आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

मंगळवार, ३० मार्च, २०२१

अंधश्रद्धा निर्मूलन काळाची गरज !!

  अंधश्रद्धा निर्मूलन हे दिशाभूलीपासून समाजाला वाचविण्याचे एक प्रभावी साधन आहे. मुळात अंधश्रद्धा म्हणजे नेमकी काय ? तर एखाद्या परंपरागत चालत आलेल्या गोष्टीवर खात्री न करुन घेता,तर्क वितर्क बाजूला ठेवून आंधळेपणाने विश्वास ठेवणे. बुवाबाजी, चमत्कार, जादूटोणा, करणी, नरबळी यासारख्या विकृतीवर मनमोकळेपणाने विश्वास ठेवणे म्हणजे अंधश्रद्धा होय.आपला समाज आजही छोट्या मोठ्या अंधश्रद्धांनी कायम ग्रासलेलाच आहेच.आरसा फुटणे म्हणजे आपण काहीतरी अशुभ संकेत समजतो पण जुन्या काळात आरसा हा खूप महाग मिळायचा म्हणून तो काळजीपूर्वक वापरला जायचा, संध्याकाळी घरात झाडू मारु नये असे सांगितले जाते यामागे पूर्वी लाईट व्यवस्था नसल्याने संध्याकाळी जर झाडू मारली तरी घरात हरवलेली मौल्यवान वस्तू झाडूबरोबर सरळ कचऱ्या न कळत फेकली जायची म्हणून संध्याकाळी झाडू मारु नये असे सांगितले जायचे,दृष्ट लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधणे यामागचे सत्य कारण हेच आहे की,लिंबू मिरचीमध्ये अँसिडीक गुणधर्म असल्याने जेथे लिंबू मिरची टांगलेली असते त्या ठीकाणी किडे,किटाणू येत नाहीत व परिसर स्वच्छ राहतो,ग्रहण काळात गरोदर मातांनी बाहेर पडू नये यामागचं सत्य काय तर ग्रहण काळात पँराबेगन नावाची किरणं जर माणसाच्या शरीरावर किंवा गरोदर मातेच्या शरीरावर पडली तर शरीरावर इजा होत असे,मांजर आडवे जाणे अशुभ मानले जाते यामागचे कारण असे आहे की पुर्वी लोक बैलगाडी,घोडागाडीचा वापर जास्तीत जास्त करायचे रस्त्यात मांजराच्या डोळ्यांनी बैल,घोडा हे प्राणी दिपवत असतं त्यामुळे थोडा वेळासाठी त्यांना थांबावे लागत असे परंतू आजही मांजर आडवी जाणे ही समाजात अंधश्रद्धा आहेच. 

  अशी कितीतरी उदाहरणे देता येतील जी कोणत्या ना कोणत्या गोष्टीशी निगडीत आहेत. मात्र आम्ही विज्ञान युगात ती आजही फॉलो करत आहोत कोणतीही शहानिशा किंवा चिकित्सा न करता हे खरोखरच हे अशोभनीय आहे.लहान लेकरं शांत बसावीत म्हणून पालक त्यांना भूत,बुवा ची भीती दाखवतात, टिव्ही सिरिअल मधून भुताच्या सिरिअल पाहून खरोखरच भूतं असल्याचे भासवले जाते हे सर्व काल्पनिक आहे. 

    मागे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या माध्यमातून आमच्यावर करणी किंवा भूत घालवून दाखवा आणि एकवीस लाखाचा बक्षिस जिंका असे जाहीर आवाहन डॉ. दाभोळकरांनी केले होते. पण या महाराष्ट्रातील एकाही बुवाला, मांत्रिकाला हे बक्षीस घेण्याची हिंमत किंवा धाडस झालं नाही.अंधश्रद्धा हा एक मानसिक आजार आहे तो मानसोपचारतज्ज्ञाकडेच बरा होऊ शकतो. अंधश्रद्धेचा समूळ नष्ट करण्यासाठी शासन स्तरावर तसेच विविध सामाजिक सेवाभावी संस्थामार्फत, विविध समाज प्रबोधन कार्यक्रमांमार्फत जनजागृती सातत्याने केली जात आहे. तरी देखील अजूनही अंधश्रद्धा समाजात फोफावत असेल तर शासनाने अशा मांत्रिकांवर,बुवा बाबांवर अशा प्रवृत्तींवर कडक कार्यवाही करुन संपूर्ण महाराष्ट्र अंधश्रद्धा मुक्त करावा हीच अपेक्षा.



- मिनाक्षी भुवड (सायन - मुंबई)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...