मध्य रेल्वेचा पॉइंटमन मयूर शेळके याने काल वांगणी येथे ट्रॅकमध्ये पडलेल्या बाळाचा जीव आपल्या जिवाची पर्वा न करता वेळेचं भान व प्रसंगावधान राखून वाचविल्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.एखाद्या संकटात एखाद्याने मदत केली तर तो त्यावेळी देवदूतच असतो.मयूर कर्तव्यवर होता व त्याने ट्रेनच्या वेगापेक्षाही जास्त जोरात धावून बाळाचे प्राण वाचविले.जर क्षणाचाही विलंब झाला असता तर ? पण म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी !
मयूरच्या या धाडसाची रेल्वे प्रशासना कडूनदेखील लागलीच दखल घेऊन डीआरएम कार्यालयाकडून त्याचा सत्कार करण्यात आला तर केंद्रीय रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी देखील मयूरला स्वतः फोन करून तुझा अभिमान वाटतो असे सांगितले व त्याला बक्षीस देऊ केले.मयूरनेही मिळणाऱ्या बक्षिसातील काही रक्कम त्या मुलाच्या शिक्षणासाठी देऊ केली आहे व आजही मयूरने रक्तदान व प्लाझमा दान करून एकप्रकारे कोविडकाळात याची किती आवश्यकता आहे हे दाखवून दिले.तेव्हा मयूर तुझे कौतुक करावं तेवढं कमी आहे.
-गणेश हिरवे,जोगेश्वरी पूर्व
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा