करोना काळात उपलब्ध झालेले साधारण सात हजाराहून अधिकचे व्हेंटीलेटर शहाजी राजे संकुल व नायर हॉस्पिटल या ठिकाणी पडून असल्याचे वाचनात आले. अश्या या महागड्या आणि अत्यंत महत्वपूर्ण असलेल्या यंत्राचा वापर होणे गरजेचे आहे मात्र ते नुसतेच वापरा ऐवजी पडून राहिल्यास नादुरुस्त अथवा खराब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बरे, पुन्हा कधी ते दुरुस्त करावयाचे म्हटले तर त्याचा अवाढव्य खर्च आहेच शिवाय ते दुरुस्त होतीलच असे काही सांगता येत नाही.
खर तर मुंबईसह राज्यातील बहुसंख्य ग्रामीण भागातील शासकीय, निमशासकीय, खाजगी जिल्हा, तालुका रुग्णालयातून व्हेंटीलेटरचा मोठ्या प्रमाणात अभाव जाणवतो किंबहुना बहुतेक इस्पितलात सुविधाच उपलब्ध नसतात असे म्हटल्यास वावगे होणार नाही. त्यामुळे गरजू रुग्णाची परवड होते तर व्हेंटीलेटरची सोय असलेल्या हॉस्पिटलच्या शोधात नातेवाईकांना वणवण करावी लागते. या सार्या पार्श्वभूमीवर व्हेंटीलेटर पडून राहून नादुरुस्त होण्यापेक्षा शासनाने, संबधित यंत्रनेणे हे सारे ग्रामीण भागातील जिल्हा, तालुका स्तरावर शासकीय, निमशासकीय रुग्णालयांना अटी, शर्तीवर वापरण्यास दिल्यास ते चांगल्या प्रकारे सुस्थितीत, कार्यरत राहतील आणि नागरिकांनाही एक उत्तम सोय, सुविधा प्राप्त झाल्याचे समाधान मिळेल.
-विश्वनाथ पंडित,
जिजामाता मार्ग, ठाणे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा