आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २१ एप्रिल, २०२१

करोनाच्या नियंत्रणासाठी सर्वांनी राजकीय मतभेद विसरून प्रामाणिकपणे प्रयत्न करायले हवेत– मोहन चिराथ यांनी केले आवाहन

मुंबई /विशेष प्रतिनिधी : मागील  एक वर्षापासून करोना महामारीच्या काळात  संपूर्ण देश विळख्यात सापडला आहे. मृत्यूची  संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना महामारीच्या काळात योग्यतो समन्वय साधून भांडुप मध्ये करोनावर कशी मात करता येईल, याबाबत कोणत्या प्रकारच्या तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.

    मनपा व पोलीस प्रशासनाला कोणत्या पद्धतीने सहकार्य करावे लागेल. याकरिता भांडुप विभागातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, खासदार, आमदार, व राजकीय पक्षांचे सर्व पदाधिकारी व नागरिकांनी मनभेद व  मतभेद विसरून एकत्र पुढे येऊन या परिस्थितीचा आढावा घेऊन योग्यतो समन्वय साधावा.असे कळकळीचे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा क्रमांक 110 शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी सर्व पक्षीयांना केले आहे.ते माध्यमांशी बोलत होते.शाखाध्यक्ष मोहन चिराथ म्हणाले की, आजमितीला भांडुपमध्ये सुसज्ज  सर्व सुविधा योग्य स्वतंत्र कोविड सेंटर उभारण्यात आलेले नाही. तसेच लसीकरणाची क्षमता वाढवणे, व लसीकरण मोहीम राबवण्यासाठी लोकांमध्ये जनजागृती करणे, हे महत्त्वाचे आहे. तसेच संपूर्ण विभाग निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे.व  विभागातील गरजूंना जीवनावश्यक वस्तूसह अन्नधान्यांचे मोफत वाटप करून त्यांना वेळेत मदत पुरविणे. अशा विविध प्रमुख मुद्द्यावर सर्वांनी एकत्र येऊन करोना परिस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होईल.असे शाखाध्यक्ष मोहन चिराथ यांनी सूचित केले आहे.

   कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी  आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजना यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत, अशीही सूचना शाखाअध्यक्ष मोहन चिराथ यांनी  यावेळी केली.कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती  शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा.   अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. अचानकपणे रुग्ण संख्या वाढते व घटते, त्यामुळे येथील यंत्रणेने अधिक सजग राहून रुग्णांची काळजी घ्यावी.  

   यासाठी  सर्व लोकप्रतिनिधी,  खाजगी डॉक्टर्स,  शासकीय डॉक्टर्स,  सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी  यांना विश्वासात घ्यावे. तसेच  प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते आदी व्यापार्‍यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.असे सांगून चिराथ पुढे म्हणाले की, कोरोना या संकटकाळात सर्व यंत्रणेने अधिक सजग राहून कोरोना रुग्णांची  संख्या अधिक वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात.  ज्यांचे काम उत्तम आहे त्यांची दखलही घेण्यात येईल, असे यावेळी श्री.मोहन चिराथ यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: