत पोहचतील अशा रीतीने पाठवावीत. व्हाट्स अप व  इ-मेल वर आलेल्या पत्रांचा स्पर्धेसाठी विचार केला जाणार नाही..परीक्षकांचा निर्णय अंतिम असेल,असे आवाहन जॉय च्या वतीने करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: