सर्व बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा यंदा कोरोनाच्या उद्रेकामुळे रद्द झाल्या असून बारावीच्या परीक्षा भविष्यात घेणार असल्याचे सर्वांनीच म्हटलं आहे.अस असलं तरी इयत्ता अकरावी प्रवेश घेताना तो कोणत्या आधारावर घेणार ? याची चिंता पालक व विधर्थ्यना आहे.प्रवेश परीक्षा घेता येतील का ? याची चाचपणी महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केली आहे.विद्यार्थ्यांचे मूल्यांकन न करता त्यांना वरच्या वर्गात पाठविणे कसे शक्य आहे ? असं मत अनेक पालकांचे,शिक्षकांचे हुशार विद्यार्थ्यांचे आहे.तेव्हा परीक्षा जरी रद्द झाल्या असल्या तरी अकरावी प्रवेशाचा प्रश्न कायम असून त्याबाबतीत शिक्षण विभागाने लवकरात लवकर सुस्पष्टता आणावी असे मत सर्वांचेच आहे.
गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा