मुंबई /विशेष प्रतिनिधी : मागील एक वर्षापासून करोना महामारीच्या काळात संपूर्ण देश विळख्यात सापडला आहे. मृत्यूची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोना महामारीच्या काळात योग्यतो समन्वय साधून भांडुप मध्ये करोनावर कशी मात करता येईल, याबाबत कोणत्या प्रकारच्या तातडीने उपाययोजना कराव्या लागतील.
कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आरोग्य केंद्रे, कोविड केअर केंद्रांवर स्वच्छतेचे सर्व उपाय योजना यासाठी सर्वांनी प्रामाणिकपणे व सकारात्मकरीत्या प्रयत्न करावेत, अशीही सूचना शाखाअध्यक्ष मोहन चिराथ यांनी यावेळी केली.कोरोना रुग्णाच्या संपर्कातील व्यक्ती शोधण्यासाठी सर्व यंत्रणांनी अग्रक्रम ठेवावा. अँटीजन चाचण्या वाढविण्यात याव्यात. अचानकपणे रुग्ण संख्या वाढते व घटते, त्यामुळे येथील यंत्रणेने अधिक सजग राहून रुग्णांची काळजी घ्यावी.
यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, खाजगी डॉक्टर्स, शासकीय डॉक्टर्स, सर्व यंत्रणांतील अधिकारी, माध्यमकर्मी यांना विश्वासात घ्यावे. तसेच प्रत्येक व्यापारी व्यावसायिक, फिरते व्यावसायिक, भाजी विक्रेते आदी व्यापार्यांची चाचणी करण्यास प्राधान्य द्यावे. बहुतांश लोक बरे झाले आहेत, परंतु बरे होण्याचा दर अधिक चांगला असला तरी या आजाराबाबत सर्व नागरिकांनी दक्ष राहणे आवश्यक आहे.असे सांगून चिराथ पुढे म्हणाले की, कोरोना या संकटकाळात सर्व यंत्रणेने अधिक सजग राहून कोरोना रुग्णांची संख्या अधिक वाढणार नाही, यासाठी सर्वतोपरी उपाययोजना कराव्यात. ज्यांचे काम उत्तम आहे त्यांची दखलही घेण्यात येईल, असे यावेळी श्री.मोहन चिराथ यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा