आवाहन :

ठळक घडामोडी ,सामाजिक समस्या ,अन्य बातम्या व जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क : ९८३३१२७०६९ , ई-मेल : adarshvartahar@gmail.com

बुधवार, २४ फेब्रुवारी, २०२१

मुंबईचा भूषण सहदेव तांबे विश्वस्तरीय वैचारिक लेखन स्पर्धेत तृतीय क्रमांकाने विजयी

 मुंबई (प्रतिनिधी): अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि बळीराजा डॉट कॉम (अखिल भारतीय मराठी शेतकरी संघटना) आयोजित विश्वस्तरीय वैचारिक लेखन स्पर्धेचा निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या सर्वोच्च वैचारिक लेखन स्पर्धेत मुंबईचा कवी.भूषण सहदेव तांबे याला तृतीय क्रमांकाचे पारितोषिक जाहीर करण्यात आलेले आहे. सदर संस्थेने दिलेल्या त्यांच्या निवेदनानुसार पारितोषिक वितरण समारंभ हा पुढील महिन्यात यवतमाळ या ठिकाणी होईल असे जाहीर करण्यात आलेले आहे आणि सर्व पारितोषिक प्राप्त सारस्वतांना पारितोषिक देऊन त्यांचा गौरव करण्यात येणार आहे.

   सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या या स्पर्धेत संपूर्ण जगभरातून अनेक नवोदित तसेच ज्येष्ठ साहित्यिकांनी आपल्या प्रवेशिका स्पर्धेसाठी सादर केल्या होत्या आणि या मानाच्या  स्पर्धेचे प्रतिनिधित्व केले. महाराष्ट्रातून ज्येष्ठ साहित्यिक आणि प्रतिष्ठित मान्यवरांची या स्पर्धेचे परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली आणि त्यांनी त्यांची जबाबदारी छान पार पाडली आणि अचूक निकाल सर्वांसमोर सादर केला.

    कवी.भूषण सहदेव तांबे याला २०२१ या वर्षीचे हे सलग तिसरे पारितोषिक जाहीर झालेले आहे. मराठी साहित्यिक क्षेत्रातील नावलौकिक असणारे नवोदित साहित्यिक म्हणून कवी.भूषण सहदेव तांबे याचे नाव नक्कीच आवर्जून घेतले जाते. कवी.भूषण सहदेव तांबे यांनी आजपर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये स्पर्धेचे प्रतिनिधित्व करून त्यामध्ये प्रावीण्य मिळवून स्वतःच्या नावाची एकमेव ओळख निर्माण केलेली आहे.

  मराठी साहित्यिक क्षेत्रात तसेच सोशल मीडियावर देखील कवी.भूषण सहदेव तांबे याचे खूप कौतुक करण्यात येत आहे आणि पुढील कार्यासाठी त्यास शुभेच्छाही देण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

संदीप परब यांना राज्यस्तरीय "शिक्षण दर्पण" पुरस्कार प्रदान

मुंबई (गणेश हिरवे)  दि.०१ मे २०२४ रोजी महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र साहित्य परिषद, उल्हासनगर आणि कवयि...